शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

वारे जांभूळवाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 22:56 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या वाड्यांना जोडणाºया रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्यापाड्यात जोडणाऱ्या या रस्त्यांकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी जांभूळवाडीतील लोकांचे हाल होत असून दळणवळणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.

आदिवासी बांधव उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त भाजीपाला लागवड, पावसाळ्यात उगवणाºया रानभाज्या शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. मात्र खराब रस्त्यांअभावी कोणतेही वाहन वस्तीवर येत नसल्याने डोक्यावर ओझे घेऊनच बाजार गाठावे लागते. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेण्यासाठी चादरीची डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते.

या ठिकाणी अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने मोलमजुरीची कामे करून नागरिक उदरनिर्वाह करतात. मात्र लोकप्रतिनिधींनी येथील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील लोकांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. काही ठिकाणी २० ते २५ वर्षांपासून रस्त्यांची कामे झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या वाड्यांना जोडणाºया रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. तीव्र उतार व चढावावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी वारे जांभूळवाडी रस्त्यावर मातीचा मुलामा चढवून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो उपायही कुचकामी ठरत आहे. रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसून येत असून त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. तातडीने उपाययोजना करून वारे जांभूळवाडी रस्ता चांगल्या दर्जाचा तयार करावा, अशी मागणी येथील आदिवासी बांधव करत आहेत.वीस वर्षे झाली तरी आमच्या वाडीचे रस्ते झाले नाहीत, खराब रस्त्यांमुळे येथे गाड्या येत नाहीत. सरकारकडून आदिवासी भागात लक्ष दिले जात नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. - यशवंत कैवारी, जांभूळवाडी ग्रामस्थवाडीच्या रस्त्याची अवस्था खराब आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नसल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासात त्रास होतो. गाड्यांचीही वारंवार कामे निघतात. त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. - प्रकाश शिंगवा, जांभूळवाडी ग्रामस्थ