शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यापासूनच खतनिर्मिती कागदावरच

By admin | Updated: February 3, 2016 02:21 IST

नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा

कर्जत : नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही.दरम्यान, डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश टोकरे यांनी कल्याण-कर्जत राज्य मार्गालगत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न केला होता. नेरळ शहरात कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. त्यावेळी पुढील आठ दिवसात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात होईल, असे आश्वासन उप मुख्य कार्यकारी पी. एम. साळुंखे यांनी दिले होते. परंतु एक वर्ष उलटूनही या खतप्रकल्प निर्मितीला अद्याप सुरु वात झालेली नाही. त्यामुळे नेरळ शहरात जमा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये दररोज जाळण्यात येतो. सायंकाळच्या वेळी प्रचंड धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास देखील होत आहे. नेरळ शहरात जमा झालेला कचरा हा कर्जत - कल्याण रस्त्यालगत डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. नेरळ डम्पिंग ग्राऊंडमध्ये जमा झालेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. पुणे येथील एका संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारून त्यावर प्रक्रि या करून खतनिर्मिती करण्यात येणार होती. त्यावेळी त्या संस्थेने येथे येवून जागेची पाहणी केली होती. या खतप्रकल्प निर्मितीसाठी जिल्हा परिषदेकडून ३० लाख रुपये आणि उर्वरित खर्च जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या निधीतून करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे यांनी दिली होती. परंतु एक वर्ष उलटूनही अद्याप या खत प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने नेरळ शहरात जमा झालेला सर्व कचरा हा येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. नेरळ ग्रामपंचायतीने लवकर जिल्हा परिषदेकडे खतनिर्मिती प्रकल्पासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ( वार्ताहर)