शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळामध्ये पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: October 19, 2015 01:24 IST

पाणी नियमित येतच नाही आणि आलेले पाणी शुद्ध नसते. त्यामुळे आमच्या आरोग्य धोक्यात आले आहे.... लहान मुलांनासुद्धा याचा त्रास होतो.

कार्लेखिंड : पाणी नियमित येतच नाही आणि आलेले पाणी शुद्ध नसते. त्यामुळे आमच्या आरोग्य धोक्यात आले आहे.... लहान मुलांनासुद्धा याचा त्रास होतो...पिण्यासाठी शुद्ध पाणी आणण्यासाठी आम्हाला एक किलो मीटर असलेल्या वेश्वी ग्रामपंचायतीच्या नळ स्टॅडपोस्टवर जावे लागते... पाणी डोक्यावर वाहून न्यावे लागते, तसेच पाणी सायंकाळच्या दरम्यान येत असल्यामुळे अंधार पडतो... त्यामुळे खंडाळा व नेहुली या गावांमधील महिलांनी रस्त्यावर जाताना जीव मुठीत घेवून जावे लागते... इतर गावांमधील महिला पाणी भरण्यासाठी आल्यामुळे तेथील स्थानिक महिलांना त्रास होतो... परंतु त्यांना येथील पाण्याची समस्या माहित असल्याने त्या हरकत घेत नाहीत...एप्रिल महिन्यापासून तर आमचे पाण्यासाठी खूपच हाल होतात...अशी व्यथा ग्रुप ग्रापमचांयत खंडाळामधील गावामधील महिलांनी मांडली आहे. अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रुप ग्रापमचांयत खंडाळामधील गावामधील नागरिकांना आठ ते दहा दिवसांतून एकवेळच पाणी मिळत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीमधील फक्त खंडाळा नेहुली आणि साईनगर या तीनच गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून तीन इंचाच्या पाईपलाईनने साठवणूक पाणी टाकीमध्ये साठविले जाते ते पाणी आळीपाळीने तीन गावांना पुरविले जाते. ते सुद्धा आठ ते दहा दिवसांतून एकदाच ही वस्तुस्थिती असल्याची माहिती उपसरपंच अरुण नाईक यांनी दिली आहे. दोन तीन वर्षापूर्वी पाणी मुबलक असायचे मात्र सध्या वाढत्या लोकसंख्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. तिन्ही गावांतील कुटुंब साधारणत: आठशे इतकी आहेत. त्यामुळे एकावेळी मिळालेल्या पाण्यानंतर पुढले पाणी येईपर्यंत पाण्याचा साठा करावा लागतो. पाणी दर तीन महिन्यांनी तपाासले जाते. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली आहे आणि त्याचे काम सुद्धा चालू आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी ही योजना राबविणार आहोत. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या मागील जनगणनेनुसार ४ हजार १६४ एवढी असल्याची माहिती नाईक यांनी दिली. पाण्याच्या बाबतीत ग्रा.पं. कडे तक्रार अर्ज सुद्धा दिले जात आहेत. मात्र पाणी प्रश्न सुटत नाही अशी खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)