शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

वोट फॉर ‘स्वच्छ रायगड’, ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:10 IST

विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे.

-आविष्कार देसाईअलिबाग : विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे. आॅनलाइन मते मिळवण्यात नाशिक जिल्हा ३० हजार मते मिळवून सर्वात पुढे आहे, तर रायगड जिल्हा १२ हजार मते घेऊन आठव्या स्थानावर आहे, ही आकडेवारी शुक्रवारपर्यंतची आहे.१ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत तुम्हाला तुमचे मत द्यायचे आहे, यासाठी ‘एसएसजी १८’ हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानकांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्वेक्षणात भारतातील सर्व जिल्ह्यांचे प्रामुख्याने तीन मानकांच्या आधारे जिल्ह्यातील व गावातील स्वच्छता व स्वच्छतेशी निगडित कामांची गुणवत्ता, संख्याबळ लक्षात घेऊन स्वतंत्र संस्थेमार्फत रँकिंग ठरवण्यात येणार आहे.सर्वेक्षणाद्वारे निश्चित होणारे गुणांकन हे एकत्रित मानकांच्या आधारे जिल्ह्यातील काही गावांतील सार्वजनिक ठिकाणी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे आदी ठिकाणची निरीक्षणे तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेची समज आणि मते घेतली जाणार आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार यासाठी घेण्यात येणार आहे. या सर्व्हेचा प्रमुख भाग म्हणजे यातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्यांची आणि राज्याची स्वच्छतेमधील स्थानासह क्रमावारी निश्चित होणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत स्तरावरील उपक्रमग्रामपंचायत आणि सर्व सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य ठेवणेवैयक्तिक शौचालयाचा वापर आणि फोटो अपलोडिंग १०० टक्के करणेनादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करून त्याचा वापर करणेशौचालयाच्या स्थितीबाबतचा रेकॉर्ड ठेवणेस्वच्छग्राही यांनी सक्रिय सहभाग घेणेनिगराणी समिती गठीत करून ती सक्रिय करणेसांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन करणेउपक्रमांची विविध मार्गाने जनजागृती करणे‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’प्रत्येक जिल्ह्यातील किमान १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड सर्वेक्षणासाठी नमुना निवड पद्धतीने सर्वेक्षण संस्थेकडून करण्यात येणार आहे. ५० लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व आॅनलाइन सहभाग घेतला जाणार आहे. हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅगस्ट २०१८ कालावधीत होणार आहे.असे असेल स्वच्छ सर्वेक्षणकेंद्र सरकारने नेमलेल्या संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सर्व प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश राहणार आहे.गावातील विविध लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. एसएसजी १८ या अ‍ॅपवरील मतेही प्रामुख्याने विचारात घेतली जाणार आहेत.एका क्रमांकासाठी एकच मतएसएसजी १८ हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर एका मोबाइल क्रमांकाच्या व्यक्तीला एकदाच मत देता येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपली मते नोंदवून जिल्ह्याला पहिल्यास्थानी आणावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या