शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वीर स्थानकावर प्रवाशांची कसरत

By admin | Updated: October 5, 2015 00:29 IST

कोकण रेल्वे मार्गावर महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर एकाच बाजूला प्रवासी शेड असल्यामुळे आणि एकाच वेळेस दोन रेल्वे गाड्या स्थानकावर आल्यास

दासगाव : कोकण रेल्वे मार्गावर महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर एकाच बाजूला प्रवासी शेड असल्यामुळे आणि एकाच वेळेस दोन रेल्वे गाड्या स्थानकावर आल्यास प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडत गाडी पकडण्याकरिता कसरत करावी लागत आहे. ही समस्या गेली अनेक वर्षांपासून असून कोकण रेल्वेने कोकणवासीयांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.कोकण रेल्वेमार्गावरील महाडपासून जवळपास बारा किमी अंतरावर असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर गेली अनेक वर्षांपासून प्रवाशांना एकाच वेळेस दोन गाड्या फलाटावर आल्यास रुळ ओलांडत पलीकडे जावे लागते आणि ट्रेनमध्ये चढावे लागते. महाड या ऐतिहासिक शहराला लांब ठेवून कोकण रेल्वेने वीर दासगावपासून आपला मार्ग कोकणाकडे वळवला आहे. आजही हा एकेरी मार्ग असल्याने अनेक वेळा रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस प्रवाशांना १० ते १५ मिनिटे एखाद्या स्थानकात ताटकळत बसावे लागते. या मार्गावरून जवळपास २५ गाड्या जात असल्या तरी कोकणवासीयांकरिता अवघ्या तीनच तीन गाड्या सोडल्या जातात. यामध्ये दादर-सावंतवाडी आणि राज्यराणी एक्स्प्रेस, दिवा-मडगाव या गाड्यांचा समावेश आहे. बाकी सर्व गाड्या कोकणातून कर्नाटकात जातात. या एक्स्प्रेस गाड्या जात असताना या मार्गावरील बहुतांश स्थानकात रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस लोकल गाड्यांना थांबावे लागते. महाडजवळील वीर रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक महाड शहरालगत असले तरी या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाने कोणतीच विशेष सुविधा पुरवलेली नाही.वीर रेल्वे स्थानकात ही स्थिती आठवड्यातून जवळपास तीन ते चार वेळेस निर्माण होते. वीर रेल्वेस्थानकात एकाच बाजूला प्रवाशांना शेड आहे. यामुळे रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस फलाटावर एखादी गाडी उभी असल्यास प्रवाशांना फलाट उतरून पलीकडे जावे लागते. ही स्थिती पलीकडे थांबलेल्या गाडीमधील प्रवाशांची देखील होते. प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडत फलाटावर चढताना कसरत करावी लागते. रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशांना देखील दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. एकीकडे मोठ्या शहरातून रेल्वे रुळ ओलांडू नये याबाबत जनजागृती करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या बेजबाबदारपणामुळे वीर रेल्वे स्थानकात मात्र प्रवाशांना रुळावरूनच कसरत करावी लागत आहे. कोकण रेल्वेबाबत अनेकवेळा आंदोलन करण्यात आले आहे. वीर रेल्वे स्थानकात दोन्ही बाजूला प्रवासी शेड आणि ओव्हरब्रिज करणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांना करावा लागणारा रुळावरील धोकादायक प्रवास थांबणार आहे. (वार्ताहर)