शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

रस्त्यालगत गटारात प्लास्टिक पिशव्यांचा खच; गंभीर प्रश्नकडे कानाडोळा न करता कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:15 IST

दुष्परिणाम माहीत असूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वापर 

आगरदांडा : मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत आसणा-या पाण्याच्या गटारात प्लास्टिक पिशवीच साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम माहीत असले तरी त्याचा वापर ग्रामीण भागात होताना दिसत आहे. तरी ग्रामीण भागात प्लास्टिक पिशवी कधी मुक्त होणार, असे सामान्य नागरिक विचार आहेत.

आज प्लास्टिकने सगळ्यांचेच जीवन व्यापले आहे. वापरण्यास सोपे, सहज उपलब्ध आणि स्वस्त अशा या गुणधर्मामुळे आपले जगणे प्लास्टिकमय झाले आहे. पण प्लास्टिक नष्ट होत नाही, ते आपल्या पर्यावरणात टिकून राहते आणि अंतिमत: पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत असल्यामुळे राज्यात प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी प्लास्टिकच पिशवीच्या वापर ग्रामीण भागात सर्रास होताना दिसत आहे. दैनंदिन जीवनात होत असलेल्या प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे हवा आणि पाणी प्रदूषण दिवसेंदिवस जीवनशैलीचा गळफास बनू लागला आहे. प्लास्टिकपासून जे धोके संभवतात त्यापासून काळजी घेतली पाहिजे, हे राज्य सरकारच्या मार्फत अनेक वेळा सांगत आहेत. तरीदेखील प्लास्टिकच्या विळख्यातून बाहेर पडू शकलो नाही. 

राज्यात ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली गेली होती; मात्र ही बंदी झुगारून सर्रास या पिशव्याचा वापर होताना दिसत आहे. तरी ग्रामपंचायत सरपंच यांनी या गंभीर प्रश्नकडे कानाडोळा न करता पिशवी वापर करणा-यावर दंडात्मककारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक करीत आहेत.