शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीतील कामकाज ठप्प, ४२ कंटेनरचीच वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 05:01 IST

जेएनपीटीच्या चारही बंदरांत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारची तयारी नसतानाही डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरण सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी विविध संघटनेच्या माध्यमातून जेएनपीटी प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन सुरू केले आहे.

उरण -  जेएनपीटीच्या चारही बंदरांत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारची तयारी नसतानाही डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरण सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी विविध संघटनेच्या माध्यमातून जेएनपीटी प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमिवर वाहतूकदारांनी बुधवारपासून सुरू केलेल्या असहकार आंदोलनाचा जबरदस्त फटका जेएनपीटी बंदराला बसला असून चारही बंदरात कंटेनर हाताळणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे जेएनपीटी परिसरात शुकशुकाट पसरला आहे.जेएनपीटी प्रशासनाने १ मे २०१८पासून या डीपीडी धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी जेएनपीटीने सुरू केली होती. मात्र काही खासगी बंदरात डीपीडीला काही प्रमाणात अंमलबजावणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने व्यावसायिकांचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी सुरू केलेल्या या डीपीडीचे धोरण जेएनपीटीच्या चारही बंदरातून कंटेनर वाहतूक करणाºया वाहतूकदार आणि त्यांच्या संघटनांना मंजूर नाही. त्यामुळे त्यांनी डीपीडी धोरण लागून करण्याला विरोध दर्शविला आहे. या संदर्भात जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांच्यासोबत अनेकवेळा चर्चा, बैठकाही झाल्या. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.वाहतूकदारांच्या या असहकार आंदोलनामुळे जेएनपीटी आणि जेएनपीटीअंतर्गत असलेल्या अन्य चारही बंदरात होणारी कंटेनर वाहतूूक ठप्प झाली होती. चारही बंदरातून दर दिवशी साधारणत: सहा हजार कंटेनरची वाहतूक होते. मात्र आंदोलनामुळे दिवसभरात फक्त ४२ कंटेनरच बंदरात पोहोचल्याची माहिती न्हावा शेवा बंदर पोलीस ठाण्यातून देण्यात आली. जेएनपीटी बंदरात डीपीडी धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तसेच चारही बंदरांच्या कामकाजावर आंदोलनाचा फारसा परिणाम झाला नसल्याचा दावाही जेएनपीटीचे मुख्य प्रबंधक व सचिव जयवंत ढवळे यांनी केला.वाहतूकदारांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात डीसीपी राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकही झाली. पण त्यात काही तोडगा निघाला नाही. दरम्यान, विविध वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आणि जेएनपीटीचे अधिकारी यांच्यात उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.बंदचा कृषी व्यापारास फटकाजेएनपीटीविरोधातील वाहतूकदारांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका कृषी व्यापारास बसला आहे. फळे व भाजीपाल्याची आखाती व इतर देशांमध्ये जेएनपीटीमार्गे निर्यात होत असते. गुरुवार, शनिवार व सोमवारी कृषी माल बंदरामध्ये जात असतो. वाहतूकदारांच्या संपामुळे तब्बल २०० कंटेनर रखडले आहेत. यामध्ये हापूस आंब्याच्या १०० कंटेनरचा समावेश आहे. याशिवाय द्राक्ष व इतर भाजीपाल्याची निर्यातही ठप्प होणार असून, शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता एपीएमसीमधील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगडnewsबातम्या