शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

जिल्ह्यात हजारो तरुणांना रोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षणातून १९२ जणांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:56 IST

अलिबाग : राज्य सरकारच्या ‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागा’ने नवी कार्यपद्धती स्वीकारून कामाला सुरु वात केल्यावर संपूर्ण राज्यात कोकण विभागात विशेष आघाडी घेऊन अव्वल दर्जा प्राप्त केला आहे.

जयंत धुळप अलिबाग : राज्य सरकारच्या ‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागा’ने नवी कार्यपद्धती स्वीकारून कामाला सुरु वात केल्यावर संपूर्ण राज्यात कोकण विभागात विशेष आघाडी घेऊन अव्वल दर्जा प्राप्त केला आहे. पूर्वी या विभागाचे नाव ‘सेवायोजन कार्यालय’ असे होते. १९४५मध्ये या कार्यालयाची स्थापना झाली. १९४८ मध्ये नव्याने कार्यालयाचे कामकाज स्वरूप ठरविण्यात येऊन त्याला व्यापक अर्थ देण्यात आला. १ नोव्हेंबर १९५६पासून सेवायोजन कार्यालये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यान्वित झाली. राज्य शासनाने १ मे १९९०पासून ‘रोजगार व स्वयंरोजगार विभाग’ स्थापन केला. यातून सेवायोजन कार्यालयाचे संघटन, मनुष्यबळ नियोजन, सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार योजना, स्वयंरोजगाराचे धोरण, अंमलबजावणी अशी कामे केली जातात.चार वर्षांत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी १ जुलै २०१५ रोजी याचे नामकरण ‘कौशल्य विकास व उद्योजकता विभाग’ असे करण्यात आले. यातून नाव नोंदणी, पात्रता वाढविणे, व्यवसाय मार्गदर्शन, उद्योजकता माहिती, अपंगांसाठी रोजगार, सेवायोजन क्षेत्राची माहिती, सांख्यिकी तयार करणे, सेवायोजन कार्यालयाचे अधिनियम नुसार काम करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून योजनेत्तर योजना आणि योजनेंतर्गत योजना राबविल्या जातात. रायगड जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत या विभागाने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली आहे.>१९ रोजगार मेळाव्यांतून १३६ उद्योगांत १ हजार ४६१ तरुणांना रोजगार२०१५-१६मध्ये जिल्ह्यातील १ हजार ४४० विविध रिक्त पदांकरिता एकूण सहा रोजगार मेळावे झाले, त्यात ३२ उद्योजक आणि ८०० उमेदवार सहभागी झाले. पैकी ३१९ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली. सन २०१६-१७मध्ये जिल्ह्यातील ३ हजार २९२ विविध रिक्त पदांकरिता एकूण सात रोजगार मेळावे झाले. त्यात ५३ उद्योजक आणि ३ हजार ४२८ उमेदवार सहभागी झाले. पैकी ७३६ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली.२०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ३ हजार २९२ विविध रिक्त पदांकरिता एकूण सात रोजगार मेळावे झाले. त्यात ५३ उद्योजक आणि ३ हजार ४२८ उमेदवार सहभागी झाले. पैकी ७३६ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली. सन २०१७-१८मध्ये जिल्ह्यातील ८२८ विविध रिक्त पदांकरिता एकूण तीन रोजगार मेळावे झाले. त्यात २८ उद्योजक आणि १ हजार ९७ उमेदवार सहभागी झाले. पैकी ३५२ उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली.रायगड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सन २०१४-१५मध्ये जिल्ह्यात तीन मेळाव्यांचे आयोजन केले. त्यात २३ उद्योजक उपस्थित होते.जिल्ह्यातील विविध उद्योग व अस्थापनांतील ४१९ रिक्त पदांच्या भरतीकरिता ५५३ उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी ५४ उमेदवारांना या रोजगार मेळाव्यातून नोकरी प्राप्त होऊ शकली.रोजगार कार्यक्र मासही सकारात्मक प्रतिसादरोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील ९५० तरुण उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले होते.प्रत्यक्षांत ७०४ तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला. या पैकी ६० टक्केपेक्षा अधिक उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला, तर उर्वरित उमेदवारांनी स्वयंरोजगार स्वीकारला आहे.कौशल्य विकासाकरिता विशेष नियोजनरायगड जिल्ह्यातील एकूण २७ कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांचे नियोजन आहे. त्यापैकी ९ प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण सुरू असून तेथे १७ बॅचेसमध्ये ४५० तरुण प्रशिक्षण घेत आहेत.या प्रशिक्षणाच्या पूर्ततेअंती आतापर्यंत १९२ उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे.नवीन पनवेल येथे रोजगार मेळावापनवेल : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल व रोटरी क्लब आॅफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने २८ आॅक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर १८ के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयात हा मेळावा होणार असून विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.