शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रामराजमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ?; गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:52 IST

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, ...

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, तसेच त्याबाबतचा पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने घेत रामराजच्या कारभाराची चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये दोषी आढळल्यास थेट कारवाईचे निर्देश गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्याने सरपंच आणि ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.अलिबाग तालुक्यात रामराज ग्रामपंचायत आहेत. गावातील विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही, १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोणत्या विकासकामांवर किती प्रमाणात खर्च केला, त्याचा ठेकेदार कोण होता याची माहिती ग्रामस्थांनी ग्रामसभेत मागितली होती. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली होती. सातत्याने माहिती मागूनही माहिती देण्यात येत नव्हती. मागील तीन वर्षातील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करत आहेत. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर, काही घरकूल न उभारताच निधीचा गैरवापर केल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले होते. त्याचप्रमाणे गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले होते. या प्रकरणी सदस्य नदीम बेबन यांच्यासह ग्रामस्थ संदीप पालकर यांनी सरपंच आणि ग्रामस्थांच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कारभाराला कंटाळून त्यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. तसेच त्याबाबतची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली होती. राज्यपालांकडे थेट तक्रार दाखल झाल्याने प्रशासनही आता खडबडून जागे झाले आहे. त्यांनीही आता तक्रारीचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत. रामराजच्या कारभारात काही अनियमितता आढळल्यास कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पुंड यांनी दिले आहेत.ग्रामस्थ सातत्याने तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने सरपंच आणि ग्रामस्थ कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते; परंतु जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाने सत्यबाहेर येणार आहे.-नदीम बेबन,सदस्य, रामराज ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड