शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कर्जतमधील दहा गावांत जलयुक्त शिवारमधून कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:18 IST

पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात अपयश; अभियानांतर्गत रोजगार मिळण्याची संधी

कर्जत : तालुक्यातील आठ गावांत जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला आहे.गतवर्षी आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर कर्जत तालुक्यात खर्च करू नये, अशी सूचना केली होती. तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी जलयुक्त शिवार बिनकामाचे ठरत असून केवळ शेतदुरुस्ती, बांधबंदिस्ती आणि गाळ काढण्याची कामे केली जातआहेत.२०१९ या वर्षात कर्जत तालुक्यातील ज्या दहा गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले, तेथे अभियानांतर्गत जुनी शेतदुरुस्ती, नवीन शेत तयार करणे आणि तलावातील गाळ काढणे याशिवाय कोणत्याही प्रकारची कामे समाविष्ट केली गेली नाहीत. यंदा बळीवारे, नांदगाव, खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, जुम्मापट्टी, चाफेवाडी, माणगाव या नऊ गावांत केवळ दुरुस्तीची कामे केली गेली आहेत. जुनी शेतदुरुस्ती करून अभियानातून अनेकांना रोजगार मिळावा, असे निर्देश आहेत; परंतु बहुतेक ठिकाणी ट्रॅक्टर ऐवजी जेसीबी मशिन लावून नवीन शेते तयार केली आहेत. भडवळ येथील एकमेव सिमेंट बंधारा अभियानात समाविष्ट आहे.खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, बळीवारे, नांदगाव अशा तालुक्यांच्या टोकावर असलेल्या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविताना सर्रास जेसीबी मशिन लावून शेतदुरुस्ती आणि नवीन शेत पाडण्याचे काम केले गेले आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविताना जमिनीची भूजल क्षमता वाढवून जुन्या पाणवठ्यांना पाण्याचे स्रोत निर्माण करणे आणि तेथे उभ्या असलेल्या झाडांना पाणी मिळावे म्हणून पाणी अडविण्याचे काम केले जाऊ शकते.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार