शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
3
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
4
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
5
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
6
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
7
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
8
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
9
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
10
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
11
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
12
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
13
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
14
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
15
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
16
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
17
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
19
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
20
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई

By admin | Updated: April 19, 2016 02:26 IST

तालुक्यात मागील वर्षीपेक्षा अधिक पाणीटंचाई जाणवत आहे. कारण शासनाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात गावे आणि वाड्यांची संख्या जास्त आहे

संजय गायकवाड,  कर्जततालुक्यात मागील वर्षीपेक्षा अधिक पाणीटंचाई जाणवत आहे. कारण शासनाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात गावे आणि वाड्यांची संख्या जास्त आहे. यावर्षी १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर तसेच बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त तीन गावे-वाड्यांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.कर्जत तालुक्याचा बहुतांश भाग आदिवासी आणि दुर्गम आहे. त्यात तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांपैकी एक वगळता अन्य नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. पेज नदी पुढे उल्हास नदीला जाऊन मिळते. त्यामुळे हा परिसर सोडला तर अन्य भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसून येते. त्यातही पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागात पाझर तलाव बांधण्यात आल्याने काही प्रमाणात रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यातील मोठी लोकवस्ती ही दुर्गम भागात वसली असल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची समस्या प्रचंड प्रमाणात भेडसावत असते. अशावेळी त्या भागातील निर्माण होणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार सुरेश लाड, तहसीलदार रवींद्र बाविस्कर, कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक थुळे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यावर सह्या आहेत. तालुक्यात एप्रिल २०१६ पासून १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर किंवा बैलगाड्या सुरू करण्यात येतील, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. मागील वर्षी १० गावे आणि ३१ आदिवासी वाड्यांना टँकर पाणीपुरवठा करण्यात आला होता. टंचाईग्रस्त आदिवासी वाड्यांमध्ये यावेळी ३४ वाड्या सरकारी आराखड्यानुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या वाड्यांपर्यंत टँकरने पाणी पोचवावे, असा प्रयत्न पाणीटंचाई कृती समिती करणार आहे. १४ आदिवासी वाड्यांपैकी खांडस, मोग्रज, मिरचूल वाडीला टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये पोहोचले आहेत. तेथून कर्जत तहसील कार्यालय आणि आता त्या तीन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविले आहेत.> कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई सर्वत्र जाणवत आहे. तालुक्यातील दोन गावे आणि एका वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. ते आमच्या कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले असून, जिल्हा प्रशासनाने एक टँकर मंजूर केला आहे. तो तालुक्यात येताच टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू केले जातील.- रवींद्र बाविस्कर, तहसीलदार, कर्जत