शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

वीर स्थानकावर प्रवाशांची कसरत

By admin | Updated: October 5, 2015 00:29 IST

कोकण रेल्वे मार्गावर महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर एकाच बाजूला प्रवासी शेड असल्यामुळे आणि एकाच वेळेस दोन रेल्वे गाड्या स्थानकावर आल्यास

दासगाव : कोकण रेल्वे मार्गावर महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर एकाच बाजूला प्रवासी शेड असल्यामुळे आणि एकाच वेळेस दोन रेल्वे गाड्या स्थानकावर आल्यास प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडत गाडी पकडण्याकरिता कसरत करावी लागत आहे. ही समस्या गेली अनेक वर्षांपासून असून कोकण रेल्वेने कोकणवासीयांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.कोकण रेल्वेमार्गावरील महाडपासून जवळपास बारा किमी अंतरावर असलेल्या वीर रेल्वे स्थानकावर गेली अनेक वर्षांपासून प्रवाशांना एकाच वेळेस दोन गाड्या फलाटावर आल्यास रुळ ओलांडत पलीकडे जावे लागते आणि ट्रेनमध्ये चढावे लागते. महाड या ऐतिहासिक शहराला लांब ठेवून कोकण रेल्वेने वीर दासगावपासून आपला मार्ग कोकणाकडे वळवला आहे. आजही हा एकेरी मार्ग असल्याने अनेक वेळा रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस प्रवाशांना १० ते १५ मिनिटे एखाद्या स्थानकात ताटकळत बसावे लागते. या मार्गावरून जवळपास २५ गाड्या जात असल्या तरी कोकणवासीयांकरिता अवघ्या तीनच तीन गाड्या सोडल्या जातात. यामध्ये दादर-सावंतवाडी आणि राज्यराणी एक्स्प्रेस, दिवा-मडगाव या गाड्यांचा समावेश आहे. बाकी सर्व गाड्या कोकणातून कर्नाटकात जातात. या एक्स्प्रेस गाड्या जात असताना या मार्गावरील बहुतांश स्थानकात रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस लोकल गाड्यांना थांबावे लागते. महाडजवळील वीर रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक महाड शहरालगत असले तरी या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाने कोणतीच विशेष सुविधा पुरवलेली नाही.वीर रेल्वे स्थानकात ही स्थिती आठवड्यातून जवळपास तीन ते चार वेळेस निर्माण होते. वीर रेल्वेस्थानकात एकाच बाजूला प्रवाशांना शेड आहे. यामुळे रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस फलाटावर एखादी गाडी उभी असल्यास प्रवाशांना फलाट उतरून पलीकडे जावे लागते. ही स्थिती पलीकडे थांबलेल्या गाडीमधील प्रवाशांची देखील होते. प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडत फलाटावर चढताना कसरत करावी लागते. रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशांना देखील दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. एकीकडे मोठ्या शहरातून रेल्वे रुळ ओलांडू नये याबाबत जनजागृती करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या बेजबाबदारपणामुळे वीर रेल्वे स्थानकात मात्र प्रवाशांना रुळावरूनच कसरत करावी लागत आहे. कोकण रेल्वेबाबत अनेकवेळा आंदोलन करण्यात आले आहे. वीर रेल्वे स्थानकात दोन्ही बाजूला प्रवासी शेड आणि ओव्हरब्रिज करणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांना करावा लागणारा रुळावरील धोकादायक प्रवास थांबणार आहे. (वार्ताहर)