शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कालव्याच्या पाण्याची शेतक-यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:49 IST

स्थानिक आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रु पये मंजूर केलेले आहेत, परंतु हा निधी वर्ग न झाल्याने कालव्यांच्या कामाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे

नांदगाव/मुरुड : स्थानिक आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रु पये मंजूर केलेले आहेत, परंतु हा निधी वर्ग न झाल्याने कालव्यांच्या कामाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. आंबोली धरण बांधून दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला असतानासुद्धा कालव्यांची कामे केली नव्हती. त्या काळापासून ही कामे प्रलंबितच राहिली. त्यामुळे हजारो शेतकºयांना अजूनपर्यंत दुबार शेतीचा फायदा घेता आलेला नाही. आमदारांनी मंजूर केलेले १२ कोटी जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत कालव्यांच्या कामाला सुरु वात होणार नाही असे एकंदर चित्र दिसत आहे.राज्यभर शासन जलयुक्त शिवार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत असून अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणून बळीराजाचे मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून २०१५ पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. खारआंबोली धरणाची पाणी साठवणूक क्षमता प्रचंड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकºयांना पूरक व्यवसायाची संधी मिळणार आहे. विशेष भूसंपादन अधिकाºयांनी नोव्हेंबर २००६ मध्ये तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शिघ्रे तसेच हाफिजखार, अंबोली, गोयगान आदी गावांतील शेतक ºयांची १६ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली. जमिनीची नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ६४ लाखांचे वाटप उपविभागीय अधिकारी अलिबाग कार्यालयामार्फत करण्यात आले. परंतु प्रकल्पग्रस्त शेतकºयांना सुधारित दराने मोबदला मिळावा अशी भूमिपुत्रांची मागणी आहे.आंबोली धरणाचा शुभारंभ २००९ मध्ये करण्यात आला. धरणातून मुरु डसह लगतच्या २२ गावांची जीवन वाहिनी ठरली असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. आंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम ७.१० कि.मी. पैकी ६.१० कि.मी.अपूर्ण असून डाव्या तीर कालव्याचे २.६४ कि.मी.पैकी १.६४ कि.मी.काम अपूर्ण आहे.आमदार सुभाष पाटील हे तीर कालव्याबद्दल गांभीर्याने पाठपुरावा करत असून अल्पभूधारक शेतकºयांना धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यास जोडधंदा मिळेल. त्यातून रोजगार मिळावा अशी त्यांची धारणा आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात कालव्याचे काम सुरू होण्यासंदर्भात बैठका पार पडल्या, आश्वासन मिळाले मात्र प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने शेतकºयामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.