शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

रोह्यात पुराचे पाणी तब्बल ४८ तास जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:39 IST

कुंडलिकेच्या पातळीत वाढ; अतिक्रमणामुळे साचतेय पाणी

रोहा : कुंडलिका नदीला पूर येऊन रोह्यात शुक्रवारी रात्री निर्माण झालेली पूरपरिस्थिती रविवारीही कायम राहिली आहे. शनिवारी रात्री केवळ चार तास नदीची पाणी पातळी ओसरली होती, मात्र पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊन पूरपरिस्थिती जैसे थे राहिली आहे. निसर्गाच्या प्रकोपासह मानवी अतिक्रमणाचा फटका रोहेकरांना बसला असून पुराचे पाणी तब्बल ४८ तास राहिले आहे, तर रोठ गावात भरलेले पुराचे पाणी गेले ३ दिवस जैसे थे आहे. पाण्याचा विसर्ग होत नसल्याने रोहेकर मात्र चांगलेच चिंतेत आहेत.गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला शुक्रवारी रात्री पूर आला. नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली, पुराचे पाणी रोहा अष्टमी शहरासह वरसे, रोठ आणि धाटाव गावांत शिरले. निसर्गाच्या प्रकोप, लहरी वृत्ती बरोबरच नदी पात्रात झालेल्या मानवी अतिक्रमणाचा रोहेकरांना यंदा हा वेगळा अनुभव येत आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी अनुक्रमे २९ आणि ४८ तास राहिलेली पूरपरिस्थितीमुळे रोहेकरांना चांगलाच फटका बसला.अष्टमीत पाणी भरल्याने रोहा अष्टमी शहरासह नदीच्या दोन्ही बाजूकडील संपर्क खंडित राहिला. पर्जन्यवृष्टीने पूल ओसंडून गेले, वस्तींमधून पाणी शिरले मात्र पाण्याचा निचरा नेहमीप्रमाणेच झाला नाही. यंदा वाढलेली पाणी पातळी दीर्घकाळ राहिली आहे. नदीचा प्रवाह मयार्दीत होण्या मागील कारणांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेणे जरूरी आहे. गेल्या नऊ दिवसात दोन तीन वेळा या प्रसंगाना सामोरे जावे लागले आहे.नदी संवर्धनात मोठ्या प्रमाणात भराव झाला आहे, या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट लोणेरा विद्यापीठाकडून करून घ्यावे अशी आमची मागणी आहे. तसे आॅडिट करण्यास हरकत नाही असे मुख्याधिकारी रोहा यांनी लेखी दिले, मात्र पुढे काहीच केले नाही. हे आॅडिट या संस्थेकडून करून घेऊन त्याबाबतचा अहवाल नागरिकांपुढे खुला करावा.- नितीन परब, अध्यक्ष सिटीझंस फोरम, रोहारोह्यामध्ये २९५.०० मि.मी. पाऊस पडून सुध्दा बाजारपेठमध्ये पाणी आलेल नाही, काही भागात जे पाणी आलय ते सखल भाग असल्याने आलेले आहे. कुंडलिका नदीच्या झालेल्या संवर्धन कामामुळेच सर्व नागरिक मोकळा श्वास घेत आहेत.- महेंद्र दिवेकर, उपनगराध्यक्ष, रोहा नगरपरिषदअतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी २९ आणि ४८ तास पूरपरिस्थिती राहिली, नदी पात्रात होत असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे पाण्याचा विसर्ग होत नाही, पाणी मागे फिरून लागतच्या गावात शिरत आहे.- दिलीप वडके, संस्थापक कुंडलिका नदी संघर्ष समिती

टॅग्स :floodपूर