शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक जल दिन विशेष : विंधण विहिरी जलपातळीस मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:00 IST

उन्हाळी पाणीटंचाई निवारणाकरिता विंधण विहिरी (बोअरवेल्स) हा जलस्रोत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. २०१५-१६ मध्ये ५७३० तर २०१६-१७ मध्ये ४०५२ विंधण विहिरी कोट्यवधी रुपये खर्च करुन करण्यात आले आहेत.

- जयंत धुळपअलिबाग : उन्हाळी पाणीटंचाई निवारणाकरिता विंधण विहिरी (बोअरवेल्स) हा जलस्रोत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. २०१५-१६ मध्ये ५७३० तर २०१६-१७ मध्ये ४०५२ विंधण विहिरी कोट्यवधी रुपये खर्च करुन करण्यात आले आहेत. परंतु विंधण विहिरींमुळे त्या परिसरातील भूजल पातळी खालावल्याची उदाहरणे कोकणासह राज्याच्या विविध जिल्ह्यात असल्याने हा जलस्रोत शास्त्रीयदृष्ट्या तपासून त्याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत महाड येथील भूगोल अभ्यासक प्राचार्य डॉ. समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.महाड-पोलादपूर तालुक्यात ज्या ठिकाणी विंधण विहिरी करण्यात आल्या त्या परिसरातील विहिरींचे पाणी अत्यंत वेगाने कमी झाल्याचे निष्कर्ष डॉ.बुटाला यांचे आहेत. विंधण विहिरी केवळ भूगर्भातील पाणी खेचत नाहीत तर भूगर्भातील क्षार देखील पाण्याबरोबर वर आणतात व कालांतराने ते शेतात पसरल्यावर शेताची उत्पादकता कमी होते, हे देखील निरीक्षणांती सिद्ध झाल्याचे डॉ.बुटाला यांनी सांगितले. या दोन मुद्याव्यतिरिक्त तिसरा मुद्दा अत्यंत धोकादायक आहे आणि तो म्हणजे विंधण विहिरींमुळे भूगर्भातील जलपुनर्भरणाच्या प्रक्रियेचा कालावधी ६० ते ७० वर्षांनी वाढवतात आणि म्हणूनच हा जलस्रोत उपयुक्ततेपेक्षा मारक अधिक असल्याने त्याबाबत गांभीर्याने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे डॉ.बुटाला यांनी सांगितले.पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र नाही. परंतु, पाण्याचा अविचारी, अयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जावी इतके अनन्य साधारण महत्त्व पाण्याला आहे. पाण्याच्या दुर्भिक्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरात जल संवर्धनाच्या कामास प्राथम्य प्राप्त झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच ‘यूएनओ’च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगवेगळी संकल्पना घेवून दरवर्षी २२ मार्च हा दिवस पाळण्याची जागतिक प्रथा आहे.

पिण्याच्या पाण्याची शाश्वतताशाश्वत पिण्याचे पाणी हा राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा घटक असून पारंपरिक व अपारंपरिक उपाययोजनांद्वारे पाण्याचे संधारण करण्याच्या उद्देशाने ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत पिण्याचे पाणी सातत्याने उपलब्ध होण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्याकरिता छतावरील पावसाच्या पाण्याची साठवणूक, पावसाचे पाणी साठविण्यासाठी डोंगराळ भागात टाक्या बांधणे, खंदकाचे पुनरुज्जीवन, सिमेंट नाला बांध, विहीर खोलीकरण इत्यादी उपाययोजना राज्यात राबविण्यात येत आहेत.पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी आॅक्टोबर ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारण कार्यक्रम राबविला जातो.२०१४-१५ व २०१५-१६ मध्ये राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. वर्ष २०१६-१७ मध्ये त्या मागील वर्षांच्या तुलनेत चांगला पाऊ स झाला.टंचाईची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्याला २०१६-१७ मध्ये ५२३.१२ कोटी आणि २०१७-१८ मध्ये जानेवारीपर्यंत १९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला.

टॅग्स :Raigadरायगड