शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे नागोठणे जलमय; लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:43 IST

अडकलेल्या २० जणांची सुटका

नागोठणे : शनिवारी सायंकाळपासून पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केल्याने मध्यरात्री येथील अंबा नदीने पुन्हा एकदा आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने नागरिकांची तसेच व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पुरात अडकलेल्या २० जणांना रविवारी सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने कोठेही जीवितहानी झाली नाही. खा. सुनील तटकरे आणि आ. अनिकेत तटकरे यांनी सकाळी, तर भाजपचे नेते माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी दुपारी चार शहरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.मध्यरात्रीच्या दरम्यान येथील अंबा नदीने शहरात प्रवेश केला होता. पुराचे पाणी वेगाने वाढत आहे, असे नागरिकांच्या लक्षात आल्याने घरातील साहित्य घरातच सोडून त्यानी सुरक्षित ठिकाणी जाऊन आसरा घेतला, तर व्यापारी बांधवांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला असला तरी, पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात असल्याने अनेकांचा माल भिजून खराब झाला.सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रा.पं. सदस्य शैलेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, अनंत म्हात्रे, शिवाजी केंद्रे यांचेसह पोलीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संभाव्य पुराची परिस्थिती लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पूरग्रस्त भागात फिरून नागरिकांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्याचे काम केले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान शिवाजी चौकलगत राहणारे काळे कुटुंबीय पुराच्या पाण्यात अडकून पडले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर कोलाडच्या एनआरएस टीमला पाचारण करण्यात येऊन घरात अडकलेल्या पाचही जणांना सात वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले.रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास याच चौकात असणाºया भाजी मार्के ट तसेच मनिष फरसाण मार्ट आणि साईप्रसाद हॉटेलमधील १५ कामगार पुरात अडकून पडले असल्याचे दिसून आले होते. याचवेळी नागोठण्याची पाहणी करण्यासाठी आलेले आ. अनिकेत तटकरे यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्याने त्यांनी तातडीने सूत्रे हलवून दोन होडींसह कोलाडच्या एनआरएस पथकाला पुन्हा पाचारण केले. दुपारी १२ वाजता या पथकाने पंधराही जणांना सुखरूप बाहेर काढून मोहीम यशस्वी केली. पहाटेपासून आम्ही मदतीच्या प्रतीक्षेत होतो व आठ तासानंतर आम्ही बाहेर आलो, असे एका कामगाराने लोकमतशी बोलताना सांगितले.त्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी सकाळी ९ वाजता शहराला भेट देऊन बंगले आळी, बाजारपेठ, खुमाचा नाका, मोहल्ला आदी पूरप्रवण क्षेत्रात फिरून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला व सरकारी यंत्रणेला सूचना केल्या. रोह्याच्या तहसीलदार कविता जाधव यांनी सकाळी, तर प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी दुपारी शहरात फिरून पूरपरिस्थितीची पाहणी केली. या महापुरात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून या अधिकाऱ्यांकडून स्थानिक महसूल यंत्रणेला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला.रविवारी दुपारपर्यंत एसटी बसस्थानक, शिवाजी चौक तसेच कोळीवाडा भागात १५ फूट, बाजारपेठ सहा ते सात फूट, तर रिलायन्स चौक, मरिआई मंदिर आणि शांतीनगराच्या काही भागात तीन ते चार फूट पुराच्या पाण्याची पातळी होती. पावसाची संततधार कायम चालू असली तरी दुपारी तीन नंतर पुराचे पाणी ओसरावयास प्रारंभ झाला होता. पुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्यावर नुकसानीचा अंदाज येऊ शकेल, असे शासकीय यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले. शहराचा विद्युत पुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला होता. पुराचे पाणी गेल्यावर सर्व ठिकाणी जाऊन पाहणी केल्यावरच विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यात येईल, असे विद्युत वितरण कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :floodपूर