शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

पाच ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: September 2, 2016 03:42 IST

लिबाग तालुक्यातील सारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींमधील जनतेला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींमधील जनतेला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सद्यस्थितीत ऐन पावसाळ््यात गणेशोत्सवाचा सण तोंडावर आलेला असताना या पाच ग्रामपंचायत क्षेत्रांतील सुमारे पाच हजार कुटुंबे पिण्याच्या पाण्यास वंचित असल्याचे वास्तव फुफादेवी-सारळ येथील शशिकांत आत्माराम पाटील, दोन ग्रामपंचायती आणि ११० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे तक्रार निवेदन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर समोर आले आहे.पिण्याचे पाणी पुरवण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत गेल्या १५ ते २० वर्षांत तब्बल ११ साठवण टाक्या लाखो रुपये खर्चून बांधण्यात आल्या. टाक्या बांधणाऱ्या कंत्राटदारांना त्यांनी केलेल्या कामांची बिले देखील अदा करण्यात आली. परंतु या पाणी साठवण टाक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब साठवला गेला नाही. परिणामी ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही. यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊ स समाधानकारक असून सर्व धरणे भरली आहेत. परंतु या परिसरातील या पाच ग्रामपंचायती पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ही समस्या असताना कोणीही लोकप्रतिनिधी वा शासकीय यंत्रणा या समस्येवर उपाययोजना काढत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडे पाण्याची तक्रार केली तर, ते म्हणतात ग्रामस्थ पाणीपट्टी भरत नाहीत, म्हणून पाणी नाही. मात्र प्रत्यक्षात ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच मिळत नाही, तर पाणीपट्टी कशी भरायची असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. या सर्व ग्रामपंचायती समुद्रकिनारी आहेत. त्यामुळे विहिरी व बोअरवेलला खारे पाणी लागते. या ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या पाण्याशिवाय पर्याय नाही, हे अनेक निवेदने व मोर्चे काढून शासनाला सांगितले असताना ही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. पाच ग्रामपंचायतीसाठी शासनाने अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत, टाक्या बांधल्या, पाइपलाइन टाकल्या. परंतु आजपर्र्यंत या टाक्यांत पाण्याचा एक थेंब आलेला नाही. या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन सुध्दा झाले नाही. या टाक्यात पाणीच गेले नसल्यामुळे, टाक्यांना तडे जाऊ न त्या धोकादायक अवस्थेत आहेत. जर त्या पडल्या तर मनुष्यहानी होऊ शकते. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पाणी घ्यावे लागते विकत : सद्यस्थितीत ग्रामस्थ पाणी विकत घेऊ न पीत आहोत. परिणामी ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी व संताप आहे. पाच ग्रामपंचायतीमध्ये शासनाचे करोडो रुपये खर्च होऊ न सुध्दा एकही पाणीपुरवठा योजना चालू नाही. या बाबतीत मिळकतखार सरपंचाच्या नेतृत्वाखाली नुकताच एक मोर्चा अलिबाग पंचायत समितीवर काढण्यात आला होता, याचीही आठवण पाटील यांनी करुन दिली आहे.एमआयडीसीचे पाणी हाच होवू शकतो जलस्रोतसारळ, रेवसगांव, मिळकतखार, कोप्रोली आणि डावली रांजणखार या पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. येथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत हा एमआयडीसीच्याच पाण्याला जोडणे आवश्यक आहे. निर्णय वरिष्ठ पातळीवरुन होणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. ग्रामस्थांचे निवेदन कार्यवाहीकरिता जिल्हा परिषदेकडे पाठविले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.