शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात पुराचे पाणी तब्बल ४८ तास जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:39 IST

कुंडलिकेच्या पातळीत वाढ; अतिक्रमणामुळे साचतेय पाणी

रोहा : कुंडलिका नदीला पूर येऊन रोह्यात शुक्रवारी रात्री निर्माण झालेली पूरपरिस्थिती रविवारीही कायम राहिली आहे. शनिवारी रात्री केवळ चार तास नदीची पाणी पातळी ओसरली होती, मात्र पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊन पूरपरिस्थिती जैसे थे राहिली आहे. निसर्गाच्या प्रकोपासह मानवी अतिक्रमणाचा फटका रोहेकरांना बसला असून पुराचे पाणी तब्बल ४८ तास राहिले आहे, तर रोठ गावात भरलेले पुराचे पाणी गेले ३ दिवस जैसे थे आहे. पाण्याचा विसर्ग होत नसल्याने रोहेकर मात्र चांगलेच चिंतेत आहेत.गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला शुक्रवारी रात्री पूर आला. नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली, पुराचे पाणी रोहा अष्टमी शहरासह वरसे, रोठ आणि धाटाव गावांत शिरले. निसर्गाच्या प्रकोप, लहरी वृत्ती बरोबरच नदी पात्रात झालेल्या मानवी अतिक्रमणाचा रोहेकरांना यंदा हा वेगळा अनुभव येत आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी अनुक्रमे २९ आणि ४८ तास राहिलेली पूरपरिस्थितीमुळे रोहेकरांना चांगलाच फटका बसला.अष्टमीत पाणी भरल्याने रोहा अष्टमी शहरासह नदीच्या दोन्ही बाजूकडील संपर्क खंडित राहिला. पर्जन्यवृष्टीने पूल ओसंडून गेले, वस्तींमधून पाणी शिरले मात्र पाण्याचा निचरा नेहमीप्रमाणेच झाला नाही. यंदा वाढलेली पाणी पातळी दीर्घकाळ राहिली आहे. नदीचा प्रवाह मयार्दीत होण्या मागील कारणांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेणे जरूरी आहे. गेल्या नऊ दिवसात दोन तीन वेळा या प्रसंगाना सामोरे जावे लागले आहे.नदी संवर्धनात मोठ्या प्रमाणात भराव झाला आहे, या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट लोणेरा विद्यापीठाकडून करून घ्यावे अशी आमची मागणी आहे. तसे आॅडिट करण्यास हरकत नाही असे मुख्याधिकारी रोहा यांनी लेखी दिले, मात्र पुढे काहीच केले नाही. हे आॅडिट या संस्थेकडून करून घेऊन त्याबाबतचा अहवाल नागरिकांपुढे खुला करावा.- नितीन परब, अध्यक्ष सिटीझंस फोरम, रोहारोह्यामध्ये २९५.०० मि.मी. पाऊस पडून सुध्दा बाजारपेठमध्ये पाणी आलेल नाही, काही भागात जे पाणी आलय ते सखल भाग असल्याने आलेले आहे. कुंडलिका नदीच्या झालेल्या संवर्धन कामामुळेच सर्व नागरिक मोकळा श्वास घेत आहेत.- महेंद्र दिवेकर, उपनगराध्यक्ष, रोहा नगरपरिषदअतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी २९ आणि ४८ तास पूरपरिस्थिती राहिली, नदी पात्रात होत असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे पाण्याचा विसर्ग होत नाही, पाणी मागे फिरून लागतच्या गावात शिरत आहे.- दिलीप वडके, संस्थापक कुंडलिका नदी संघर्ष समिती

टॅग्स :floodपूर