शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

घसरलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 04:20 IST

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे दोन टक्क्यांनी घसरला.

आविष्कार देसाई

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे दोन टक्क्यांनी घसरला. २०१४ साली ६४.५७ टक्के झालेल्या मतदानाचा फायदा तीन मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना, तर तीन मतदारसंघांत तटकरेंना झाला होता. २०१९ साली ६२.७७ टक्केच मतदान झाले आहे, त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फायदा किंवा फटका कुणाला बसणार? हे मतपेटी उघडल्यावरच कळेल.

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, आघाडीचे सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन दोन्ही उमेदवारांनी केले होते. मात्र, या वेळेला कमी संख्येने मतदार मतदानाला बाहेर पडला. वाढणारे तापमान त्यासाठी काही अंशी मारक ठरल्याचे बोलले जाते.रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा सुमारे सव्वा लाख नवमतदारांची नोंदणी झाली. २०१४ साली गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी मताधिक्यघेतले होते. तेथे ६४.१४ टक्के मतदान झाले होते. दापोलीमध्ये गीतेंना मताधिक्य प्राप्त झाले होते. या मतदारसंघामध्ये ६२.७१ मतदान झाल्याचा फायदा गीतेंना झाला होता. महाडमध्येही ६२.०३ टक्के मतदानाचा फायदा गीतेंनाच झाला होता. श्रीवर्धन मतदारसंघात ६४.२० टक्के मतांचा फायदा हा तटकरे यांच्यासाठी दिलासादायक ठरल्याने त्यांनी येथे लीड घेतले होते. अलिबागमध्ये सर्वाधिक ६७.९० टक्के मतदान झाले होते. त्याचाही फायदा तटकरे यांच्याच पारड्यात पडला होता. पेण विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथील ६५.७७ टक्के मतदानाचा थेट फायदा गीतेंना मिळाला होता, त्यानुसार गीते हे दोन हजार ११० मतांनी विजयी झाले होते.

२०१९ झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यास गुहागर मतदारसंघात या वेळेला ५९.१९ टक्केच मतदान झाले आहे. २०१४ साली ६४.१४ टक्के मतदान झाल्याने तटकरेंसाठी जमेचे ठरले होते. आता तेथे झालेल्या कमी मतांचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दापोलीमध्ये ६१.५६ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ६२ टक्के झालेल्या मतदानाचा फायदा गीतेंना झाला होता. महाड विधानसभा मतदारसंघात ५९.१९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ६२.०३ टक्के मतदानाचा फायदा गीतेंना मिळाला होता, त्यामुळे कमी झालेले मतदान तटकरे यांच्या पथ्यावर पडणार का हे लवकरच समोर येणार आहे. श्रीवर्धनमध्ये ५९.५९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी येथे ६४.२० टक्के मतदान झाले होते. त्याचा लाभ हा तटकरेंना झाला होता. आताच्या कमी मतांचा फटका नक्की कोणाला बसणार हे अद्याप कळायचे बाकी आहे. अलिबाग मतदारसंघामध्ये ६४.८९ टक्के मतदान झाले आहे. तर गेल्या वेळी हाच आकडा तब्बल ६७.९० टक्के होता, त्या वेळी तटकरेंच्या फायद्याचे होते. आता कमी झालेले मतदान कोणाकडे झुकते हे पाहावे लागणार आहे. पेण मतदारसंघात ६५.१७ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीचा आकडा पाहिल्यास ६५.७७ जवळ-जवळ सारखाच आहे. तेव्हा गीतेंच्या बाजूने मतदान झुकले होते. आता पेणच्या मतदाराने कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकले हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकraigad-pcरायगड