शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील राजनाला कालव्यात २० डिसेंबरपूर्वी सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:07 IST

पाटबंधारे विभागाची माहिती : तांबस येथे पडलेले भगदाड तात्पुरते भरणार

कर्जत : तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्याचे पाणी दुबार शेतीसाठी २० डिसेंबर पूर्वी सोडले जाणार आहे. मुख्य कालवा, उजवा कालवा आणि पाली पोटल कालव्यामध्ये पाणी सोडले जाणार असल्याने किमान २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तांबस येथील उजवा कालव्याला पडलेले भगदाड तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याचे काम पाटबंधारे विभागाचा यांत्रिकी विभाग करीत असून त्या पूर्ण कामाची निविदा अद्याप निघालेली नाही.

हुमगाव ते दहिवली या कालव्याच्या तांबस येथील भागात कालव्याचा तब्बल ४० मीटरचा भाग वाहून गेला आहे. त्या भागात एक मोरी, सोबत मातीचा भराव आणि कालव्यातील काँक्रीट देखील वाहून गेले होते. जुलै महिन्यात वाहून गेलेल्या तांबस आणि बारणे भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची शेतकºयांना अद्याप भरपाई मिळाली नाही, परंतु त्या ठिकाणी कालवा पूर्ववत करण्यासाठी पाटबंधारे खात्याने निविदा देखील काढली नाही. मात्र शेतकºयांची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने तांबस येथे तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

हुमगाव येथून मुख्य कालव्यातून आलेले दहिवलीपर्यत पोहचावे आणि शेतकºयांना दुबार भाताचे पीक घेता यावे यासाठी पाटबंधारे विभाग कामाला लागला आहे. या उजव्या कालव्यातून तब्बल ३४ गावातील शेती ओलिताखाली येणार असून १८०० हेक्टर क्षेत्र त्या भागात असून भाताचे पीक मोठ्या प्रमाणात राजनाला कालव्याचे पाण्यावर घेतले जाते. ही बाब लक्षात घेऊन दुरुस्तीच्या कामाची निविदा होईल तेंव्हा होईल पण शेतीला पाणी पोहचले पाहिजे यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने २० डिसेंबरपर्यंत राजनाला मुख्य कालव्यातून पाणी डावा, पाली - पोटल कालव्यात शेतीसाठी सोडले जाणार आहे. २० डिसेंबर पूर्वी शेतीसाठी पाणी सोडता यावे यासाठी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अजय कदम यांच्यासह पाली पोटल कालव्याच्या शाखा अभियंता स्नेहल कापडे तसेच उजवा कालव्याची जबाबदारी असलेले शाखा अभियंता भरत काटले हे नाल्याची काम पूर्ण करून घेत आहेत. या सर्व कामांमुळे काही दिवस उशिरा राजनाला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे.कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आधीच ठरलेले असते, मात्र यावेळी राजनाला कालव्याचा मोठा भाग पावसाच्या वाहून गेला होता. त्या कामासाठी आम्ही कोलाड विभागाच्या कार्यालयात दुरुस्तीचे अंदाजपत्रक बनवून पाठवले होते. मात्र ते निविदा स्तरावर येण्यास उशीर झाल्याने कामे वेळेवर झाली नाहीत. त्या स्थितीत शेतकºयांची पाणी सोडण्याची आग्रही मागणी लक्षात घेऊन आम्ही आमच्या यांत्रिक विभागाकडून तात्पुरती दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे काही दिवस उशिरा पाणी सोडले जाईल.- अजय कदम, उपअभियंता,पाटबंधारे विभाग