शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी पाणीटंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 00:11 IST

देखभालीकडे दुर्लक्ष : सुधागड तालुक्यात पाच धरणे, तरी पाणीटंचाई कायम

-विनोद भोईर

पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी पहिल्यांदा कमालीचे घटले आहे. त्यामुळे पालीकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नियोजनाअभावी पालीकरांवर पाणीटंचाईचे सावट आले आहे.

पालीला अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. दर वर्षी उन्हाळ्यातही नदीला मुबलक पाणी असते, त्यामुळे केवळ मोटार पंप बिघडल्यास, वाहिन्या तुटल्यास, दुरुस्ती असल्यास अनियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, यंदा पहिल्यांदा अंबा नदीची पाणीपातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात नदीला येथील जवळच असलेल्या उन्हेरे व कवेळे धरणातून नियमित पाणी मिळते. मात्र, उन्हेरे धरणाची जॅकवेल पूर्णपणे मोडल्याने धरण आटले आहे. तसेच कवेळे धरणालादेखील गळती लागली आहे. याकडे पाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे नदीचे मुख्य स्रोतच संपुष्टात आले. परिणामी, शासकीय अनास्थेमुळे पालीकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या पाणी घटल्याने जॅकवेलमधील मोटार पंप वर दिसत आहेत. पाणी ओढल्यानंतर पुन्हा नदीत पाणी भरण्यास वेळ लागतो.

सुधागड तालुक्यातील धरणाची अवस्था दयनीयच्तालुक्यात उन्हेरे, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत आणि कवेळे ही पाच मोठी धरणे आहेत. त्यातील उन्हेरे धरणाची जॅकवेल मागील तीन वर्षांपासून मोडकळीस आली होती. अखेर ती आता पूर्णपणे ढासळली. तसेच डागडुजीअभावी हे धरण मरणासन्न अवस्थेत आहे. कवेळे धरणालाही गळती लागली आहे. तर कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिकांमध्ये (पाइपलाइन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) शेवाळ, मुळ्या, घाण व कचरा जाऊन त्यांच्यात बिघाड झाला आहे. उन्हेरे धरणाची वेळीच दुरु स्ती केली असती तर पालीकरांना टंचाईला सामोरे जावे लागले नसते. या संदर्भात अनेक वेळा बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

पाण्यासाठी अजून थोडे थांबाच्कवेळे, ढोकशेत व कोंडगाव धरणाचे पाणी अंबा नदीला सोडण्यासाठी पाली ग्रामपंचायतीतर्फे कोलाड येथील पाठबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, काही अंतर दूरवर असलेल्या धरणातून पाणी सोडल्यावर ते पहिल्यांदा इतर कालव्यांना जाईल, मग नाले व ओहळ आणि त्यानंतर नदीला मिळेल. यासाठी जवळपास १० -१२ दिवस जातील. परिणामी, तोपर्यंत पालीकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. 

ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व उपाय करत आहोत. धरणाचे पाणी येईपर्यंत नदीला काही अंतरावर चर खोदून पुढील पाणी घेण्यात येईल. जेणेकरून पाणीसाठा वाढेल. नागरिकांनीदेखील थोडे दिवस पाणी जपून वापरून सहकार्य करावे.- गणेश बाळके, सरपंच,ग्रुप ग्रामपंचायत पाली

टॅग्स :Raigadरायगड