शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रानसईतील आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न सुटला; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 00:26 IST

उरण तालुका अतिशय विकसित आहे, असं सगळ्यांना वाटत आहे. मात्र, या तालुक्यातही आदिवासींना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

उरण : उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाडीत डीपीवर्ल्ड टर्मिनल प्रशासनाने सीआरएस फंडातून जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (४) झाले.उरण तालुक्यातील रानसई येथील खैरकाठीवाडी, भुऱ्याचीवाडी, बंगल्याचीवाडी, मार्गाचीवाडी, कोंड्याचीवाडी, सागाचीवाडी अशा सहा आदिवासी वाड्यांतील  अनेक पाण्याच्या शासकीय योजना आत्तापर्यंत बारगळल्या आहेत. डीपी वर्ल्ड कंपनीने जलशुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती करून पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.

उरण तालुका अतिशय विकसित आहे, असं सगळ्यांना वाटत आहे. मात्र, या तालुक्यातही आदिवासींना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्यासाठी डीपी वर्ल्ड टर्मिनलने जलशुद्धीकरण प्रकल्पाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव कामगार नेते महेंद्र घरत, डीपी वर्ल्डच्या सीईओ श्रद्धा गोळे, श्री सुब्रमण्यम, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, गटविकास अधिकारी नीलिमा गाडे आदी उपस्थित होते.

रस्ता दुरुस्त करणार येथे येत असताना रस्त्याची अवस्था पाहिली. या आदिवासींना पक्क्या रस्त्याची निर्मिती करणे क्रमप्राप्त असून, आघाडी सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदनार्शखाली या रानसई आदिवासींचा रस्ता योग्यतेने बनविणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.