शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

पाली नगरपंचायत होण्याचा मार्ग झाला मोकळा; नगरविकास विभागाची अधिसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:57 IST

नगरविकास विभागाची अधिसूचना : तहसीलदारपदी दिलीप रायन्नावार यांची नियुक्ती

विनोद भोईरपाली: अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची प्रक्रिया मागील साडेपाच वर्षांपासून लालफितीत अडकली होती. मात्र, पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याचे पालीकरांचे स्वप्न आता साकार होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना महाराष्ट्र नगरविकास विभागाने गुरुवारी (ता.३१) जारी केली आहे आणि त्यानुसार नगरपंचायत स्थापित होईपर्यंत पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्र शासनामार्फत रायगड जिल्ह्यातील पालीसह अन्य सहा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचातीत होण्याची प्रक्रिया झाली होती. मात्र, तत्कालीन सरपंच व सदस्यांनी पाली ग्रामपंचायत राहावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तसेच दरम्यानच्या काळात पाली नगरपंचायत होण्याच्या प्रक्रियेत नगरपंचायतीची जाहिरात प्रसारमाध्यमात प्रसिद्ध न झाल्याच्या कारणाने नगरपंचायत प्रस्तापित होऊ शकली नव्हती. त्यामुळे पाली ग्रामपंचायत जैसेथे राहिली. या सर्व कालखंडात कधी जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी तर कधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला. मात्र, लोकप्रतिनिधींअभावी नागरिकांच्या विविध समस्या सोडवणुकीस दिरंगाई होत होती.

मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यास अडचणी येत होत्या. त्यानंतर, जुलै, २०१८ मध्ये ग्रामपंचायतीचा ५ वर्षांचा कार्यकाळ (मुदत) संपल्याने पुन्हा एकदा पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाली. मात्र, यावेळी सर्व राजकीय पक्ष, नेते व नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत नगरपंचायत होण्याची मागणी केली होती. दरम्यान, पाली नगरपंचायत व्हावी, यासाठी पालीतील पराग मेहता, गजानन शिंदे, अभिजीत चांदोरकर, सुधीर साखरले, संजोग शेठ व आशिक मनियार आदी नागरिकांनी सर्व कागदपत्रासह उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाविरोधात जनहित याचिका दाखल केली.

त्यानंतर, २६ सप्टेंबर, २०१८ रोजी पाली ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत नगरपंचायतीची मागणी करत राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा बहिष्कार टाकला होता, तर अपक्ष उमेदवारांनी मात्र नगरपंचायत होईल तेव्हा होईल, हा पवित्रा घेत, ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी या ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. त्याचप्रमाणे, अपक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. ग्रामपंचायतिचे कामकाज आत्तापर्यंत सुरू राहिले.

 

टॅग्स :Raigadरायगड