शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदेचे १ कोटी ९५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे अंदाजे १ कोटी ९५ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे अंदाजे १ कोटी ९५ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. या वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये रत्नागिरी व चिपळूण बांधकाम विभागाचे एका रस्त्याचे ८ लाख ३० हजार रुपये, साकवाचे ३५ लाखांचे, खेड तालुक्यातील ४ विहिरी नादुरुस्त झाल्याने ३५ लाख १५ हजारांचे, २०० शाळा, वर्गखोल्यांचे ८७ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर २७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे पत्रे उडाल्याने ६ लाख ६९ हजार रुपये, ६ ग्रामपंचायतींच्या इमारतींची पडझड झाल्याने ६ लाख ३० हजारांचे, जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व कर्मचाऱ्यांच्या निवास्थांनाचे सुमारे १२ लाख ३५ हजार रुपयांचा, तसेच तीन उपकेंद्रांच्या इमारतींचे २३ हजार रुपयांचे नुकसान झाले, असेही जाधव यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाच्या भांडार इमारतीचे पत्रे उडाल्याने ४८ हजारांचे, तसेच १४०५ हेक्टरवरील पळे व इतर पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४ घरकुलांचे, पशुवैद्यकीय दवाखान्याचे २ लाख ७ हजारांचे, शिवाय जिल्हा परिषदेच्या इमारतीवरील १४ सौर पॅनेलचे दीड लाखाचे नुकसान झाले असून, अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू असून, लवकरच पूर्ण माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.