शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

आम्ही रात्रीच्या वेळी आरोग्य सेवा देऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:32 IST

जनसंवाद बैठकीत अधिकाऱ्यांची जाहीर कबुली : सरकारी आरोग्य संस्थेत एकही बालरोग तज्ज्ञ नाही

कर्जत : सायंकाळी ४ वाजल्यानंतर कर्जतच्या सरकारी आरोग्य संस्थामध्ये आरोग्य सेवा देऊ शकत नाही याची जाहीर कबुलीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्जतमध्ये दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत, आरोग्य सेवांवर देखरेख प्रकल्पामार्फत कर्जत तालुक्यातील आरोग्य समस्यांची मांडणी करण्यासाठी या प्रकल्पाची तालुका समन्वयक संस्था दिशा केंद्राने मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय जनसंवादाचे आयोजन केले होते. या जनसंवादामध्ये तालुक्यातील आदिवासी वाडीतील नागरिकांनी आपल्या आरोग्य समस्यांची मांडणी केली. त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.गरोदर महिलांना संदर्भ सेवा न मिळणे, नवजात बालकांना आरोग्य सेवा न मिळणे, इंजेक्शन, सलाईन लावण्यासाठी पैसे घेणे यासारख्या गंभीर प्रश्नाची आदिवासी महिलांनी मांडणी केली. या सर्व प्रश्नांना जबाबदार असणारे आरोग्य अधिकारी मात्र समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. परिणामी आरोग्य प्रश्नावर प्रशासन व शासन गंभीर नाहीत ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

कर्जत तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी कळंब वगळता कुठे रात्रीची आरोग्य सेवा मिळत नाही, तालुक्यातील सर्वात टोकाला असलेल्या व आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबिवली येथे सायंकाळी ४ वाजेनंतर कोणीच अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात अशी मांडणी लोकांनी केल्यानंतर उपस्थित आरोग्य अधिकाºयांनी या आरोग्य केंद्रात राहायची व्यवस्था नाही म्हणून आम्ही दवाखाना बंद ठेवतो. ३५ किमी अंतरावर असलेल्या या प्राथमिक आरोग्य कें द्रातील नागरिकांना रात्रीच्या वेळी कर्जत किंवा कशेळे येथे यावे लागते, शहरापासून जवळच असलेल्या मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा ५ वाजल्यानंतर कोणीच अधिकारी उपस्थित राहत नाहीत.

कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वात जास्त ओपीडी असणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने निवासस्थान बांधून तयार आहे तरी सुद्धा येथे डॉक्टर निवासी राहत नाहीत. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा निवासी व्यवस्था असून देखील निवासी राहत नाहीत या प्रश्नाच्या भडिमाराने उपस्थित अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाली. या जनसंवाद बैठकीस कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, पंचायत समिती उपसभापती काशिनाथ मिरकुटे, पंचायत समिती सदस्या सुरेखा हरपुडे, कविता ऐनकर आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका उपस्थित होते.महत्त्वाचे मुद्देतालुक्यात एकही बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नाहीत.स्त्री तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी माता मृत्यूच्या अनेक घटना घडल्या.आलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार न करता उल्हासनगर, पनवेल, कामोठे येथे जाण्याचा सल्ला दिला जातो.आरोग्यासोबतच आदिवासी वाडीतील पाणीटंचाईचे प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात मांडले.