शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दासगाव ते वीर दरम्यान काम रखडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:44 IST

वन विभागाकडून झाडे तोडण्यास तसेच माती भराव कामास आडकाठी आणली आहे. यामुळे चौपदरीकरणाचे काम रखडण्याचे संकेत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.

दासगाव : दासगावमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. वीर ते पोलादपूर दरम्यानचे काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीने घेतले आहे. महाड तालुक्यातील वीर-दासगाव या चार कि.मी. अंतरावर चौपदरीकरण कामात जवळपास १००० झाडे बाधित होत आहेत; पण वन विभागाकडून झाडे तोडण्यास तसेच माती भराव कामास आडकाठी आणली आहे. यामुळे चौपदरीकरणाचे काम रखडण्याचे संकेत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र, अनेक अडचणींमुळे हे काम आजही रखडले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न कायम राहिला आहे. अशा स्थितीत दुसºया टप्प्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने मंजुरी देत प्रकल्पग्रस्तांच्या जागा भूसंपादन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या मोबदल्याचेही वाटप सुरू केले. दुसºया टप्प्यातील वीर ते पोलादपूर दरम्यानच्या कामाला सुरुवात झाली. वीर ते दासगाव या दरम्यान असलेल्या जमिनी या वन विभागाच्या आहेत. यातील काही जमिनीवर वन विभागाचे ३५ कलम लागले आहे, यामुळे वन विभागाने या कामास आडकाठी आणली आहे.दासगाव गावातील जवळपास सहा सात-बारा, तर वीर गावातील सहा सात-बारा दाखल्यांवर वन विभागाचा शिक्का आहे. यातील काही जमिनीवर ३५ कलम, तर काही सात-बारा उताºयांवर वने असे नमूद केले आहे. यामुळे या जमिनीवर महामार्गाचे कोणतेच काम करता येणार नाही. याकरिता केंद्र सरकारच्या वन विभागाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. यामुळे सद्यस्थितीत हे काम कंपनीकडून स्थगित केले आहे. जर काम सुरू केले, तर वन विभाग यंत्र जप्ती करेल, अशी तोंडी धमकी दिल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या या महामार्ग प्रकल्पाला शासनाच्या वन विभागाकडूनच आडकाठी आणल्याचे दिसून येत आहे.महामार्गाच्या दुसºया टप्प्याचे काम आॅक्टोबर २०१९पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, सातत्याने येणाºया अडचणींमुळे हे काम पुढे जाण्याची शक्यता आहे. आता पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. यामुळे आता हे काम दिलेल्या मुदतीत कसे पूर्ण होणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र शासनाचा महामार्ग विभाग आता याबाबत काय पावले उचलतो, याकडे लक्ष लागले आहे.या जमिनीवर केवळ वृक्षलागवडवन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीशेजारील खासगी मालकांच्या जमिनी भविष्यातील तरतुदीकरिता तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनीच्या सात-बारा उताºयावर वन विभागाचा शिक्का आणि वन शब्द नमूद केला आहे. यामुळे या जमिनीच्या सात-बारा उताºयावर वन विभागाचा शिक्का असला तरी या जमिनी मालकांच्या ताब्यातच आहेत. या जमिनी वनेत्तर कामासाठी वापरता येत नाहीत, या जमिनीवर केवळ वृक्षलागवड करता येणार आहे. तर महसूल विभागाच्या ताब्यातील जमिनींवर वने असा उल्लेख आहे.यापूर्वीही वन विभागाची आडकाठीमहामार्गाच्या दासगाव दरम्यान असलेल्या खिंडीत आजवर अनेक अपघात झाले होते. याचा विचार करून महामार्ग विभागाने काही धोकादायक स्थळे रुंद करण्याचे काम हाती घेतले होते. त्या दरम्यानही वन विभागाने अशाच पद्धतीने आडकाठी आणली होती. आजही ही परवानगी दिलेली नाही. आता महामार्गाचे चौपदरीकरण येथेच अडकले आहे. वन विभागाच्या ताब्यातील या जमिनीवर काम करण्यास वन विभागाने मनाई केली आहे.१००० झाडांची तोड करण्यास परवानगी नाकारलीदासगाव ते वीर विभागात महामार्गाच्या चौपदरीकरण कामात जवळपास १००० झाडे बाधित होत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.सरकारी काम वर्षभर थांबसरकारी कामाचा अनुभव कायम सर्वसामान्य नागरिकांना येत असतो. अनेक वर्षे आणि अनेक फेºया माराव्या लागत असल्याने, ‘सरकारी काम अन् वर्षभर थांब’ ही म्हण अस्तित्वात आली. याचा अनुभव सरकारी खात्यालाच आता आला आहे. केंद्र शासनाने महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाला तत्काळ सर्व परवानग्या दोन महिन्यांत देण्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप वन विभागाची परवानगी न मिळाल्याने दासगाव ते वीर दरम्यानचे काम रखडल्याने, ‘सरकारी काम आणि वर्षभर थांब’ हा अनुभव शासनालाच आला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक