शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

नियोजनाअभावी पाणीटंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 00:11 IST

देखभालीकडे दुर्लक्ष : सुधागड तालुक्यात पाच धरणे, तरी पाणीटंचाई कायम

-विनोद भोईर

पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी पहिल्यांदा कमालीचे घटले आहे. त्यामुळे पालीकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नियोजनाअभावी पालीकरांवर पाणीटंचाईचे सावट आले आहे.

पालीला अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. दर वर्षी उन्हाळ्यातही नदीला मुबलक पाणी असते, त्यामुळे केवळ मोटार पंप बिघडल्यास, वाहिन्या तुटल्यास, दुरुस्ती असल्यास अनियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, यंदा पहिल्यांदा अंबा नदीची पाणीपातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात नदीला येथील जवळच असलेल्या उन्हेरे व कवेळे धरणातून नियमित पाणी मिळते. मात्र, उन्हेरे धरणाची जॅकवेल पूर्णपणे मोडल्याने धरण आटले आहे. तसेच कवेळे धरणालादेखील गळती लागली आहे. याकडे पाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे नदीचे मुख्य स्रोतच संपुष्टात आले. परिणामी, शासकीय अनास्थेमुळे पालीकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या पाणी घटल्याने जॅकवेलमधील मोटार पंप वर दिसत आहेत. पाणी ओढल्यानंतर पुन्हा नदीत पाणी भरण्यास वेळ लागतो.

सुधागड तालुक्यातील धरणाची अवस्था दयनीयच्तालुक्यात उन्हेरे, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत आणि कवेळे ही पाच मोठी धरणे आहेत. त्यातील उन्हेरे धरणाची जॅकवेल मागील तीन वर्षांपासून मोडकळीस आली होती. अखेर ती आता पूर्णपणे ढासळली. तसेच डागडुजीअभावी हे धरण मरणासन्न अवस्थेत आहे. कवेळे धरणालाही गळती लागली आहे. तर कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिकांमध्ये (पाइपलाइन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) शेवाळ, मुळ्या, घाण व कचरा जाऊन त्यांच्यात बिघाड झाला आहे. उन्हेरे धरणाची वेळीच दुरु स्ती केली असती तर पालीकरांना टंचाईला सामोरे जावे लागले नसते. या संदर्भात अनेक वेळा बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

पाण्यासाठी अजून थोडे थांबाच्कवेळे, ढोकशेत व कोंडगाव धरणाचे पाणी अंबा नदीला सोडण्यासाठी पाली ग्रामपंचायतीतर्फे कोलाड येथील पाठबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, काही अंतर दूरवर असलेल्या धरणातून पाणी सोडल्यावर ते पहिल्यांदा इतर कालव्यांना जाईल, मग नाले व ओहळ आणि त्यानंतर नदीला मिळेल. यासाठी जवळपास १० -१२ दिवस जातील. परिणामी, तोपर्यंत पालीकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. 

ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व उपाय करत आहोत. धरणाचे पाणी येईपर्यंत नदीला काही अंतरावर चर खोदून पुढील पाणी घेण्यात येईल. जेणेकरून पाणीसाठा वाढेल. नागरिकांनीदेखील थोडे दिवस पाणी जपून वापरून सहकार्य करावे.- गणेश बाळके, सरपंच,ग्रुप ग्रामपंचायत पाली

टॅग्स :Raigadरायगड