शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

कचऱ्यापासूनच खतनिर्मिती कागदावरच

By admin | Updated: February 3, 2016 02:21 IST

नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा

कर्जत : नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही.दरम्यान, डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश टोकरे यांनी कल्याण-कर्जत राज्य मार्गालगत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न केला होता. नेरळ शहरात कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. त्यावेळी पुढील आठ दिवसात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात होईल, असे आश्वासन उप मुख्य कार्यकारी पी. एम. साळुंखे यांनी दिले होते. परंतु एक वर्ष उलटूनही या खतप्रकल्प निर्मितीला अद्याप सुरु वात झालेली नाही. त्यामुळे नेरळ शहरात जमा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये दररोज जाळण्यात येतो. सायंकाळच्या वेळी प्रचंड धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास देखील होत आहे. नेरळ शहरात जमा झालेला कचरा हा कर्जत - कल्याण रस्त्यालगत डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. नेरळ डम्पिंग ग्राऊंडमध्ये जमा झालेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. पुणे येथील एका संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारून त्यावर प्रक्रि या करून खतनिर्मिती करण्यात येणार होती. त्यावेळी त्या संस्थेने येथे येवून जागेची पाहणी केली होती. या खतप्रकल्प निर्मितीसाठी जिल्हा परिषदेकडून ३० लाख रुपये आणि उर्वरित खर्च जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या निधीतून करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे यांनी दिली होती. परंतु एक वर्ष उलटूनही अद्याप या खत प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने नेरळ शहरात जमा झालेला सर्व कचरा हा येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. नेरळ ग्रामपंचायतीने लवकर जिल्हा परिषदेकडे खतनिर्मिती प्रकल्पासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ( वार्ताहर)