शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जलवाहिन्या तुटल्याने नेरळमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:50 IST

पुलाच्या कामाचा फटका : गळतीमुळे नागरिक हैराण, रेल्वे प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी

कांता हाबळेनेरळ : नेरळ रेल्वेस्थानकाच्या पूर्व भागात मागील तीन दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेने तेथे नवीन साकव पूल तयार केला असून, त्या वेळी सर्व जलवाहिन्या तुटल्या आहेत. या सर्व जलवाहिन्यांमधून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून रेल्वेने जलवाहिन्या तोडल्याने नेरळ पूर्व भागात ऐन उन्हाळ्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

नेरळच्या पूर्व भागात, फलाट एकच्या बाहेर असलेल्या लोकवस्तीत पाडा गेट येथून रेल्वेलगत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. स्थानकात कर्जत एण्डकडे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नवीन साकव मध्य रेल्वेने बांधले आहे. या वेळी मोरी बांधताना ठेकेदाराने येथून जाणारी जलवाहिनी तोडली. त्यामुळे परिसरातील इमारतीलगत पाण्याचे तळे तयार झाले आहे, तर आजूबाजूच्या लोकवस्तीतील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. आधीच पाण्याचा दुष्काळ असताना नेरळ ग्रामपंचायतीचे जलशुद्धीकरण केंद्रातून आलेले लाखो लीटर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. मध्य रेल्वेने ठेकेदारावर लक्ष न दिल्याने नेरळ पूर्व भागातील जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची तसेच विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.कडक उन्हाळा यात पाणी नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून नेरळ ग्रामपंचायतीमधील पाणी विभागाचे सर्व कामगार गेले तीन दिवस त्याच ठिकाणी जलवाहिन्या जोडण्याचे काम करीत आहेत. मात्र, मध्य रेल्वेचे कामगार त्या ठिकाणी सतत काम करीत असल्याने जलवाहिनी जोडण्यात अडचणी येत आहेत. याबाबत नेरळ ग्रामपंचायतच्या सदस्यांनी नेरळ रेल्वेस्थानक प्रबंधक एस. आर. मीना यांच्याशी चर्चा केली. उपसरपंचांनी रेल्वेच्या कामामुळे जलवाहिनी तुटल्याने त्यांनीच ती दुरुस्त करावी, अशी मागणी केली.

नेरळ पूर्व भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाणी पुरवठा विभाग दिवसभर कामे करीत आहे. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल. - जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ