शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: September 7, 2016 03:04 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भारताचे माजी अर्थमंत्री तथा जागतिक कीर्तीचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. सी. डी. देशमुख यांनी १९०४ मध्ये श्रीगणेशाचे धडे गिरवले

पुरुषोत्तम मुळे, तळारायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भारताचे माजी अर्थमंत्री तथा जागतिक कीर्तीचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. सी. डी. देशमुख यांनी १९०४ मध्ये श्रीगणेशाचे धडे गिरवले ती प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येच्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे.१८६१ मध्ये स्थापना झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जवळपास १५० वर्षे होऊन गेले. तरीही या शाळेचे दगडी बांधकाम अजूनही मजबूत आहे. या शाळेत शिक्षणाचे धडे गिरविणारे अनेक विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, यशस्वी उद्योजक, उच्च पदस्थ अधिकारी झाले. माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्यासारखे थोर व्यक्ती शिक्षण घेऊन येथून बाहेर पडले. आम्ही तळेकर नागरिक अभिमानाने सांगतो की, या दगडी शाळेत डॉ. सी. डी. देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. अशीही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आज बंद होण्याच्या मार्गावर आहे. इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा आणि मुलांचा ओढा वाढत चालला आहे. आपल्या प्राथमिक शाळेत सर्व सुविधा आहेत, मोफत शिक्षण आहे, इंग्रजी शिकविणारे शिक्षक उत्तम आहेत. आज अनेक प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. जिल्ह्यातून राज्यातून तळा तालुक्यातील प्राथमिक डिजिटल शाळा पाहण्यासाठी जवळपास २५० ते ३०० प्राथमिक शिक्षक येऊन गेले. तालुक्यातील या शाळेतील गुणवत्ता तसेच इंग्रजीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले ज्ञान, गणित पद्धती यावर खूश होवून शाळांचे कौतुक केले. परंतु हल्ली पालकवर्गाचीच मानसिकता बदलत आहे. त्यांना वाटते माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत टाकले म्हणजे त्याला जास्त इंग्रजी येईल. यापुढे आम्ही शिक्षक काय करणार? अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पालकांना समजावून त्यांची मने वळवण्याचा प्रयत्न करतो पण ते काही शक्य होत नाही, असे मुख्याध्यापक सुनील कवळे यांनी सांगितले.जोपर्यंत पालकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्येमध्ये वाढ होणार नाही, अशी चिन्हे या परिस्थितीवरून दिसत आहेत. शिक्षक प्रयत्न करीत असतात. मात्र पालकांना कळले पाहिजे की प्राथमिक शाळेत देखील नर्सरीसारखे वर्ग सुरू करून या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शह दिला तरच पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढेल, अन्यथा येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल आणि एक दिवस प्राथमिक शिक्षकांची परिस्थिती भयानक होईल असे कवळे म्हणाले.