शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपट्ट्यात सांडपाणी गळतीचे लागले ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:39 IST

महाड औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी खाडीपट्टा विभागातील कुंबळे गावालगत फुटल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत.

- संदीप जाधव महाड : महाड औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी खाडीपट्टा विभागातील कुंबळे गावालगत फुटल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत. वाहिनी दुरु स्तीचे काम पूर्ण झाले असले तरी वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अपयश येत असल्याने ग्रामस्थांना सातत्याने शेती नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यातील सांडपाणी एकत्रितपणे सामूहिक प्रक्रि या केंद्रात (सीईटीपी) साठवून त्यावर प्रक्रि या करून खाडीत सोडले जाते. सीईटीपी ते सांडपाणी सोडले जाणारे ठिकाण सुमारे २५ किमी दूर आहे. सांडपाणी वाहून नेताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास वाहिनी फुटते अथवा व्हॉल्वमधून गळती सुरू होते व हे सर्व सांडपाणी आजूबाजूच्या शेतात पसरते. काही दिवसांपासून सातत्याने अशाच घटना घडल्या आहेत. येथील व्हॉल्वचीदुरूस्तीही करण्यात आली होती. याच ठिकाणी ही सांडपाणी वाहिनी फुटली. रविवार सकाळीही पुन्हा सांडपाण्याची गळती सुरू झाली. सांडपाण्याच्या फवाºयांमुळे रस्त्यावरून जाणारी वाहने, पादचारी यांना त्रास सहन करावा लागला असल्याने पाण्याच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. फुटलेल्या सांडपाण्याच्या वाहिनीचे दुरुस्तीचे काम सध्या एमआयडीसीचे अधिकारी करीत आहेत.औद्योगिक क्षेत्र स्थापन झाल्यानंतर सुमारे वीस वर्षांपूर्वी टप्प्याटप्याने सांडपाणी वाहिनीचे काम करण्यात आले. यातून रसायनमिश्रित पाणी सातत्याने जात असल्याने वायू निर्मिती व स्लज निर्मिती होत असते. या वाहिनीची मुदत संपली आहे. आता नवीन वाहिनी टाकण्याची गरज आहे. जुन्या वाहिनीचा व्यास गाळामुळे अरु ंद झाला आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने व दाब वाढू लागल्याने वाहिन्या फुटणे व गळती होणे असे प्रकार वाढत आहेत.वाहिनीतील स्लज साफ करणे अशक्य असल्याने येथे नवीन वाहिनी टाकणे हाच पर्याय आहे. सांडपाणी वाहिनी बदलण्याचा प्रस्ताव दहा वर्षापूर्वीच पाठवणे गरजेचे होते तसे न झाल्याने वाहिनी वेळेत बदलली गेली नाही. मागील वर्षी ग्रामस्थांनी आंदोलने केल्यावर ७६ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे.वर्षभरात आठवेळा वाहिनीला गळतीकोल, वडवली, गोठे, चोचिंदे, मुठवली, जुई, कुंबळे, ओवळे, तुडील फाटा, रावढळ या ठिकाणी यापूर्वी अनेकदा वाहिन्या फुटल्या आहेत. मागील वर्षभरात आठ वेळा गळती झाली. यामुळे भातशेती व कडधान्ये पीक संकटात येत असते.सांडपाण्याच्या वाहिनीसाठी ७६ कोटी रु पयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यावर आयआयटीचा अभिप्राय घेणे बाकी आहे. ते झाल्यावर हा प्रश्न मार्गी लागेल. तत्पूर्वी अस्तित्वात असलेल्या वाहिनीची स्थिती तपासण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.- पी.एस.ठेंगे, उपअभियंता, एमआयडीसी,महाड