शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

वोट फॉर ‘स्वच्छ रायगड’, ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:10 IST

विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे.

-आविष्कार देसाईअलिबाग : विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे. आॅनलाइन मते मिळवण्यात नाशिक जिल्हा ३० हजार मते मिळवून सर्वात पुढे आहे, तर रायगड जिल्हा १२ हजार मते घेऊन आठव्या स्थानावर आहे, ही आकडेवारी शुक्रवारपर्यंतची आहे.१ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत तुम्हाला तुमचे मत द्यायचे आहे, यासाठी ‘एसएसजी १८’ हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानकांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्वेक्षणात भारतातील सर्व जिल्ह्यांचे प्रामुख्याने तीन मानकांच्या आधारे जिल्ह्यातील व गावातील स्वच्छता व स्वच्छतेशी निगडित कामांची गुणवत्ता, संख्याबळ लक्षात घेऊन स्वतंत्र संस्थेमार्फत रँकिंग ठरवण्यात येणार आहे.सर्वेक्षणाद्वारे निश्चित होणारे गुणांकन हे एकत्रित मानकांच्या आधारे जिल्ह्यातील काही गावांतील सार्वजनिक ठिकाणी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे आदी ठिकाणची निरीक्षणे तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेची समज आणि मते घेतली जाणार आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार यासाठी घेण्यात येणार आहे. या सर्व्हेचा प्रमुख भाग म्हणजे यातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्यांची आणि राज्याची स्वच्छतेमधील स्थानासह क्रमावारी निश्चित होणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत स्तरावरील उपक्रमग्रामपंचायत आणि सर्व सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य ठेवणेवैयक्तिक शौचालयाचा वापर आणि फोटो अपलोडिंग १०० टक्के करणेनादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करून त्याचा वापर करणेशौचालयाच्या स्थितीबाबतचा रेकॉर्ड ठेवणेस्वच्छग्राही यांनी सक्रिय सहभाग घेणेनिगराणी समिती गठीत करून ती सक्रिय करणेसांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन करणेउपक्रमांची विविध मार्गाने जनजागृती करणे‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’प्रत्येक जिल्ह्यातील किमान १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड सर्वेक्षणासाठी नमुना निवड पद्धतीने सर्वेक्षण संस्थेकडून करण्यात येणार आहे. ५० लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व आॅनलाइन सहभाग घेतला जाणार आहे. हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅगस्ट २०१८ कालावधीत होणार आहे.असे असेल स्वच्छ सर्वेक्षणकेंद्र सरकारने नेमलेल्या संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सर्व प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश राहणार आहे.गावातील विविध लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. एसएसजी १८ या अ‍ॅपवरील मतेही प्रामुख्याने विचारात घेतली जाणार आहेत.एका क्रमांकासाठी एकच मतएसएसजी १८ हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर एका मोबाइल क्रमांकाच्या व्यक्तीला एकदाच मत देता येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपली मते नोंदवून जिल्ह्याला पहिल्यास्थानी आणावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या