शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२०१९मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणार - शिवसेना मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:14 IST

गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरवेल. मात्र, राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून २०१९च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा

महाड : गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरवेल. मात्र, राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून २०१९च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आमचा निर्धार असल्याचे वक्तव्य केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शनिवारी महाड येथे पत्रकारांशी बोलताना केले. राज्यामध्ये जरी शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव असला तरीकेंद्रात आम्ही (शिवसेना आणि भाजपा) एनडीए म्हणूनच निवडून आलेलो असल्यामुळे केंद्रात आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट के ले.शनिवारी महाडच्या दौºयावर आलेल्या अनंत गीते यांनी वेळात वेळ काढून पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर मते व्यक्त केली. आम्ही सत्तेत असू किंवा नसू, सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शिवसेना करेल, असे धोरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले होते. १९९५मध्ये राज्यात युतीचे सरकार असताना त्यांनी त्याच पद्धतीने काम केले आणि आता उद्धव ठाकरे सरकारवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे ते म्हणाले. २०१९च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच आम्ही त्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. रोहा येथे आयोजित केलेला निर्धार मेळावा त्याचाच एक भाग होता. असेच निर्धार मेळावे रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन येथेही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुन्हा लोकसभेमध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढत होईल का, असे विचारले असता त्यांनी निवडणूक लढवायची की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे; पण मागच्या निवडणुकीचा अनुभव विचारात घेता, सुनील तटकरे हे पुढील लोकसभा लढविण्याचे धाडस दाखवतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई-गोवा महामार्गाचे इंदापूर ते झाराप दरम्यानचे काम डिसेंबर २०१८पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल ते इंदापूर दरम्यानचे काम वादात अडकले आहे. मात्र, पनवेल ते वडखळ दरम्यानचे काम जे. एम. म्हात्रे हे करीत असून, ते हे काम वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी पंतप्रधान सडक योजना नव्याने सुरू होत असून, त्यामध्येही आपण काही रस्ते प्रस्तावित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महाड येथे लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येईल आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असेही गीते यांनी या वेळेस सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAnant Geeteअनंत गीते