शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पाली नगरपंचायत होण्याचा मार्ग झाला मोकळा; नगरविकास विभागाची अधिसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:57 IST

नगरविकास विभागाची अधिसूचना : तहसीलदारपदी दिलीप रायन्नावार यांची नियुक्ती

विनोद भोईरपाली: अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची प्रक्रिया मागील साडेपाच वर्षांपासून लालफितीत अडकली होती. मात्र, पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याचे पालीकरांचे स्वप्न आता साकार होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना महाराष्ट्र नगरविकास विभागाने गुरुवारी (ता.३१) जारी केली आहे आणि त्यानुसार नगरपंचायत स्थापित होईपर्यंत पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्र शासनामार्फत रायगड जिल्ह्यातील पालीसह अन्य सहा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचातीत होण्याची प्रक्रिया झाली होती. मात्र, तत्कालीन सरपंच व सदस्यांनी पाली ग्रामपंचायत राहावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तसेच दरम्यानच्या काळात पाली नगरपंचायत होण्याच्या प्रक्रियेत नगरपंचायतीची जाहिरात प्रसारमाध्यमात प्रसिद्ध न झाल्याच्या कारणाने नगरपंचायत प्रस्तापित होऊ शकली नव्हती. त्यामुळे पाली ग्रामपंचायत जैसेथे राहिली. या सर्व कालखंडात कधी जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी तर कधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला. मात्र, लोकप्रतिनिधींअभावी नागरिकांच्या विविध समस्या सोडवणुकीस दिरंगाई होत होती.

मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यास अडचणी येत होत्या. त्यानंतर, जुलै, २०१८ मध्ये ग्रामपंचायतीचा ५ वर्षांचा कार्यकाळ (मुदत) संपल्याने पुन्हा एकदा पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाली. मात्र, यावेळी सर्व राजकीय पक्ष, नेते व नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत नगरपंचायत होण्याची मागणी केली होती. दरम्यान, पाली नगरपंचायत व्हावी, यासाठी पालीतील पराग मेहता, गजानन शिंदे, अभिजीत चांदोरकर, सुधीर साखरले, संजोग शेठ व आशिक मनियार आदी नागरिकांनी सर्व कागदपत्रासह उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाविरोधात जनहित याचिका दाखल केली.

त्यानंतर, २६ सप्टेंबर, २०१८ रोजी पाली ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत नगरपंचायतीची मागणी करत राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा बहिष्कार टाकला होता, तर अपक्ष उमेदवारांनी मात्र नगरपंचायत होईल तेव्हा होईल, हा पवित्रा घेत, ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी या ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. त्याचप्रमाणे, अपक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. ग्रामपंचायतिचे कामकाज आत्तापर्यंत सुरू राहिले.

 

टॅग्स :Raigadरायगड