शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या पाण्याची शेतक-यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:49 IST

स्थानिक आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रु पये मंजूर केलेले आहेत, परंतु हा निधी वर्ग न झाल्याने कालव्यांच्या कामाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे

नांदगाव/मुरुड : स्थानिक आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रु पये मंजूर केलेले आहेत, परंतु हा निधी वर्ग न झाल्याने कालव्यांच्या कामाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. आंबोली धरण बांधून दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला असतानासुद्धा कालव्यांची कामे केली नव्हती. त्या काळापासून ही कामे प्रलंबितच राहिली. त्यामुळे हजारो शेतकºयांना अजूनपर्यंत दुबार शेतीचा फायदा घेता आलेला नाही. आमदारांनी मंजूर केलेले १२ कोटी जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत कालव्यांच्या कामाला सुरु वात होणार नाही असे एकंदर चित्र दिसत आहे.राज्यभर शासन जलयुक्त शिवार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत असून अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणून बळीराजाचे मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून २०१५ पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. खारआंबोली धरणाची पाणी साठवणूक क्षमता प्रचंड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकºयांना पूरक व्यवसायाची संधी मिळणार आहे. विशेष भूसंपादन अधिकाºयांनी नोव्हेंबर २००६ मध्ये तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शिघ्रे तसेच हाफिजखार, अंबोली, गोयगान आदी गावांतील शेतक ºयांची १६ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली. जमिनीची नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ६४ लाखांचे वाटप उपविभागीय अधिकारी अलिबाग कार्यालयामार्फत करण्यात आले. परंतु प्रकल्पग्रस्त शेतकºयांना सुधारित दराने मोबदला मिळावा अशी भूमिपुत्रांची मागणी आहे.आंबोली धरणाचा शुभारंभ २००९ मध्ये करण्यात आला. धरणातून मुरु डसह लगतच्या २२ गावांची जीवन वाहिनी ठरली असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. आंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम ७.१० कि.मी. पैकी ६.१० कि.मी.अपूर्ण असून डाव्या तीर कालव्याचे २.६४ कि.मी.पैकी १.६४ कि.मी.काम अपूर्ण आहे.आमदार सुभाष पाटील हे तीर कालव्याबद्दल गांभीर्याने पाठपुरावा करत असून अल्पभूधारक शेतकºयांना धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यास जोडधंदा मिळेल. त्यातून रोजगार मिळावा अशी त्यांची धारणा आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात कालव्याचे काम सुरू होण्यासंदर्भात बैठका पार पडल्या, आश्वासन मिळाले मात्र प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने शेतकºयामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.