शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

झेनिथ कं पनीची वसाहत ४२ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 01:11 IST

कामगारांची गैरसोय : विजेची मागणी

कर्जत : खालापूर तालुक्यातील खोपोली येथील झेनिथ कंपनीच्या वसाहतीतील वीजपुरवठा गेल्या ४२ दिवसांपासून बंद आहे, तो त्वरित सुरू करावा, अशी मागणी वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. झेनिथ बिर्ला इंडिया हा कारखाना १२ डिसेंबर २०१३ पासून मालकांनी बेकायदा बंद केला आहे. कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये एकूण ७२ कामगार कु टुंबांसह राहत आहेत. बंदच्या काळात कंपनीने वीजबिल न भरल्यामुळे चार ते पाच वेळा वसाहतींमध्ये राहणाºया कामगारांना अंधारात राहण्याची वेळ आली होती. ७ जानेवारी २०२० पासून कंपनीच्या व्यवस्थापनाने वीजबिल न भरल्यामुळे वसाहतीच्या इमारतींमधील कामगारांवर काळोखात राहण्याची वेळ आली आहे. याबाबत कर्मचाºयांनी संबंधित सर्वांशी पत्रव्यवहार करूनही आमची कोणीही दखल घेत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

१३ फेब्रुवारी २०२० रोजी कामगार ठाणे येथील न्यायालयात गेले असता व्यवस्थापनाच्या अधिकाºयांनी न्यायालयात हमीपत्र दिले आहे. यामध्ये आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही टप्प्याटप्प्याने रक्कम भरू. त्याप्रमाणे व्यवस्थापनाने १ लाख १९ हजार ही रक्कम १४ फेब्रुवारीला भरली आहे. न्यायालयात सादर केलेले हमीपत्र व काही रक्कम भरल्याची पावती वीज वितरण कंपनीचे पेण येथील अभियंता दीपक पाटील यांना दिली आहे, तरीसुद्धा वीजपुरवठा चालू करत नसल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. जोपर्यंत कामगारांचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वीज व पाणीपुरवठा नियमित ठेवावा, असे आदेश न्यायालयाने कंपनीच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. तरीही कामगारांना अंधारात राहावे लागत आहे.परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची अडचणकंपनीच्या वसाहतीमध्ये वृद्ध, अपंग, नवजात बालक राहात आहेत. तसेच सध्या बारावीची परीक्षा सुरूआहे, पुढच्या महिन्यात दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. याच कालावधीमध्ये वसाहतीमधील वीजपुरवठा खंडित केल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. याबाबत अभियंता पाटील यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरू करावा, अशी विनंती केली असता सर्व वीजबिल भरा तरच तुमची लाईट चालू केली जाईल, असे सांगितले. शेवटची रक्कम ३१ मार्च रोजी भरू तोपर्यंत आम्हाला अंधारातच ठेवणार आहेत का, असे कामगारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Raigadरायगड