शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कचऱ्यापासूनच खतनिर्मिती कागदावरच

By admin | Updated: February 3, 2016 02:21 IST

नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा

कर्जत : नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही.दरम्यान, डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश टोकरे यांनी कल्याण-कर्जत राज्य मार्गालगत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न केला होता. नेरळ शहरात कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. त्यावेळी पुढील आठ दिवसात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात होईल, असे आश्वासन उप मुख्य कार्यकारी पी. एम. साळुंखे यांनी दिले होते. परंतु एक वर्ष उलटूनही या खतप्रकल्प निर्मितीला अद्याप सुरु वात झालेली नाही. त्यामुळे नेरळ शहरात जमा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये दररोज जाळण्यात येतो. सायंकाळच्या वेळी प्रचंड धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास देखील होत आहे. नेरळ शहरात जमा झालेला कचरा हा कर्जत - कल्याण रस्त्यालगत डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. नेरळ डम्पिंग ग्राऊंडमध्ये जमा झालेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. पुणे येथील एका संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारून त्यावर प्रक्रि या करून खतनिर्मिती करण्यात येणार होती. त्यावेळी त्या संस्थेने येथे येवून जागेची पाहणी केली होती. या खतप्रकल्प निर्मितीसाठी जिल्हा परिषदेकडून ३० लाख रुपये आणि उर्वरित खर्च जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या निधीतून करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे यांनी दिली होती. परंतु एक वर्ष उलटूनही अद्याप या खत प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने नेरळ शहरात जमा झालेला सर्व कचरा हा येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. नेरळ ग्रामपंचायतीने लवकर जिल्हा परिषदेकडे खतनिर्मिती प्रकल्पासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ( वार्ताहर)