शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

घसरलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 04:20 IST

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे दोन टक्क्यांनी घसरला.

आविष्कार देसाई

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे दोन टक्क्यांनी घसरला. २०१४ साली ६४.५७ टक्के झालेल्या मतदानाचा फायदा तीन मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना, तर तीन मतदारसंघांत तटकरेंना झाला होता. २०१९ साली ६२.७७ टक्केच मतदान झाले आहे, त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फायदा किंवा फटका कुणाला बसणार? हे मतपेटी उघडल्यावरच कळेल.

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, आघाडीचे सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन दोन्ही उमेदवारांनी केले होते. मात्र, या वेळेला कमी संख्येने मतदार मतदानाला बाहेर पडला. वाढणारे तापमान त्यासाठी काही अंशी मारक ठरल्याचे बोलले जाते.रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा सुमारे सव्वा लाख नवमतदारांची नोंदणी झाली. २०१४ साली गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी मताधिक्यघेतले होते. तेथे ६४.१४ टक्के मतदान झाले होते. दापोलीमध्ये गीतेंना मताधिक्य प्राप्त झाले होते. या मतदारसंघामध्ये ६२.७१ मतदान झाल्याचा फायदा गीतेंना झाला होता. महाडमध्येही ६२.०३ टक्के मतदानाचा फायदा गीतेंनाच झाला होता. श्रीवर्धन मतदारसंघात ६४.२० टक्के मतांचा फायदा हा तटकरे यांच्यासाठी दिलासादायक ठरल्याने त्यांनी येथे लीड घेतले होते. अलिबागमध्ये सर्वाधिक ६७.९० टक्के मतदान झाले होते. त्याचाही फायदा तटकरे यांच्याच पारड्यात पडला होता. पेण विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथील ६५.७७ टक्के मतदानाचा थेट फायदा गीतेंना मिळाला होता, त्यानुसार गीते हे दोन हजार ११० मतांनी विजयी झाले होते.

२०१९ झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यास गुहागर मतदारसंघात या वेळेला ५९.१९ टक्केच मतदान झाले आहे. २०१४ साली ६४.१४ टक्के मतदान झाल्याने तटकरेंसाठी जमेचे ठरले होते. आता तेथे झालेल्या कमी मतांचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दापोलीमध्ये ६१.५६ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ६२ टक्के झालेल्या मतदानाचा फायदा गीतेंना झाला होता. महाड विधानसभा मतदारसंघात ५९.१९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ६२.०३ टक्के मतदानाचा फायदा गीतेंना मिळाला होता, त्यामुळे कमी झालेले मतदान तटकरे यांच्या पथ्यावर पडणार का हे लवकरच समोर येणार आहे. श्रीवर्धनमध्ये ५९.५९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी येथे ६४.२० टक्के मतदान झाले होते. त्याचा लाभ हा तटकरेंना झाला होता. आताच्या कमी मतांचा फटका नक्की कोणाला बसणार हे अद्याप कळायचे बाकी आहे. अलिबाग मतदारसंघामध्ये ६४.८९ टक्के मतदान झाले आहे. तर गेल्या वेळी हाच आकडा तब्बल ६७.९० टक्के होता, त्या वेळी तटकरेंच्या फायद्याचे होते. आता कमी झालेले मतदान कोणाकडे झुकते हे पाहावे लागणार आहे. पेण मतदारसंघात ६५.१७ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीचा आकडा पाहिल्यास ६५.७७ जवळ-जवळ सारखाच आहे. तेव्हा गीतेंच्या बाजूने मतदान झुकले होते. आता पेणच्या मतदाराने कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकले हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकraigad-pcरायगड