शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक पर्यावरणवारीचे ध्येयवेडे वारकरी

By admin | Updated: July 5, 2017 06:33 IST

तब्बल ३७ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण देशाला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन,

जयंत धुळप/लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तब्बल ३७ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण देशाला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन, उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील अवध बिहारी लाल यांनी स्वेच्छेने वृक्षसंवर्धन जागृतीचे व्रत स्वीकारले. त्यांच्या या वृक्षसंवर्धन जागृती मोहिमेस ३० जुलै १९८०मध्ये भारत-नेपाळ सीमेवरील लखिपूर या गावातून प्रारंभ झाला. या मोहिमेत जितेंद्र प्रताप आणि महेंद्र प्रताप या दोघा तरुणांबरोबर हळूहळू इतरही काही जण जोडले गेले. सद्य:स्थितीत त्यांचा एकूण २० जणांचा चमू जगभरातील महाविद्यालयांमध्ये वृक्षसंवर्धन व स्त्रीभू्रणहत्या प्रतिबंध याविषयी जागृतीचे काम करत आहे. गेल्या ३७ वर्षांत जगभरातील तब्बल ११ देशांतील ३ लाख ३४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्रांत करून जागतिक पर्यावरणवारीचे हे तीन ध्येयवेडे वारकरी मंगळवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधत आंग्रेनगरी अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. या पदयात्रेची नोंद ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दोन वेळा, तर ‘लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तब्बल पाच वेळा झाली असल्याची माहिती या जागतिक पर्यावरण पदयात्रेचे प्रणेते अवध बिहारी लाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दिवसभरातील सुमारे २० तासांत सुमारे ४० ते ६० किलोमीटर अंतर ते चालतात. केवळ चार तासांची विश्रांती आता सवयीमुळे पुरेशी होत असल्याचे अवध बिहारी लाल यांनी सांगितले. भारत, बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, बर्मा, चीन, थायलंड, अफगाणिस्तान, मॅनमार या ११ देशांतील ३ लाख ३४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्र ांत करताना सर्व देशांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असतानाचा स्थानिक विद्यार्थी व प्रशासनाच्या सहयोगाने एकूण ७ कोटी ५० लाख वृक्षलागवड केली असल्याचे प्रताप यांनी सांगितले. कोणत्याही शहरात जनजागृती के ल्यावर महाविद्यालये, प्रशासनाला रोपांची व्यवस्था करण्यास सांगितले.अलिबागमध्ये पोहोचल्यावर त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची भेट घेतली. पारसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी त्यांना स्थानिक परिसराबाबत माहिती दिली.