शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदेचे १ कोटी ९५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे अंदाजे १ कोटी ९५ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे अंदाजे १ कोटी ९५ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. या वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये रत्नागिरी व चिपळूण बांधकाम विभागाचे एका रस्त्याचे ८ लाख ३० हजार रुपये, साकवाचे ३५ लाखांचे, खेड तालुक्यातील ४ विहिरी नादुरुस्त झाल्याने ३५ लाख १५ हजारांचे, २०० शाळा, वर्गखोल्यांचे ८७ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर २७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे पत्रे उडाल्याने ६ लाख ६९ हजार रुपये, ६ ग्रामपंचायतींच्या इमारतींची पडझड झाल्याने ६ लाख ३० हजारांचे, जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व कर्मचाऱ्यांच्या निवास्थांनाचे सुमारे १२ लाख ३५ हजार रुपयांचा, तसेच तीन उपकेंद्रांच्या इमारतींचे २३ हजार रुपयांचे नुकसान झाले, असेही जाधव यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाच्या भांडार इमारतीचे पत्रे उडाल्याने ४८ हजारांचे, तसेच १४०५ हेक्टरवरील पळे व इतर पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४ घरकुलांचे, पशुवैद्यकीय दवाखान्याचे २ लाख ७ हजारांचे, शिवाय जिल्हा परिषदेच्या इमारतीवरील १४ सौर पॅनेलचे दीड लाखाचे नुकसान झाले असून, अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू असून, लवकरच पूर्ण माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.