शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

रोह्यात पुराचे पाणी तब्बल ४८ तास जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:39 IST

कुंडलिकेच्या पातळीत वाढ; अतिक्रमणामुळे साचतेय पाणी

रोहा : कुंडलिका नदीला पूर येऊन रोह्यात शुक्रवारी रात्री निर्माण झालेली पूरपरिस्थिती रविवारीही कायम राहिली आहे. शनिवारी रात्री केवळ चार तास नदीची पाणी पातळी ओसरली होती, मात्र पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊन पूरपरिस्थिती जैसे थे राहिली आहे. निसर्गाच्या प्रकोपासह मानवी अतिक्रमणाचा फटका रोहेकरांना बसला असून पुराचे पाणी तब्बल ४८ तास राहिले आहे, तर रोठ गावात भरलेले पुराचे पाणी गेले ३ दिवस जैसे थे आहे. पाण्याचा विसर्ग होत नसल्याने रोहेकर मात्र चांगलेच चिंतेत आहेत.गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला शुक्रवारी रात्री पूर आला. नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली, पुराचे पाणी रोहा अष्टमी शहरासह वरसे, रोठ आणि धाटाव गावांत शिरले. निसर्गाच्या प्रकोप, लहरी वृत्ती बरोबरच नदी पात्रात झालेल्या मानवी अतिक्रमणाचा रोहेकरांना यंदा हा वेगळा अनुभव येत आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी अनुक्रमे २९ आणि ४८ तास राहिलेली पूरपरिस्थितीमुळे रोहेकरांना चांगलाच फटका बसला.अष्टमीत पाणी भरल्याने रोहा अष्टमी शहरासह नदीच्या दोन्ही बाजूकडील संपर्क खंडित राहिला. पर्जन्यवृष्टीने पूल ओसंडून गेले, वस्तींमधून पाणी शिरले मात्र पाण्याचा निचरा नेहमीप्रमाणेच झाला नाही. यंदा वाढलेली पाणी पातळी दीर्घकाळ राहिली आहे. नदीचा प्रवाह मयार्दीत होण्या मागील कारणांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेणे जरूरी आहे. गेल्या नऊ दिवसात दोन तीन वेळा या प्रसंगाना सामोरे जावे लागले आहे.नदी संवर्धनात मोठ्या प्रमाणात भराव झाला आहे, या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट लोणेरा विद्यापीठाकडून करून घ्यावे अशी आमची मागणी आहे. तसे आॅडिट करण्यास हरकत नाही असे मुख्याधिकारी रोहा यांनी लेखी दिले, मात्र पुढे काहीच केले नाही. हे आॅडिट या संस्थेकडून करून घेऊन त्याबाबतचा अहवाल नागरिकांपुढे खुला करावा.- नितीन परब, अध्यक्ष सिटीझंस फोरम, रोहारोह्यामध्ये २९५.०० मि.मी. पाऊस पडून सुध्दा बाजारपेठमध्ये पाणी आलेल नाही, काही भागात जे पाणी आलय ते सखल भाग असल्याने आलेले आहे. कुंडलिका नदीच्या झालेल्या संवर्धन कामामुळेच सर्व नागरिक मोकळा श्वास घेत आहेत.- महेंद्र दिवेकर, उपनगराध्यक्ष, रोहा नगरपरिषदअतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी २९ आणि ४८ तास पूरपरिस्थिती राहिली, नदी पात्रात होत असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे पाण्याचा विसर्ग होत नाही, पाणी मागे फिरून लागतच्या गावात शिरत आहे.- दिलीप वडके, संस्थापक कुंडलिका नदी संघर्ष समिती

टॅग्स :floodपूर