शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

गणपतीच्या गावात काय चाललंय? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 11:49 IST

दादर, जोहे, हमरापूर अशी १० पेक्षा अधिक गावे दरवर्षी २०० कोटींवर उलाढाल करत आहेत.

नीलेश पाटील. रिमझिम पाऊस... वाऱ्यावर डोलणारी भाताची शेते... अशा मनाला उभारी देणाऱ्या उत्साहवर्धक वातावरणात गाडीने वेग घेतला. उरण आणि पेण तालुक्यांना जोडणाऱ्या दादर खाडी पुलावर आल्यानंतर हे चित्र काही क्षणात बदलले. येथील हिरवाईला वेगाने भेदून पाताळगंगेचा प्रवास अरबी समुद्राकडे निघाला होता. दादर खाडीवरील पुलावरून झोकात वळण घेऊन पुढे जाताच रस्त्याच्या उजव्या बाजूच्या काचेच्या भल्यामोठ्या शो-केसने लक्ष वेधले. ‘मंगलमूर्ती कला आर्ट दादर’ असा फलक असलेली ही कार्यशाळा होती. गणपतीच्या गावाला आपण आल्याची ती पहिली चाहूल होती. सुबक मूर्ती घडविण्यात पेणच्या कलाकारांचा हात कुणीही धरणार नाही. ५० वर्षांपूर्वी पेण हेच मूर्तींचे केंद्रबिंदू होते. त्यानंतर १०-१५ वर्षांत या कलेचा केंद्रबिंदू हळूहळू सरकू लागला. परिणामी अरबी समुद्राच्या कुशीत विसावलेली, दुर्गम म्हणून ओळख असणारी दादर, जोहे, हमरापूर अशी १० पेक्षा अधिक गावे दरवर्षी २०० कोटींवर उलाढाल करत आहेत.

हमरापूर विभाग संघटनेचे अध्यक्ष भाई मोकल यांच्याशी कळवे गावात भेट झाली. हमरापूर पट्ट्यातले हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या या अध्यक्षांनी पीओपी, शाडू मातीच्या मूर्तीचा विषय छेडत व्यथा मांडली. ‘मूर्तिकलेने आमची भरभराट झाली; पण प्रशासन पीओपीच्या मूर्तींबाबत संदिग्ध वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे मोठे आव्हान आहे. या मूर्ती प्रदूषण करतात हे कुठेच सिद्ध होत नाही. भाजलेली वीट व सामान्य माती यांच्यात जेवढा फरक आहे, अगदी तसाच फरक शाडू व पीओपी यामध्ये आहे.’ असे भाई यांनी ठासून सांगितले.

कार्यशाळांमध्ये काम कसे चालते? कलाकार करतात तरी काय? असे एक ना अनेक प्रश्न प्रवासादरम्यान मनात रुंजी घालत असतात. पेण शहराकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा आता पक्क्या भव्य शेडमध्ये कार्यशाळा अर्थात मूर्तीचे कारखाने सुरू आहेत. हमरापूर पट्ट्यात दरवर्षी १० लाखांपेक्षा अधिक मूर्ती घडविण्यात येतात; परंतु हीच स्थिती कायम राहील याची शाश्वती देता येत नाही. अधिक पैशांसाठी स्थानिक कलाकार राज्याबाहेर जात आहेत. जोहे गावाच्या वेशीवरच संकल्प सिद्धी कला दर्शन या प्रसिद्ध कला केंद्राच्या रवींद्र मोकल यांनी स्वागत केले. १५- २० वर्षांपासून मोकल कलेत घट्ट पाय रोवून आहेत. गणेशमूर्ती घडविणे ही एक साधना आहे, असेदेखील मोकल सांगतात.

२० प्रक्रियांनंतर खुलते रूप

गणेश मूर्ती सुकल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात केली जाते. आठ ते दहा जणांचे हात गणेशमूर्ती पूर्ण करण्यासाठी लागले जातात.

शाडू, पीओपी आणि कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्तीची निर्मिती केली जाते. मूर्ती तयार केल्यानंतर ती सुकविण्यासाठी आधी उन्हामध्ये ठेवली जाते. 

पावसाळ्यात हॅलोजनच्या सहाय्याने मूर्ती सुकवली जाते. मूर्तीं सुकण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.

गणेश मूर्ती सुकल्यानंतर तिला आकार देण्यास सुरुवात केली जाते. मूर्ती पूर्ण करण्यासाठी २० प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव