शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जागतिक पर्यावरणवारीचे ध्येयवेडे वारकरी

By admin | Updated: July 5, 2017 06:33 IST

तब्बल ३७ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण देशाला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन,

जयंत धुळप/लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तब्बल ३७ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण देशाला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन, उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील अवध बिहारी लाल यांनी स्वेच्छेने वृक्षसंवर्धन जागृतीचे व्रत स्वीकारले. त्यांच्या या वृक्षसंवर्धन जागृती मोहिमेस ३० जुलै १९८०मध्ये भारत-नेपाळ सीमेवरील लखिपूर या गावातून प्रारंभ झाला. या मोहिमेत जितेंद्र प्रताप आणि महेंद्र प्रताप या दोघा तरुणांबरोबर हळूहळू इतरही काही जण जोडले गेले. सद्य:स्थितीत त्यांचा एकूण २० जणांचा चमू जगभरातील महाविद्यालयांमध्ये वृक्षसंवर्धन व स्त्रीभू्रणहत्या प्रतिबंध याविषयी जागृतीचे काम करत आहे. गेल्या ३७ वर्षांत जगभरातील तब्बल ११ देशांतील ३ लाख ३४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्रांत करून जागतिक पर्यावरणवारीचे हे तीन ध्येयवेडे वारकरी मंगळवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधत आंग्रेनगरी अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. या पदयात्रेची नोंद ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दोन वेळा, तर ‘लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तब्बल पाच वेळा झाली असल्याची माहिती या जागतिक पर्यावरण पदयात्रेचे प्रणेते अवध बिहारी लाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दिवसभरातील सुमारे २० तासांत सुमारे ४० ते ६० किलोमीटर अंतर ते चालतात. केवळ चार तासांची विश्रांती आता सवयीमुळे पुरेशी होत असल्याचे अवध बिहारी लाल यांनी सांगितले. भारत, बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, बर्मा, चीन, थायलंड, अफगाणिस्तान, मॅनमार या ११ देशांतील ३ लाख ३४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्र ांत करताना सर्व देशांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असतानाचा स्थानिक विद्यार्थी व प्रशासनाच्या सहयोगाने एकूण ७ कोटी ५० लाख वृक्षलागवड केली असल्याचे प्रताप यांनी सांगितले. कोणत्याही शहरात जनजागृती के ल्यावर महाविद्यालये, प्रशासनाला रोपांची व्यवस्था करण्यास सांगितले.अलिबागमध्ये पोहोचल्यावर त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची भेट घेतली. पारसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी त्यांना स्थानिक परिसराबाबत माहिती दिली.