शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घसरलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 04:20 IST

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे दोन टक्क्यांनी घसरला.

आविष्कार देसाई

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे दोन टक्क्यांनी घसरला. २०१४ साली ६४.५७ टक्के झालेल्या मतदानाचा फायदा तीन मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना, तर तीन मतदारसंघांत तटकरेंना झाला होता. २०१९ साली ६२.७७ टक्केच मतदान झाले आहे, त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फायदा किंवा फटका कुणाला बसणार? हे मतपेटी उघडल्यावरच कळेल.

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, आघाडीचे सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन दोन्ही उमेदवारांनी केले होते. मात्र, या वेळेला कमी संख्येने मतदार मतदानाला बाहेर पडला. वाढणारे तापमान त्यासाठी काही अंशी मारक ठरल्याचे बोलले जाते.रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा सुमारे सव्वा लाख नवमतदारांची नोंदणी झाली. २०१४ साली गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी मताधिक्यघेतले होते. तेथे ६४.१४ टक्के मतदान झाले होते. दापोलीमध्ये गीतेंना मताधिक्य प्राप्त झाले होते. या मतदारसंघामध्ये ६२.७१ मतदान झाल्याचा फायदा गीतेंना झाला होता. महाडमध्येही ६२.०३ टक्के मतदानाचा फायदा गीतेंनाच झाला होता. श्रीवर्धन मतदारसंघात ६४.२० टक्के मतांचा फायदा हा तटकरे यांच्यासाठी दिलासादायक ठरल्याने त्यांनी येथे लीड घेतले होते. अलिबागमध्ये सर्वाधिक ६७.९० टक्के मतदान झाले होते. त्याचाही फायदा तटकरे यांच्याच पारड्यात पडला होता. पेण विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथील ६५.७७ टक्के मतदानाचा थेट फायदा गीतेंना मिळाला होता, त्यानुसार गीते हे दोन हजार ११० मतांनी विजयी झाले होते.

२०१९ झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यास गुहागर मतदारसंघात या वेळेला ५९.१९ टक्केच मतदान झाले आहे. २०१४ साली ६४.१४ टक्के मतदान झाल्याने तटकरेंसाठी जमेचे ठरले होते. आता तेथे झालेल्या कमी मतांचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दापोलीमध्ये ६१.५६ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ६२ टक्के झालेल्या मतदानाचा फायदा गीतेंना झाला होता. महाड विधानसभा मतदारसंघात ५९.१९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ६२.०३ टक्के मतदानाचा फायदा गीतेंना मिळाला होता, त्यामुळे कमी झालेले मतदान तटकरे यांच्या पथ्यावर पडणार का हे लवकरच समोर येणार आहे. श्रीवर्धनमध्ये ५९.५९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी येथे ६४.२० टक्के मतदान झाले होते. त्याचा लाभ हा तटकरेंना झाला होता. आताच्या कमी मतांचा फटका नक्की कोणाला बसणार हे अद्याप कळायचे बाकी आहे. अलिबाग मतदारसंघामध्ये ६४.८९ टक्के मतदान झाले आहे. तर गेल्या वेळी हाच आकडा तब्बल ६७.९० टक्के होता, त्या वेळी तटकरेंच्या फायद्याचे होते. आता कमी झालेले मतदान कोणाकडे झुकते हे पाहावे लागणार आहे. पेण मतदारसंघात ६५.१७ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीचा आकडा पाहिल्यास ६५.७७ जवळ-जवळ सारखाच आहे. तेव्हा गीतेंच्या बाजूने मतदान झुकले होते. आता पेणच्या मतदाराने कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकले हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकraigad-pcरायगड