शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

श्रमदानातून बुजवली संरक्षण बंधा-यांची २५ भगदाडे श्रमिक मुक्तीदलाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:27 IST

अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती. गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ५६० स्त्री-पुरुष शेतक-यांनी श्रमदान करून चिखलमातीने बुजवून संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती करण्यात यश मिळविले आहे.पौर्णिमेला गावांच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना तब्बल २५ ठिकाणी ही मोठी भगदाडे पडून, समुद्राचे खारे पाणी गावांच्या भातशेतीत घुसून पुढे गावांत घरांच्या जोत्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या आपत्तीस सर्व ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. या २५ भगदाडांमध्ये चिखलमाती भरून ती बुजवून संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही, तर येत्या गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजीच्या अमावास्येला येणाºया मोठ्या उधाणाच्या भरतीचे पाणी याच २५ भगदाडांतून थेट घुसून पुढे शेती पार करून ग्रामस्थांच्या घरात घुसून मोठ्या आपत्तीस सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकी नैसर्गिक समस्या व शासकीय तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गावप्रमुख अमरनाथ विश्वनाथ भगत, महादेव सीताराम थळे, रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून ‘आपल्याला वाचायचे असेल, तर कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरुष व महिला यांनी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी) गुरुवारपासून येण्याचे आवाहन केले. त्यास ग्रामस्थ, शेतकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भंगार कोठ्यातील भगदाडे श्रमदानातून बांधली. तीन दिवसांच्या अथक कष्टाअंती शनिवारी संध्याकाळी २५ भगदाडे बुजवून संरक्षक बंधारे दुरुस्त करण्यात यश मिळाले असल्याची माहिती अमरनाथ विश्वनाथ भगत यांनी दिली आहे.संरक्षक बंधाºयांच्या भगदाडांच्या मोजमाप नोंदीशहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागांकडील संरक्षक बंधारे एकूण २५ ठिकाणी फुटले होते. या सर्व २५ भगदाडांची मोजमापे गावांतील तरुण शेतकºयांनी मोजून घेऊन त्यांच्या नोंदी करून ठवल्या आहेत. श्रमदानाने ही भगदाडे बुजवल्यावरही दुरुस्तीची मोजमापेही घेऊन त्यांच्याही रीतसर नोंदी करून ठेवल्या असल्याचे श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड