शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

जागतिक पर्यावरणवारीचे ध्येयवेडे वारकरी

By admin | Updated: July 5, 2017 06:33 IST

तब्बल ३७ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण देशाला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन,

जयंत धुळप/लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तब्बल ३७ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण देशाला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन, उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील अवध बिहारी लाल यांनी स्वेच्छेने वृक्षसंवर्धन जागृतीचे व्रत स्वीकारले. त्यांच्या या वृक्षसंवर्धन जागृती मोहिमेस ३० जुलै १९८०मध्ये भारत-नेपाळ सीमेवरील लखिपूर या गावातून प्रारंभ झाला. या मोहिमेत जितेंद्र प्रताप आणि महेंद्र प्रताप या दोघा तरुणांबरोबर हळूहळू इतरही काही जण जोडले गेले. सद्य:स्थितीत त्यांचा एकूण २० जणांचा चमू जगभरातील महाविद्यालयांमध्ये वृक्षसंवर्धन व स्त्रीभू्रणहत्या प्रतिबंध याविषयी जागृतीचे काम करत आहे. गेल्या ३७ वर्षांत जगभरातील तब्बल ११ देशांतील ३ लाख ३४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्रांत करून जागतिक पर्यावरणवारीचे हे तीन ध्येयवेडे वारकरी मंगळवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधत आंग्रेनगरी अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. या पदयात्रेची नोंद ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दोन वेळा, तर ‘लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तब्बल पाच वेळा झाली असल्याची माहिती या जागतिक पर्यावरण पदयात्रेचे प्रणेते अवध बिहारी लाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दिवसभरातील सुमारे २० तासांत सुमारे ४० ते ६० किलोमीटर अंतर ते चालतात. केवळ चार तासांची विश्रांती आता सवयीमुळे पुरेशी होत असल्याचे अवध बिहारी लाल यांनी सांगितले. भारत, बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, बर्मा, चीन, थायलंड, अफगाणिस्तान, मॅनमार या ११ देशांतील ३ लाख ३४ हजार किलोमीटरचे अंतर पादाक्र ांत करताना सर्व देशांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असतानाचा स्थानिक विद्यार्थी व प्रशासनाच्या सहयोगाने एकूण ७ कोटी ५० लाख वृक्षलागवड केली असल्याचे प्रताप यांनी सांगितले. कोणत्याही शहरात जनजागृती के ल्यावर महाविद्यालये, प्रशासनाला रोपांची व्यवस्था करण्यास सांगितले.अलिबागमध्ये पोहोचल्यावर त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची भेट घेतली. पारसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी त्यांना स्थानिक परिसराबाबत माहिती दिली.