शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोण होणार विजयी?

By admin | Updated: February 23, 2017 06:13 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानोत्तर अंदाजानंतर शेकाप हा सर्वाधिक जागा जिंकण्याची

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानोत्तर अंदाजानंतर शेकाप हा सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांची पीछेहाट होऊन त्याचा फायदा हा भाजपाला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हे राजकीय गणित जुळल्यास जिल्हा परिषदेवर शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल होणार असल्याचे झालेल्या मतदानाच्या संख्येवरून दिसून येते. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान पार पडले. जिल्ह्यात ७०.९७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पनवेल तालुक्यात ८० टक्के झाले, त्याखालोखाल कर्जत ७९ टक्के, खालापूर ७६ टक्के, अलिबाग ७४ टक्के असे मतदान झाले. तळा तालुक्यामध्ये सर्वात कमी ५८ टक्के मतदान झाले आहे. जास्त संख्येने झालेले मतदान हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतदान असते; परंतु जिल्ह्यात केवळ ७१ टक्केच मतदान झाल्याने ते सत्ताधाऱ्यांसाठी पूरक ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.झालेल्या मतदानाच्या संख्येवरून शेकापला २१ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १७ जागांचा फायदा होऊ शकतो. शिवसेनेला फक्त १३ ते १५ जागांवर समाधान मानावे लागणार असे दिसते, तर भाजपाला पाच ते सात आणि काँग्रेसला केवळ तीन ते चार जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे राजकीय चित्र आहे. भाजपाने ३९ जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेसच्या गेल्या निवडणुकीमध्ये काळुंद्रे, वडघर, रावे, जासई, कोप्रोली, वहुर आणि पोलादपूर येथे जिल्हा परिषदेच्या सात जागा निवडून आल्या होत्या. या वेळी मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे खरे ठरले, तर त्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शेकापकडे १९ जागांचे संख्याबळ होते. शिवसेनेकडे १४ जागा होत्या. मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला नाही, तर त्यामध्ये एका जागेची घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या निवडणुकीत २१ जागा होत्या. राजकीय विश्लेषकांनी अंदाज वर्तविला असला तरी खरे चित्र गुरुवार, २३ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.