शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रामराजमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ?; गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:52 IST

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, ...

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, तसेच त्याबाबतचा पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने घेत रामराजच्या कारभाराची चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये दोषी आढळल्यास थेट कारवाईचे निर्देश गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्याने सरपंच आणि ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.अलिबाग तालुक्यात रामराज ग्रामपंचायत आहेत. गावातील विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही, १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोणत्या विकासकामांवर किती प्रमाणात खर्च केला, त्याचा ठेकेदार कोण होता याची माहिती ग्रामस्थांनी ग्रामसभेत मागितली होती. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली होती. सातत्याने माहिती मागूनही माहिती देण्यात येत नव्हती. मागील तीन वर्षातील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करत आहेत. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर, काही घरकूल न उभारताच निधीचा गैरवापर केल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले होते. त्याचप्रमाणे गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले होते. या प्रकरणी सदस्य नदीम बेबन यांच्यासह ग्रामस्थ संदीप पालकर यांनी सरपंच आणि ग्रामस्थांच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कारभाराला कंटाळून त्यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. तसेच त्याबाबतची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली होती. राज्यपालांकडे थेट तक्रार दाखल झाल्याने प्रशासनही आता खडबडून जागे झाले आहे. त्यांनीही आता तक्रारीचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत. रामराजच्या कारभारात काही अनियमितता आढळल्यास कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पुंड यांनी दिले आहेत.ग्रामस्थ सातत्याने तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने सरपंच आणि ग्रामस्थ कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते; परंतु जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाने सत्यबाहेर येणार आहे.-नदीम बेबन,सदस्य, रामराज ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड