शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नेरळमधील शहीद मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; स्वच्छतेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:05 IST

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी

नेरळ : शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. आता शहीद मार्गावरही कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याचे गांभीर्य नेरळ ग्रामपंचायतीला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.रायगड जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळचा उल्लेख केला जातो. परंतु नियोजनाअभावी या ठिकाणी विविध समस्यांचा विळखा पडला आहे. घंटागाडी नियमित जात नसल्याने रस्त्यारस्त्यावर कचराकुंड्यांतील प्लास्टीक पिशव्यांसह कचरा बाहेर पडलेला दिसून येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. विशेष म्हणजे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा शहीद योगेश शिवाजीराव पाटील यांच्या नावाने नेरळमध्ये एका रस्त्याला ‘शहीद मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र या फलकाशेजारीच कचºयाचे ढीग साचले आहेत.एखाद्या मार्गाला संत, हुतात्मा, थोर पुरुषांची नावे दिली तर त्यांचे गांभीर्यदेखील असणे गरजेचे आहे. मात्र नेरळ ग्रापंचायतीला याचे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे संत, थोर महापुरुष तसेच हुतात्मा यांचे नाव दिलेल्या रस्त्यांची तरी स्वच्छता करावी, अशी मागणी नेरळमधील नागरिकांकडून केली जात आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याशी यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही.घंटागाडी नियमित येत नसल्याने रस्त्यालगत ठिकठिकाणी साचले कचºयाचे ढीगदुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर