शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

जलवाहिनीला लागली गळती

By admin | Updated: May 25, 2017 00:22 IST

संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत असून, अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत असून, अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. असे असताना, जवळील मोरबे डॅममधून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामधून १५ ते २० फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत आहेत. मागील दोन दिवसांपासून या जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे असून, नवी मुंबईला पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी मुंबई -पुणे हायवेलगत टाकण्यात आली आहे. चौकपासून काही अंतरावर असलेल्या बारवाई गावाजवळ ही जलवाहिनी फुटल्याने त्यामधून प्रचंड दाबाने पाणी बाहेर पडत आहे. या पाण्याचे फवारे जलवाहिनीलगत असणाऱ्या हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर उडत आहेत. त्यामुळे अचानक वाहनांच्या काचेवर जोरात पाणी पडत असल्याने वाहनचालक गोंधळून त्याचा वाहनावरील ताबा सुटून अपघाताची शक्यता आहे. तर काही वाहनचालक संधीचा फायदा घेत, भर रस्त्यात फवाऱ्याखाली गाडी उभी करून भर उन्हात गारव्याचा आनंद लुटत आहेत. संबंधित शासकीय प्रशासनाने दखल घेऊन जलवाहिनी गळती रोखावी, अशी मागणी होत आहे.