शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

‘जलशिवार’चे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2015 00:40 IST

कर्जत तालुक्यातील टेंभरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावात जलयुक्त शिवारांतर्गत कामे करण्यात आली होती. जवळपास ४९.२२ लाख रुपये यावेळी खर्च करण्यात आले.

- विजय मांडे, कर्जतकर्जत तालुक्यातील टेंभरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावात जलयुक्त शिवारांतर्गत कामे करण्यात आली होती. जवळपास ४९.२२ लाख रुपये यावेळी खर्च करण्यात आले. मात्र खोदण्यात आलेल्या नऊ मातीच्या बंधाऱ्यात थेंबभर पाणी साचत नसल्याने कृषी विभागाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे.पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरु वात केली. कर्जत तालुक्यातील तीन गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात आला. त्यातील टेंबरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावामधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मातीचे बांध आणि लूज बोर्डर खोदण्याचे नियोजन झाले. त्यानुसार आदिवासी वाड्यांच्या परिसरात मातीचे बंधारे खोदले. त्यासाठी जेसीबी मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र आदिवासी उपयोजनेमधून तब्बल ४५.९३ लाख रु पये खर्चून बांधलेल्या या मातीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीच साठत नाही. बंधाऱ्यातील पिचिंगला गळतीजामरुंगमध्ये पाण्यासाठी मातीचे ९ बंधारे खोदण्यात आले. मात्र त्यात पाणीच साठत नसल्याने तब्बल ४५.९३ लाख रुपये पाण्यात गेले आहेत. पावसाळ्यात बंधाऱ्यात पाणी साचत नसले तर उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधाऱ्यांचा काहीच उपयोग होणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कृषी विभागाने जेसीबीच्या सहाय्याने मातीचे बंधारे बनविण्यासाठी खोदकाम केले. यावेळी पाणी वाहून जाऊ नये म्हणून खाली दगडी पिचिंग करण्यात आले, मात्र तरीही पाणी झिरपत असल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले, हे मान्य करावे लागेल. नऊ बंधारे खोदण्यासाठी अनुक्रमे चार लाखांपासून साडेसहा लाखांपर्यंत खर्च झाला आहे.