शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

दासगाव ते वीर दरम्यान काम रखडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:44 IST

वन विभागाकडून झाडे तोडण्यास तसेच माती भराव कामास आडकाठी आणली आहे. यामुळे चौपदरीकरणाचे काम रखडण्याचे संकेत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.

दासगाव : दासगावमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. वीर ते पोलादपूर दरम्यानचे काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीने घेतले आहे. महाड तालुक्यातील वीर-दासगाव या चार कि.मी. अंतरावर चौपदरीकरण कामात जवळपास १००० झाडे बाधित होत आहेत; पण वन विभागाकडून झाडे तोडण्यास तसेच माती भराव कामास आडकाठी आणली आहे. यामुळे चौपदरीकरणाचे काम रखडण्याचे संकेत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र, अनेक अडचणींमुळे हे काम आजही रखडले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न कायम राहिला आहे. अशा स्थितीत दुसºया टप्प्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने मंजुरी देत प्रकल्पग्रस्तांच्या जागा भूसंपादन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या मोबदल्याचेही वाटप सुरू केले. दुसºया टप्प्यातील वीर ते पोलादपूर दरम्यानच्या कामाला सुरुवात झाली. वीर ते दासगाव या दरम्यान असलेल्या जमिनी या वन विभागाच्या आहेत. यातील काही जमिनीवर वन विभागाचे ३५ कलम लागले आहे, यामुळे वन विभागाने या कामास आडकाठी आणली आहे.दासगाव गावातील जवळपास सहा सात-बारा, तर वीर गावातील सहा सात-बारा दाखल्यांवर वन विभागाचा शिक्का आहे. यातील काही जमिनीवर ३५ कलम, तर काही सात-बारा उताºयांवर वने असे नमूद केले आहे. यामुळे या जमिनीवर महामार्गाचे कोणतेच काम करता येणार नाही. याकरिता केंद्र सरकारच्या वन विभागाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. यामुळे सद्यस्थितीत हे काम कंपनीकडून स्थगित केले आहे. जर काम सुरू केले, तर वन विभाग यंत्र जप्ती करेल, अशी तोंडी धमकी दिल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या या महामार्ग प्रकल्पाला शासनाच्या वन विभागाकडूनच आडकाठी आणल्याचे दिसून येत आहे.महामार्गाच्या दुसºया टप्प्याचे काम आॅक्टोबर २०१९पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, सातत्याने येणाºया अडचणींमुळे हे काम पुढे जाण्याची शक्यता आहे. आता पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. यामुळे आता हे काम दिलेल्या मुदतीत कसे पूर्ण होणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र शासनाचा महामार्ग विभाग आता याबाबत काय पावले उचलतो, याकडे लक्ष लागले आहे.या जमिनीवर केवळ वृक्षलागवडवन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीशेजारील खासगी मालकांच्या जमिनी भविष्यातील तरतुदीकरिता तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनीच्या सात-बारा उताºयावर वन विभागाचा शिक्का आणि वन शब्द नमूद केला आहे. यामुळे या जमिनीच्या सात-बारा उताºयावर वन विभागाचा शिक्का असला तरी या जमिनी मालकांच्या ताब्यातच आहेत. या जमिनी वनेत्तर कामासाठी वापरता येत नाहीत, या जमिनीवर केवळ वृक्षलागवड करता येणार आहे. तर महसूल विभागाच्या ताब्यातील जमिनींवर वने असा उल्लेख आहे.यापूर्वीही वन विभागाची आडकाठीमहामार्गाच्या दासगाव दरम्यान असलेल्या खिंडीत आजवर अनेक अपघात झाले होते. याचा विचार करून महामार्ग विभागाने काही धोकादायक स्थळे रुंद करण्याचे काम हाती घेतले होते. त्या दरम्यानही वन विभागाने अशाच पद्धतीने आडकाठी आणली होती. आजही ही परवानगी दिलेली नाही. आता महामार्गाचे चौपदरीकरण येथेच अडकले आहे. वन विभागाच्या ताब्यातील या जमिनीवर काम करण्यास वन विभागाने मनाई केली आहे.१००० झाडांची तोड करण्यास परवानगी नाकारलीदासगाव ते वीर विभागात महामार्गाच्या चौपदरीकरण कामात जवळपास १००० झाडे बाधित होत आहेत. वन विभागाने आडकाठी आणल्याने या झाडांची तोड सध्या थांबली आहे.सरकारी काम वर्षभर थांबसरकारी कामाचा अनुभव कायम सर्वसामान्य नागरिकांना येत असतो. अनेक वर्षे आणि अनेक फेºया माराव्या लागत असल्याने, ‘सरकारी काम अन् वर्षभर थांब’ ही म्हण अस्तित्वात आली. याचा अनुभव सरकारी खात्यालाच आता आला आहे. केंद्र शासनाने महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाला तत्काळ सर्व परवानग्या दोन महिन्यांत देण्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप वन विभागाची परवानगी न मिळाल्याने दासगाव ते वीर दरम्यानचे काम रखडल्याने, ‘सरकारी काम आणि वर्षभर थांब’ हा अनुभव शासनालाच आला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक