शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वारे जांभूळवाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 22:56 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या वाड्यांना जोडणाºया रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्यापाड्यात जोडणाऱ्या या रस्त्यांकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी जांभूळवाडीतील लोकांचे हाल होत असून दळणवळणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.

आदिवासी बांधव उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त भाजीपाला लागवड, पावसाळ्यात उगवणाºया रानभाज्या शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. मात्र खराब रस्त्यांअभावी कोणतेही वाहन वस्तीवर येत नसल्याने डोक्यावर ओझे घेऊनच बाजार गाठावे लागते. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेण्यासाठी चादरीची डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते.

या ठिकाणी अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने मोलमजुरीची कामे करून नागरिक उदरनिर्वाह करतात. मात्र लोकप्रतिनिधींनी येथील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील लोकांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. काही ठिकाणी २० ते २५ वर्षांपासून रस्त्यांची कामे झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या वाड्यांना जोडणाºया रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. तीव्र उतार व चढावावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी वारे जांभूळवाडी रस्त्यावर मातीचा मुलामा चढवून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो उपायही कुचकामी ठरत आहे. रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसून येत असून त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. तातडीने उपाययोजना करून वारे जांभूळवाडी रस्ता चांगल्या दर्जाचा तयार करावा, अशी मागणी येथील आदिवासी बांधव करत आहेत.वीस वर्षे झाली तरी आमच्या वाडीचे रस्ते झाले नाहीत, खराब रस्त्यांमुळे येथे गाड्या येत नाहीत. सरकारकडून आदिवासी भागात लक्ष दिले जात नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. - यशवंत कैवारी, जांभूळवाडी ग्रामस्थवाडीच्या रस्त्याची अवस्था खराब आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नसल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासात त्रास होतो. गाड्यांचीही वारंवार कामे निघतात. त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. - प्रकाश शिंगवा, जांभूळवाडी ग्रामस्थ