शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

मतदान हे राष्ट्रहितासाठी महत्त्वपूर्ण

By admin | Updated: January 26, 2017 03:24 IST

कोणत्याही निवडणुकीत आपण केलेले मतदान हे नेहमीच राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असून ते स्वहितही साधणारे असते. त्यामुळे कोणत्याही

अलिबाग : कोणत्याही निवडणुकीत आपण केलेले मतदान हे नेहमीच राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असून ते स्वहितही साधणारे असते. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयतेने मतदानाचे पवित्र व राष्ट्रीय कार्य सर्व पात्र मतदारांनी करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शीतल तेली-उगले यांनी बुधवारी येथे बोलताना केले आहे.येथील को.ए.सो.जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलच्या सभागृहात अलिबाग प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्र मात तेली-उगले बोलत होत्या. जिल्हाधिकारी तेली-उगले पुढे म्हणाल्या, वयाच्या १८ व्या वर्षी आपणास मतदानाचा हक्क प्रप्त होतो आणि आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते. हा हक्क आयुष्याच्या शेवटपर्यंत आपणास लाभतो. मतदान हे महत्त्वाचे असे दान आहे. त्यातून आपली लोकशाही बळकट व सक्षम होते. त्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करण्याचा संकल्प आजच्या या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त करणे आवश्यक आहे. या उपक्र मा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचे जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यावेळी बोलताना म्हणाले, आपली लोकशाही दिवसेंदिवस बळकट होत आहे, याचे श्रेय आपल्या देशातील नागरिकांचेच आहे. मतदार जनजागृतीसाठी सर्व युवा वर्गाने पुढे यावे. आपले मित्र, आपल्या परिवारातील पात्र सदस्य यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करु न घेण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदान प्रक्रि येत युवा पिढीने सदिच्छादूत म्हणून कार्य करावे. ज्या योगे आपली लोकशाही अधिक भक्कम होऊ शकेल,असे नार्वेकर यांनी नमूद केले.प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व विषद करत त्यांच्या विभागाने घेतलेल्या विविध उपक्र मांचा थोडक्यात आढावा घेतला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करु न कार्यक्र माचा शुभारंभ केला तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके दिले.