शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माथेरानमधील रोप-वेचे काम लवकरच मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 04:21 IST

अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या कचाट्यात सापडलेल्या रोप-वे या माथेरानसाठी पर्यायी वाहतुकीचे सोयीस्कर साधनासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे बुधवारी येथील माधवजी उद्यानात रोपवेचा थांबा असलेल्या ठिकाणी (सॉईल टेस्टिंग) मातीची तपासणी करण्यात आली.

- मुकुंद रांजणे ।माथेरान : अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या कचाट्यात सापडलेल्या रोप-वे या माथेरानसाठी पर्यायी वाहतुकीचे सोयीस्कर साधनासाठी शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे बुधवारी येथील माधवजी उद्यानात रोपवेचा थांबा असलेल्या ठिकाणी (सॉईल टेस्टिंग) मातीची तपासणी करण्यात आली. मुंबई व अन्य भागात नेहमीच मातीचे निरीक्षण मेट्रो ट्रेनसाठी केले जाते ती चाचणी करण्यात आली. सॉईल टेस्टिंगचा उपयोग मातीचे गुण जाणून घेणे आहे, ही माती बांधकामासाठी योग्य आहे की नाही याची पडताळणी केली जाते. यासाठी सर्वच अत्याधुनिक यंत्रसामग्री येथे आणण्यात येत आहे. एक ते दीड महिन्यात हे निरीक्षणाचे काम पूर्ण होऊन नंतरच रोप-वेच्या कामाला खºया अर्थाने गती देऊन दीड वर्षात हे रोपवेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे कामगारांनीे सांगितले.निसर्गाने भरभरु न अलौकिक निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते संपत्ती दिलेल्या माथेरानला दृष्टिक्षेपात आणण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने पर्यटकांना ही पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायात भर पडण्याबरोबरच सर्वसामान्य मोलमजुरांना देखील आगामी काळ सुगीचा ठरणार आहे. या प्रकल्पाची लांबी ३३०० मीटर इतकी असून उंची ८५० मीटर इतकी असणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास दोनशे कोटी रु पये खर्च अपेक्षितआहे.हा मार्ग कर्जत येथील भिवपुरी (डिकसळ) येथून माधवजी पॉइंटपर्यंत येणार आहे. उद्योजक टाटा समूहांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागणार असून याबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरण हे यासाठी तांत्रिकदृष्ट्या सहकार्य करणार आहे. गेल्या वीस वर्षापासून माथेरानकर प्रतीक्षेत होते तो प्रकल्प मार्गी लागणार असल्याने एक उत्तम पर्यायी मार्गाची व्यवस्था या निमित्ताने होणार आहे.माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या विनंतीवरून गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी रोपवेसंदर्भात टाटा कंपनीचे अधिकारी हर्षवर्धन गजभिये व कपूर यांच्या सोबत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.त्यावेळी सहा महिन्यांची मुदत मागितली होती, केंद्र सरकारकडून परवानग्या येणे बाकी होते.आता सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची टाटा कंपनीकडून ग्वाही देण्यात आल्याचे बोलले जात आहे.रायगड जिल्ह्यातील हा प्रथमच एवढा मोठा प्रकल्प उभा रहात असून माथेरानचे खरे वैभव पर्यटकांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दृष्टिक्षेपात येणार आहे.प्रवास करताना या माध्यमातून माथेरानच्या चतु:सीमेकडील पॉइंट्सची नयनरम्य दृष्ये प्रवाशांना न्याहाळता येतील.तसेच पर्यटकांची पैसा व वेळेची बचत होऊन पर्यटन व्यवसाय एकंदरीतच वृद्धिंगत होईल असे स्थानिकांचे मत आहे.खूप वर्षे माथेरानकरांना पर्यायी वाहतुकीच्या व्यवस्थेची प्रतीक्षा करावी लागली आहे.रोप -वे च्या माध्यमातून पर्यटनाला चालना तसेच सर्वांचे व्यवसाय आर्थिक उत्पन्न वाढून खºया अर्थाने पर्यटन क्र ांती घडणार आहे. नुकतीच मिनीट्रेन सुरू झाली असून रोप-वेच्या कामास सुरुवात झाल्याने एकंदरीतच स्थानिकांचा आगामी विकासकाळ प्रगतिपथावर आहे.-प्रकाश सुतार, माजी नगरसेवक माथेरानरोप-वेच्या माध्यमातून येथे वाहतुकीची एक पर्यायी व्यवस्था होणार आहे.त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन सर्वांचीच उत्पन्नाच्या बाबतीत प्रगती होईल.हा प्रकल्प मार्गी लागल्यावर स्थानिक भूमिपुत्रांना यामध्ये कामावर समाविष्ट केल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल.- सुनील शिंदे, प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था पुरस्कर्ता, माथेरान

टॅग्स :Raigadरायगड