शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रमदानातून बुजवली संरक्षण बंधा-यांची २५ भगदाडे श्रमिक मुक्तीदलाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:27 IST

अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती. गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ५६० स्त्री-पुरुष शेतक-यांनी श्रमदान करून चिखलमातीने बुजवून संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती करण्यात यश मिळविले आहे.पौर्णिमेला गावांच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना तब्बल २५ ठिकाणी ही मोठी भगदाडे पडून, समुद्राचे खारे पाणी गावांच्या भातशेतीत घुसून पुढे गावांत घरांच्या जोत्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या आपत्तीस सर्व ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. या २५ भगदाडांमध्ये चिखलमाती भरून ती बुजवून संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही, तर येत्या गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजीच्या अमावास्येला येणाºया मोठ्या उधाणाच्या भरतीचे पाणी याच २५ भगदाडांतून थेट घुसून पुढे शेती पार करून ग्रामस्थांच्या घरात घुसून मोठ्या आपत्तीस सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकी नैसर्गिक समस्या व शासकीय तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गावप्रमुख अमरनाथ विश्वनाथ भगत, महादेव सीताराम थळे, रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून ‘आपल्याला वाचायचे असेल, तर कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरुष व महिला यांनी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी) गुरुवारपासून येण्याचे आवाहन केले. त्यास ग्रामस्थ, शेतकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भंगार कोठ्यातील भगदाडे श्रमदानातून बांधली. तीन दिवसांच्या अथक कष्टाअंती शनिवारी संध्याकाळी २५ भगदाडे बुजवून संरक्षक बंधारे दुरुस्त करण्यात यश मिळाले असल्याची माहिती अमरनाथ विश्वनाथ भगत यांनी दिली आहे.संरक्षक बंधाºयांच्या भगदाडांच्या मोजमाप नोंदीशहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागांकडील संरक्षक बंधारे एकूण २५ ठिकाणी फुटले होते. या सर्व २५ भगदाडांची मोजमापे गावांतील तरुण शेतकºयांनी मोजून घेऊन त्यांच्या नोंदी करून ठवल्या आहेत. श्रमदानाने ही भगदाडे बुजवल्यावरही दुरुस्तीची मोजमापेही घेऊन त्यांच्याही रीतसर नोंदी करून ठेवल्या असल्याचे श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड