शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

तरुणाने शेतीतून निर्माण केला स्वयंरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:54 IST

भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील बेलवाडीतील तेजस गावणकर या युवकाने आपल्या शेतात फळभाजी लागवड करून रोजगार मिळवला आहे.

बोर्ली-मांडला : शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील बेलवाडीतील तेजस गावणकर या युवकाने आपल्या शेतात फळभाजी लागवड करून रोजगार मिळवला आहे. कारली लागवडीतून त्याला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.दुर्गम भागात राहून तेजसने बारावी कॉमर्स शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता, आपल्या बेलवाडी येथील शेतातील दहा गुंठे जागेत कारली लावली. तर पाच गुंठे जागेमध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, पालक, मेथी, कोथिंबीर व पांढरा कांदा आदी भाज्यांची लागवड केली. त्याने साधारण डिसेंबरमध्ये लागवड केली होती. दीड महिन्यानंतर कारल्याचे पीक चांगले येऊन आठवड्यातून ७० ते ८० किलो उत्पादन मिळू लागले. आज मेथी, कारली व भाजी लागवडीतून त्याला हजारो रुपयांचा स्वयंरोजगार मिळाला आहे. यासाठी त्यांनी शेतात सेंद्रिय खतांचा वापर केला. यशस्वी फळभाजी लागवड करण्यात तेजसला आपल्या आईवडिलांचे उत्तम मार्गदर्शन व साथ मिळाली आहे.>शिक्षण घेऊन पदवीधर होऊन युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उपलब्ध शेतात आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय खतांचा वापर करून भाजीपाला लागवड करून स्वयंरोजगार निर्माण करून स्वावलंबी व्हावे.- तेजस गावणकर