शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारचा पांढरा हत्ती

By admin | Updated: September 9, 2016 03:09 IST

जलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागजलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने सुमारे १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र संरक्षीत झाल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाने केला आहे. यासाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्ची पडल्याने एक टीसीएम पाणी संरक्षीत करण्यासाठी तब्बल ८१ हजार ९१७ रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही पांढरा हत्ती पोसण्याचाच प्रकार असल्याचे बोलले जाते. निकषाला धरुन वैज्ञानिक पध्दतीने योजना राबविल्यास खर्च कमी होऊ शकतो, असे मत शेतकरी संघटनेच्या प्रतिनीधींनी व्यक्त केले.रायगड जिल्ह्यातमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा प्रचंड गाजावाजा करुन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ४५ गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली. २०१५-१६ साठी ९९१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी सुमारे ३२ कोटी ७५ लाख ६६ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे सिध्दीविनायक ट्रस्ट आणि साईबाब संस्थान यांनी सुमारे दोन कोटी रुपयांची मदतीचा हात दिला होता.२०१५-१६ या कालावधीत ९९१ पैकी ९२२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी सुमारे २७ कोटी दोन लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले. एवढ्या मोठ्या संखेने निधी खर्च केल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणी राबविलेल्या या प्रकल्पामुळे तीन हजार २९६.३९ टीसीएम पाण्याचा साठा करण्यात जिल्हा कृषी विभागाला यश आले आहे. या साठलेल्या पाण्याचा वापर १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र भिजण्यास करता येणार असल्याचा दावा जिल्हा कृषी अधिक्षक विभागाने केला आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार प्रकल्पामुळे परिसरातील विहीरी, हौद यांच्या पाणी पातळीत वाढही झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. परंतु पाणी साठ्यात वाढ झाली याची मोजदाद कोणी केली, कशी केली असा प्रश्न विविध शेतकरी संघटनांनकडून उपस्थित केला जात आहे. जलयुक्त शिवार योजनेची वैज्ञानिक पध्दतीने अंमलबजावणी केली जात नसल्याचाही संघटनेचा सूर आहे.