शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

जलयुक्त शिवारचा पांढरा हत्ती

By admin | Updated: September 9, 2016 03:09 IST

जलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागजलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने सुमारे १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र संरक्षीत झाल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाने केला आहे. यासाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्ची पडल्याने एक टीसीएम पाणी संरक्षीत करण्यासाठी तब्बल ८१ हजार ९१७ रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही पांढरा हत्ती पोसण्याचाच प्रकार असल्याचे बोलले जाते. निकषाला धरुन वैज्ञानिक पध्दतीने योजना राबविल्यास खर्च कमी होऊ शकतो, असे मत शेतकरी संघटनेच्या प्रतिनीधींनी व्यक्त केले.रायगड जिल्ह्यातमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा प्रचंड गाजावाजा करुन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ४५ गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली. २०१५-१६ साठी ९९१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी सुमारे ३२ कोटी ७५ लाख ६६ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे सिध्दीविनायक ट्रस्ट आणि साईबाब संस्थान यांनी सुमारे दोन कोटी रुपयांची मदतीचा हात दिला होता.२०१५-१६ या कालावधीत ९९१ पैकी ९२२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी सुमारे २७ कोटी दोन लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले. एवढ्या मोठ्या संखेने निधी खर्च केल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणी राबविलेल्या या प्रकल्पामुळे तीन हजार २९६.३९ टीसीएम पाण्याचा साठा करण्यात जिल्हा कृषी विभागाला यश आले आहे. या साठलेल्या पाण्याचा वापर १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र भिजण्यास करता येणार असल्याचा दावा जिल्हा कृषी अधिक्षक विभागाने केला आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार प्रकल्पामुळे परिसरातील विहीरी, हौद यांच्या पाणी पातळीत वाढही झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. परंतु पाणी साठ्यात वाढ झाली याची मोजदाद कोणी केली, कशी केली असा प्रश्न विविध शेतकरी संघटनांनकडून उपस्थित केला जात आहे. जलयुक्त शिवार योजनेची वैज्ञानिक पध्दतीने अंमलबजावणी केली जात नसल्याचाही संघटनेचा सूर आहे.