शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

जलयुक्त शिवारचा पांढरा हत्ती

By admin | Updated: September 9, 2016 03:09 IST

जलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागजलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने सुमारे १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र संरक्षीत झाल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाने केला आहे. यासाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्ची पडल्याने एक टीसीएम पाणी संरक्षीत करण्यासाठी तब्बल ८१ हजार ९१७ रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही पांढरा हत्ती पोसण्याचाच प्रकार असल्याचे बोलले जाते. निकषाला धरुन वैज्ञानिक पध्दतीने योजना राबविल्यास खर्च कमी होऊ शकतो, असे मत शेतकरी संघटनेच्या प्रतिनीधींनी व्यक्त केले.रायगड जिल्ह्यातमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा प्रचंड गाजावाजा करुन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ४५ गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली. २०१५-१६ साठी ९९१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी सुमारे ३२ कोटी ७५ लाख ६६ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे सिध्दीविनायक ट्रस्ट आणि साईबाब संस्थान यांनी सुमारे दोन कोटी रुपयांची मदतीचा हात दिला होता.२०१५-१६ या कालावधीत ९९१ पैकी ९२२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी सुमारे २७ कोटी दोन लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले. एवढ्या मोठ्या संखेने निधी खर्च केल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणी राबविलेल्या या प्रकल्पामुळे तीन हजार २९६.३९ टीसीएम पाण्याचा साठा करण्यात जिल्हा कृषी विभागाला यश आले आहे. या साठलेल्या पाण्याचा वापर १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र भिजण्यास करता येणार असल्याचा दावा जिल्हा कृषी अधिक्षक विभागाने केला आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार प्रकल्पामुळे परिसरातील विहीरी, हौद यांच्या पाणी पातळीत वाढही झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. परंतु पाणी साठ्यात वाढ झाली याची मोजदाद कोणी केली, कशी केली असा प्रश्न विविध शेतकरी संघटनांनकडून उपस्थित केला जात आहे. जलयुक्त शिवार योजनेची वैज्ञानिक पध्दतीने अंमलबजावणी केली जात नसल्याचाही संघटनेचा सूर आहे.