शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रुंदीकरण रखडल्याने पर्यटकांना फटका; राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:30 IST

अलिबाग - वडखळ मार्ग : राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे

अलिबाग : अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या महामार्गाच्या रुंदीकरणाकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सुट्टीच्या काळात अलिबागला येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येने या मार्गावर लांब रांगा लागत आहेत. 

अलिबाग तालुक्यात सारळ, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौले, तसेच रेवदंड्याला समुद्रकिनारा लाभलेला असून, तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आहेत. त्यातच राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन सहली लक्षात घेता, या मार्गाचे रुंदीकरण आवश्यक होते. त्यासाठी अलिबागच्या सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारित अलिबाग ते वडखळ हा २३ किमीचा मार्ग केंद्राने चौपदरीकरणासाठी आपल्याकडे हस्तांतरित केला होता, परंतु भूसंपादनासाठी लागणारी मोठी रक्कम देण्यास केंद्र सरकार तयार नसल्याने दुपदरीकरणाचा प्रस्ताव पुढे आला.

परंतु, तोही प्रस्ताव बारगळला. त्यानंतर केंद्राने हा मार्ग परत राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारने केंद्राकडून हस्तांतरित करून घेण्यास नकार दिल्याने, आता या मार्गाचे नूतनीकरण कोणी करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या मार्गाचे रुंदीकरण रखडल्याने या मार्गावर सुट्टीच्या काळात वाहतूककोंडी होत असते. हा प्रश्न कधी सुटणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

अलिबाग तालुक्यातील अलिबाग, नागाव, आक्षी, किहीम, वरसोली, चौल, रेवदंडा, तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड, राजपुरी, आगरदांडा या पर्यटनस्थळी जाण्यासाठी अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या मार्गाचा वापर सर्वच जण करीत असतात. त्यामुळे अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे असताना, त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे.    - जितेंद्र म्हात्रे, पर्यटक, मुंबई

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड