शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कर्जतमधील दहा गावांत जलयुक्त शिवारमधून कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:18 IST

पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात अपयश; अभियानांतर्गत रोजगार मिळण्याची संधी

कर्जत : तालुक्यातील आठ गावांत जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही, त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला आहे.गतवर्षी आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर कर्जत तालुक्यात खर्च करू नये, अशी सूचना केली होती. तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी जलयुक्त शिवार बिनकामाचे ठरत असून केवळ शेतदुरुस्ती, बांधबंदिस्ती आणि गाळ काढण्याची कामे केली जातआहेत.२०१९ या वर्षात कर्जत तालुक्यातील ज्या दहा गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले, तेथे अभियानांतर्गत जुनी शेतदुरुस्ती, नवीन शेत तयार करणे आणि तलावातील गाळ काढणे याशिवाय कोणत्याही प्रकारची कामे समाविष्ट केली गेली नाहीत. यंदा बळीवारे, नांदगाव, खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, जुम्मापट्टी, चाफेवाडी, माणगाव या नऊ गावांत केवळ दुरुस्तीची कामे केली गेली आहेत. जुनी शेतदुरुस्ती करून अभियानातून अनेकांना रोजगार मिळावा, असे निर्देश आहेत; परंतु बहुतेक ठिकाणी ट्रॅक्टर ऐवजी जेसीबी मशिन लावून नवीन शेते तयार केली आहेत. भडवळ येथील एकमेव सिमेंट बंधारा अभियानात समाविष्ट आहे.खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, बळीवारे, नांदगाव अशा तालुक्यांच्या टोकावर असलेल्या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविताना सर्रास जेसीबी मशिन लावून शेतदुरुस्ती आणि नवीन शेत पाडण्याचे काम केले गेले आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविताना जमिनीची भूजल क्षमता वाढवून जुन्या पाणवठ्यांना पाण्याचे स्रोत निर्माण करणे आणि तेथे उभ्या असलेल्या झाडांना पाणी मिळावे म्हणून पाणी अडविण्याचे काम केले जाऊ शकते.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार