शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

रामराजमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ?; गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:52 IST

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, ...

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, तसेच त्याबाबतचा पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने घेत रामराजच्या कारभाराची चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये दोषी आढळल्यास थेट कारवाईचे निर्देश गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्याने सरपंच आणि ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.अलिबाग तालुक्यात रामराज ग्रामपंचायत आहेत. गावातील विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही, १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोणत्या विकासकामांवर किती प्रमाणात खर्च केला, त्याचा ठेकेदार कोण होता याची माहिती ग्रामस्थांनी ग्रामसभेत मागितली होती. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली होती. सातत्याने माहिती मागूनही माहिती देण्यात येत नव्हती. मागील तीन वर्षातील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करत आहेत. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर, काही घरकूल न उभारताच निधीचा गैरवापर केल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले होते. त्याचप्रमाणे गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले होते. या प्रकरणी सदस्य नदीम बेबन यांच्यासह ग्रामस्थ संदीप पालकर यांनी सरपंच आणि ग्रामस्थांच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कारभाराला कंटाळून त्यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. तसेच त्याबाबतची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली होती. राज्यपालांकडे थेट तक्रार दाखल झाल्याने प्रशासनही आता खडबडून जागे झाले आहे. त्यांनीही आता तक्रारीचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत. रामराजच्या कारभारात काही अनियमितता आढळल्यास कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पुंड यांनी दिले आहेत.ग्रामस्थ सातत्याने तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने सरपंच आणि ग्रामस्थ कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते; परंतु जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाने सत्यबाहेर येणार आहे.-नदीम बेबन,सदस्य, रामराज ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड