शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

जंजिरा किल्ल्यावर जाण्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा; शिडाच्या बोटी खातात हेलकावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 23:04 IST

पर्यटकांना उतरताना होतोय त्रास

गणेश चोडणेकर आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा असून, गेली अनेक वर्षे ही मागणी मंजूर होत नसल्याने अनेक पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने ज्या वेळी शिडाच्या बोटी किल्ल्याजवळ पोहोचतात, त्याच वेळी प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने पर्यटक, ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बोटींच्या हेलकाव्यामुळे किल्ल्यात उतरणे फार मुश्कील होते. अशा वेळी उतरताना मोठा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. २०१८ च्या एप्रिल महिन्यात नाशिक येथील पर्यटक महिलेने उडी मारल्यामुळे पायाचे हाड मोडण्याची घटना घडली होती; परंतु तरीसुद्धा तरंगती जेट्टी बनवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी अडकून पडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जेट्टी बनवावी, अशी मागणी असूनसुद्धा ती पूर्ण होत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अलिबाग, मांडवा येथे असणाऱ्या तरंगत्या जेट्टीमुळे मुंबई येथून प्रवास करणे पर्यटकांना अगदी सोपे जात आहे. त्याचप्रमाणे जंजिरा किल्ल्यावरही जेट्टी बनवल्यास कोणताही अपघात होणार नसून पर्यटकांची सुरक्षा अधिक जपता येणार आहे. तरंगत्या जेट्टीचा प्रस्ताव पुरातत्त्व खात्याने स्वीकारून त्यास मंजुरीसुद्धा दिली आहे; परंतु मेरीटाइम बोर्ड या कामास सुरुवात न केल्यामुळे हा प्रस्ताव अजून कागदावरच आहे. निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु जेट्टी न झाल्याने लाखो पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.जंजिरा किल्ल्यावर तरंगती जेट्टी बांधण्याची अनुमती पुरातत्त्व खात्याने दिलेली आहे. या जेट्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे असून त्यांनी हे काम सुरू करणे अपेक्षित आहे. कारण या कामासाठी निधीसुद्धा त्यांच्याकडे वर्ग झाला आहे, त्यांनी हे काम तातडीने सुरू करावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. सध्या या किल्ल्यावर जेट्टी नसल्याने पर्यटकांना मोठ्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. - बजरंग येलकर, पुरातत्त्व अधिकारी, मुरुड