शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पाच ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: September 2, 2016 03:42 IST

लिबाग तालुक्यातील सारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींमधील जनतेला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींमधील जनतेला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सद्यस्थितीत ऐन पावसाळ््यात गणेशोत्सवाचा सण तोंडावर आलेला असताना या पाच ग्रामपंचायत क्षेत्रांतील सुमारे पाच हजार कुटुंबे पिण्याच्या पाण्यास वंचित असल्याचे वास्तव फुफादेवी-सारळ येथील शशिकांत आत्माराम पाटील, दोन ग्रामपंचायती आणि ११० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे तक्रार निवेदन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर समोर आले आहे.पिण्याचे पाणी पुरवण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत गेल्या १५ ते २० वर्षांत तब्बल ११ साठवण टाक्या लाखो रुपये खर्चून बांधण्यात आल्या. टाक्या बांधणाऱ्या कंत्राटदारांना त्यांनी केलेल्या कामांची बिले देखील अदा करण्यात आली. परंतु या पाणी साठवण टाक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब साठवला गेला नाही. परिणामी ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही. यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊ स समाधानकारक असून सर्व धरणे भरली आहेत. परंतु या परिसरातील या पाच ग्रामपंचायती पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ही समस्या असताना कोणीही लोकप्रतिनिधी वा शासकीय यंत्रणा या समस्येवर उपाययोजना काढत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडे पाण्याची तक्रार केली तर, ते म्हणतात ग्रामस्थ पाणीपट्टी भरत नाहीत, म्हणून पाणी नाही. मात्र प्रत्यक्षात ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच मिळत नाही, तर पाणीपट्टी कशी भरायची असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. या सर्व ग्रामपंचायती समुद्रकिनारी आहेत. त्यामुळे विहिरी व बोअरवेलला खारे पाणी लागते. या ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या पाण्याशिवाय पर्याय नाही, हे अनेक निवेदने व मोर्चे काढून शासनाला सांगितले असताना ही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. पाच ग्रामपंचायतीसाठी शासनाने अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत, टाक्या बांधल्या, पाइपलाइन टाकल्या. परंतु आजपर्र्यंत या टाक्यांत पाण्याचा एक थेंब आलेला नाही. या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन सुध्दा झाले नाही. या टाक्यात पाणीच गेले नसल्यामुळे, टाक्यांना तडे जाऊ न त्या धोकादायक अवस्थेत आहेत. जर त्या पडल्या तर मनुष्यहानी होऊ शकते. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पाणी घ्यावे लागते विकत : सद्यस्थितीत ग्रामस्थ पाणी विकत घेऊ न पीत आहोत. परिणामी ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी व संताप आहे. पाच ग्रामपंचायतीमध्ये शासनाचे करोडो रुपये खर्च होऊ न सुध्दा एकही पाणीपुरवठा योजना चालू नाही. या बाबतीत मिळकतखार सरपंचाच्या नेतृत्वाखाली नुकताच एक मोर्चा अलिबाग पंचायत समितीवर काढण्यात आला होता, याचीही आठवण पाटील यांनी करुन दिली आहे.एमआयडीसीचे पाणी हाच होवू शकतो जलस्रोतसारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. येथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत हा एमआयडीसीच्याच पाण्याला जोडणे आवश्यक आहे. निर्णय वरिष्ठ पातळीवरुन होणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. ग्रामस्थांचे निवेदन कार्यवाहीकरिता जिल्हा परिषदेकडे पाठविले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.