शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

सहलींवर निर्बंधास प्रखर विरोध करू

By admin | Updated: February 8, 2016 02:45 IST

मुरु ड -जंजिरा समुद्रकिनारी घडलेली विद्यार्थ्यांची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये

जंजिरा/नांदगाव : मुरु ड -जंजिरा समुद्रकिनारी घडलेली विद्यार्थ्यांची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. कोकणचा समुद्रकिनारा जगभरच्या पर्यटकांचे गोव्यानंतरचे मुख्य आकर्षण आहे. सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. केवळ मुरु ड-जंजिराच्या दुर्घटनेचा बाऊ करून पर्यटकांना समुद्री सुरक्षा सुविधा न देता सहलींवर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला प्रखर विरोध करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. रविवारी सुनील तटकरे यांनी ‘त्या’ दुर्दैवी घटनास्थळाची पाहणी केली.शहराच्या संपूर्ण २.५ कि.मी. समुद्रकिनारपट्टीचा केवळ हा कोपरा धोकादायक आहे. मागील दोन दशकामध्ये तीन मोठे अपघात येथे घडले आहेत. त्याचे कारण पर्यटकांनी अति मद्यप्राशन अथवा ओहोटीच्यावेळी स्थानिकांच्या सूचनांकडे लक्ष न देता अति साहस करणे हेच आहे, असे यावेळी उपस्थित कोळी बांधवांनी सांगितले. या ठिकाणी निरीक्षण मनोरा (वॉच टॉवर) असण्याची गरज असल्याचे समजल्यावर सुनील तटकरे यांनी आमदार निधीमधून १० लाख रु पये या कामासाठी देण्याची घोषणा केली. पर्यटनाच्या माध्यमातून शेकडो कुटुंबे उदरनिर्वाह करीत आहेत. सरकारने स्थानिक जनतेच्या भावना व सूचना लक्षात घेऊन पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी आ. सुनील तटकरे यांनी केली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी मंगेश दांडेकर, आतिक खतीब आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)