शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आगरदांडा-इंदापूर महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:17 IST

दिघी बंदराच्या विकासाला वेग : रस्ते कॉंक्रीटचे झाल्याने प्रवास झाला जलद

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : रायगड जिल्‍ह्यातील इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत रेवदंडा - इंदापूर हा मार्ग पर्यटन आणि बंदराच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून आता पर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे.  हा महामार्ग या गावातील पर्यटन,  व्यवसाय, व्यापा-यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यात दिघी बंदराचा संपूर्ण ताबा गौतम अदानी यांना मिळाल्यावर त्यांनी दिघी बंदराच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केल्याने या बंदराच्या विकासाला आता वेग प्राप्त झाला आहे.दिघी बंदराचा विकास जेएनपीटी बंदरासारखाच करणार असून, मालवाहतूक  हाताळणीचे पर्यायी केंद्र म्हणून दिघी बंदर विकसित करणार असल्याची घोषणा अदानी ग्रुपकडून करण्यात आल्याने आर्थिक घडामोडींचा वेग प्राप्त झाला आहे.बंदर वाहतुकीसाठी रस्ते हे सुसज्ज असावे यासाठी प्रथम रस्ते एमएसआरडीसीमार्फत विकसित करण्यात आले आहेत. आगरदांडा ते इंदापूर हा सर्व रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आलेला असून, या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या रस्त्यामुळे वाहतूक जलद झाली आहे. दिघी बंदरातील आलेला माल जलद गतीने रेल्वेच्या साह्याने पोहोचविण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर हा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून, बंदर विकासाचा हा पहिला टप्पा आहे. 

रस्त्यासाठी ११० कोटी   रुपये खर्च nरायगड जिल्‍ह्यातील इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत रेवदंडा- इंदापूर हा मार्ग पर्यटन आणि बंदराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.nकेंद्र शासनाच्या माध्यमातून हे रस्ते तयार करण्यात आले असून, जलद गतीने महामार्ग गाठण्यासाठी हा रस्ता खूप उपयोगी पडणार आहे. आगरदांडा ते इंदापूर रस्त्यासाठी सुमारे ११० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, मालवाहतुकीसाठी हा रस्ता मुख्य केंद्र असणारआहे.