शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्यावर जाण्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा; शिडाच्या बोटी खातात हेलकावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 23:04 IST

पर्यटकांना उतरताना होतोय त्रास

गणेश चोडणेकर आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा असून, गेली अनेक वर्षे ही मागणी मंजूर होत नसल्याने अनेक पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने ज्या वेळी शिडाच्या बोटी किल्ल्याजवळ पोहोचतात, त्याच वेळी प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने पर्यटक, ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बोटींच्या हेलकाव्यामुळे किल्ल्यात उतरणे फार मुश्कील होते. अशा वेळी उतरताना मोठा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. २०१८ च्या एप्रिल महिन्यात नाशिक येथील पर्यटक महिलेने उडी मारल्यामुळे पायाचे हाड मोडण्याची घटना घडली होती; परंतु तरीसुद्धा तरंगती जेट्टी बनवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी अडकून पडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जेट्टी बनवावी, अशी मागणी असूनसुद्धा ती पूर्ण होत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अलिबाग, मांडवा येथे असणाऱ्या तरंगत्या जेट्टीमुळे मुंबई येथून प्रवास करणे पर्यटकांना अगदी सोपे जात आहे. त्याचप्रमाणे जंजिरा किल्ल्यावरही जेट्टी बनवल्यास कोणताही अपघात होणार नसून पर्यटकांची सुरक्षा अधिक जपता येणार आहे. तरंगत्या जेट्टीचा प्रस्ताव पुरातत्त्व खात्याने स्वीकारून त्यास मंजुरीसुद्धा दिली आहे; परंतु मेरीटाइम बोर्ड या कामास सुरुवात न केल्यामुळे हा प्रस्ताव अजून कागदावरच आहे. निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु जेट्टी न झाल्याने लाखो पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.जंजिरा किल्ल्यावर तरंगती जेट्टी बांधण्याची अनुमती पुरातत्त्व खात्याने दिलेली आहे. या जेट्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे असून त्यांनी हे काम सुरू करणे अपेक्षित आहे. कारण या कामासाठी निधीसुद्धा त्यांच्याकडे वर्ग झाला आहे, त्यांनी हे काम तातडीने सुरू करावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. सध्या या किल्ल्यावर जेट्टी नसल्याने पर्यटकांना मोठ्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. - बजरंग येलकर, पुरातत्त्व अधिकारी, मुरुड