शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

जंजिरा किल्ल्यावर जाण्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा; शिडाच्या बोटी खातात हेलकावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 23:04 IST

पर्यटकांना उतरताना होतोय त्रास

गणेश चोडणेकर आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा असून, गेली अनेक वर्षे ही मागणी मंजूर होत नसल्याने अनेक पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने ज्या वेळी शिडाच्या बोटी किल्ल्याजवळ पोहोचतात, त्याच वेळी प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने पर्यटक, ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बोटींच्या हेलकाव्यामुळे किल्ल्यात उतरणे फार मुश्कील होते. अशा वेळी उतरताना मोठा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. २०१८ च्या एप्रिल महिन्यात नाशिक येथील पर्यटक महिलेने उडी मारल्यामुळे पायाचे हाड मोडण्याची घटना घडली होती; परंतु तरीसुद्धा तरंगती जेट्टी बनवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी अडकून पडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जेट्टी बनवावी, अशी मागणी असूनसुद्धा ती पूर्ण होत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अलिबाग, मांडवा येथे असणाऱ्या तरंगत्या जेट्टीमुळे मुंबई येथून प्रवास करणे पर्यटकांना अगदी सोपे जात आहे. त्याचप्रमाणे जंजिरा किल्ल्यावरही जेट्टी बनवल्यास कोणताही अपघात होणार नसून पर्यटकांची सुरक्षा अधिक जपता येणार आहे. तरंगत्या जेट्टीचा प्रस्ताव पुरातत्त्व खात्याने स्वीकारून त्यास मंजुरीसुद्धा दिली आहे; परंतु मेरीटाइम बोर्ड या कामास सुरुवात न केल्यामुळे हा प्रस्ताव अजून कागदावरच आहे. निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु जेट्टी न झाल्याने लाखो पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.जंजिरा किल्ल्यावर तरंगती जेट्टी बांधण्याची अनुमती पुरातत्त्व खात्याने दिलेली आहे. या जेट्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे असून त्यांनी हे काम सुरू करणे अपेक्षित आहे. कारण या कामासाठी निधीसुद्धा त्यांच्याकडे वर्ग झाला आहे, त्यांनी हे काम तातडीने सुरू करावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. सध्या या किल्ल्यावर जेट्टी नसल्याने पर्यटकांना मोठ्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. - बजरंग येलकर, पुरातत्त्व अधिकारी, मुरुड