शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रस्त्यालगत गटारात प्लास्टिक पिशव्यांचा खच; गंभीर प्रश्नकडे कानाडोळा न करता कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:15 IST

दुष्परिणाम माहीत असूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वापर 

आगरदांडा : मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत आसणा-या पाण्याच्या गटारात प्लास्टिक पिशवीच साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम माहीत असले तरी त्याचा वापर ग्रामीण भागात होताना दिसत आहे. तरी ग्रामीण भागात प्लास्टिक पिशवी कधी मुक्त होणार, असे सामान्य नागरिक विचार आहेत.

आज प्लास्टिकने सगळ्यांचेच जीवन व्यापले आहे. वापरण्यास सोपे, सहज उपलब्ध आणि स्वस्त अशा या गुणधर्मामुळे आपले जगणे प्लास्टिकमय झाले आहे. पण प्लास्टिक नष्ट होत नाही, ते आपल्या पर्यावरणात टिकून राहते आणि अंतिमत: पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत असल्यामुळे राज्यात प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी प्लास्टिकच पिशवीच्या वापर ग्रामीण भागात सर्रास होताना दिसत आहे. दैनंदिन जीवनात होत असलेल्या प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे हवा आणि पाणी प्रदूषण दिवसेंदिवस जीवनशैलीचा गळफास बनू लागला आहे. प्लास्टिकपासून जे धोके संभवतात त्यापासून काळजी घेतली पाहिजे, हे राज्य सरकारच्या मार्फत अनेक वेळा सांगत आहेत. तरीदेखील प्लास्टिकच्या विळख्यातून बाहेर पडू शकलो नाही. 

राज्यात ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली गेली होती; मात्र ही बंदी झुगारून सर्रास या पिशव्याचा वापर होताना दिसत आहे. तरी ग्रामपंचायत सरपंच यांनी या गंभीर प्रश्नकडे कानाडोळा न करता पिशवी वापर करणा-यावर दंडात्मककारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक करीत आहेत.