शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कर्जतमधील राजनाला कालव्यात २० डिसेंबरपूर्वी सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:07 IST

पाटबंधारे विभागाची माहिती : तांबस येथे पडलेले भगदाड तात्पुरते भरणार

कर्जत : तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्याचे पाणी दुबार शेतीसाठी २० डिसेंबर पूर्वी सोडले जाणार आहे. मुख्य कालवा, उजवा कालवा आणि पाली पोटल कालव्यामध्ये पाणी सोडले जाणार असल्याने किमान २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तांबस येथील उजवा कालव्याला पडलेले भगदाड तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याचे काम पाटबंधारे विभागाचा यांत्रिकी विभाग करीत असून त्या पूर्ण कामाची निविदा अद्याप निघालेली नाही.

हुमगाव ते दहिवली या कालव्याच्या तांबस येथील भागात कालव्याचा तब्बल ४० मीटरचा भाग वाहून गेला आहे. त्या भागात एक मोरी, सोबत मातीचा भराव आणि कालव्यातील काँक्रीट देखील वाहून गेले होते. जुलै महिन्यात वाहून गेलेल्या तांबस आणि बारणे भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची शेतकºयांना अद्याप भरपाई मिळाली नाही, परंतु त्या ठिकाणी कालवा पूर्ववत करण्यासाठी पाटबंधारे खात्याने निविदा देखील काढली नाही. मात्र शेतकºयांची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने तांबस येथे तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

हुमगाव येथून मुख्य कालव्यातून आलेले दहिवलीपर्यत पोहचावे आणि शेतकºयांना दुबार भाताचे पीक घेता यावे यासाठी पाटबंधारे विभाग कामाला लागला आहे. या उजव्या कालव्यातून तब्बल ३४ गावातील शेती ओलिताखाली येणार असून १८०० हेक्टर क्षेत्र त्या भागात असून भाताचे पीक मोठ्या प्रमाणात राजनाला कालव्याचे पाण्यावर घेतले जाते. ही बाब लक्षात घेऊन दुरुस्तीच्या कामाची निविदा होईल तेंव्हा होईल पण शेतीला पाणी पोहचले पाहिजे यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने २० डिसेंबरपर्यंत राजनाला मुख्य कालव्यातून पाणी डावा, पाली - पोटल कालव्यात शेतीसाठी सोडले जाणार आहे. २० डिसेंबर पूर्वी शेतीसाठी पाणी सोडता यावे यासाठी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अजय कदम यांच्यासह पाली पोटल कालव्याच्या शाखा अभियंता स्नेहल कापडे तसेच उजवा कालव्याची जबाबदारी असलेले शाखा अभियंता भरत काटले हे नाल्याची काम पूर्ण करून घेत आहेत. या सर्व कामांमुळे काही दिवस उशिरा राजनाला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे.कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आधीच ठरलेले असते, मात्र यावेळी राजनाला कालव्याचा मोठा भाग पावसाच्या वाहून गेला होता. त्या कामासाठी आम्ही कोलाड विभागाच्या कार्यालयात दुरुस्तीचे अंदाजपत्रक बनवून पाठवले होते. मात्र ते निविदा स्तरावर येण्यास उशीर झाल्याने कामे वेळेवर झाली नाहीत. त्या स्थितीत शेतकºयांची पाणी सोडण्याची आग्रही मागणी लक्षात घेऊन आम्ही आमच्या यांत्रिक विभागाकडून तात्पुरती दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे काही दिवस उशिरा पाणी सोडले जाईल.- अजय कदम, उपअभियंता,पाटबंधारे विभाग