शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जलवाहिनी पुन्हा फुटली; हजारो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:42 IST

संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

नेरळ : नेरळ पूर्व भागात सातत्याने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. पिण्याचे पाणी वाया जात असल्याने जलवाहिन्या फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत नेरळ ग्रामपंचायत विचार करीत असल्याची माहिती सरपंच जान्हवी साळुंखे यांनी दिली आहे.गेल्या महिन्यात येथील मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे जवळपास आठ दिवस नेरळ ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचाऱ्यांकडून काम सुरू होते. मंगळवारी, पहाटे पुन्हा नेरळ पूर्व भागात मध्य रेल्वेच्या पुलाच्या कामात तुटलेली जलवाहिनी पुन्हा तुटली. त्यामुळे याठिकाणी तळे साचले होते. सकाळी दहानंतर पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी जलवाहिन्या दुरुस्त करण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत नेरळ पूर्व भागात सकाळी वितरीत करण्यात आलेले पाणी बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.नेरळ गावातील अन्य भागाकडे दुर्लक्ष करून मध्यंतरी पाणीपुरवठा विभागाला रेल्वेने तोडलेल्या जलवाहिन्या जोडाव्या लागल्या होत्या. त्यानंतर इमारती बांधण्याची कामे करताना आणि रस्त्याची कामे करताना जेसीबी लावले जात आहेत. त्या वेळी खोदकाम सुरू करण्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीला कोणतीही सूचना केली जात नसल्याने त्या भागातील नळपाणी योजनेच्या जलवाहिन्या फुटून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.नेरळ ग्रामपंचायत खोदकामाबाबत एक रूपरेषा निश्चित करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे यापुढे कोणीही कुठेही खोदकाम करू शकत नाही आणि त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.नेरळ ग्रामपंचायत सातत्याने फुटणाºया जलवाहिन्या याबाबत गंभीर असून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याआधी यापुढे जलवाहिन्या फोडणाºयावर कारवाई करण्याचा विचार सुरू असून त्या निर्णयास लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती सरपंच साळुंखे यांनी दिली आहे.