शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

सर्वांनाच प्रतीक्षा जेएनपीटीच्या चौथ्या बंदराची, नोकरीच्या संधीमध्ये होणार वाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 06:38 IST

एनपीटी अंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, राज्याच्या व्यापारातही वृद्धी होणार आहे. त्याशिवाय जेएनपीटी नजीकच्या छोट्या बंदरामध्ये शिपिंग एजंट नोकरीच्या संधीमध्येही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढ अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटी अंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, राज्याच्या व्यापारातही वृद्धी होणार आहे. त्याशिवाय जेएनपीटी नजीकच्या छोट्या बंदरामध्ये शिपिंग एजंट नोकरीच्या संधीमध्येही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढ अपेक्षित आहे. यासाठी सर्वांनाच जेएनपीटीचे चौथे बंदर सुरू होण्याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया मुंबई आणि न्हावा-शेवा शिपिंग एजंट संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन विवेकसिंग आनंद यांनी व्यक्त केली.जेएनपीटी अंतर्गत उभारण्यात येणाºया भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या चौथ्या बंदराचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. देशातील सर्वाधिक लांबीचे आणि वर्षाकाठी ४८ लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेल्या बंदरावर ७ हजार ९१५ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. पहिला टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, या डिसेंबरअखेर कार्यान्वित होणार आहे. तर दुसºया टप्प्याचे काम २०२२पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तून उभारण्यात येणारा देशातील पहिलाच बंदर प्रकल्प आहे. चौथे बंदर सुरू होण्याची प्रतीक्षा देशातील व्यापाºयांबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापारी कंपन्यांनाही आहे. जेएनपीटीतून आयात-निर्यात होणाºया वाढत्या मालाची वाहतूक सध्या अन्य राज्यांतून करावी लागते. त्यामुळे चौथे बंदर कार्यान्वित होण्याची उत्कंठा शिपिंग कंपन्यांनाही लागून राहिली आहे. जेएनपीटीअंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे बंदरातील मालवाहतुकीत वाढ होणार असून व्यापारातही वृद्धी होणार आहे.जेएनपीटीअंतर्गत सुरू होणारे बीएमसीटी बंदर आयात-निर्यात व्यापारात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. माल हाताळणीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बीएमसीटी टर्मिनल जेएनपीटी बंदराचीही कार्यक्षमता वाढणार आहे. त्यामुळे त्याचा सर्व बाजूने फायदा सर्वांनाच होईल, अशी अपेक्षा इंडियन प्रायव्हेट पोर्ट्स अ‍ॅण्ड टर्मिनल असोसिएशन (आयपीपीटीए)चे अध्यक्ष आर. किशोर यांनी व्यक्त केली.आर्थिक विकास शक्यभारत मुंबई कंटेनर टर्मिनल अर्थात चौथे बंदर पीएसए या परदेशी गुंतवणूकदार कंपनीचे आहे. ही कंपनी भारतात सुमारे २० वर्षे काम करीत आहे. देशातील तुतिकोरीन, चेन्नई, कोलकाता, काकीनाडी या बंदरांचे व्यवस्थापनही पीएसए कंपनी करते.या चौथ्या बंदरात येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जेएनपीटीशी झालेल्या सवलत करारातील अटी-शर्तीचे पालन करीत नोकºया देण्यात आल्या आहेत. याची जेएनपीटीनेही पुष्टी केली असल्याचा दावा बीएमसीटी प्रकल्पअधिकाºयांकडून केला जात आहे. नव्याने सुरू होणाºया या चौथ्या बंदरात सर्वच स्तरावरील कंत्राटदारांसह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे अधिक रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकास शक्य होईल, असा दावाही बीएमसीटी प्रकल्प अधिकाºयांकडून केला जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई