शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वोट फॉर ‘स्वच्छ रायगड’, ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:10 IST

विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे.

-आविष्कार देसाईअलिबाग : विविध रिअ‍ॅलिटी शोसाठी आवडत्या कलाकाराला जिंकण्यासाठी वोटिंग करून आपण मदत करतो; परंतु आता जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात आणि राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी वोटिंग करायचे आहे. आॅनलाइन मते मिळवण्यात नाशिक जिल्हा ३० हजार मते मिळवून सर्वात पुढे आहे, तर रायगड जिल्हा १२ हजार मते घेऊन आठव्या स्थानावर आहे, ही आकडेवारी शुक्रवारपर्यंतची आहे.१ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत तुम्हाला तुमचे मत द्यायचे आहे, यासाठी ‘एसएसजी १८’ हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानकांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सर्वेक्षणात भारतातील सर्व जिल्ह्यांचे प्रामुख्याने तीन मानकांच्या आधारे जिल्ह्यातील व गावातील स्वच्छता व स्वच्छतेशी निगडित कामांची गुणवत्ता, संख्याबळ लक्षात घेऊन स्वतंत्र संस्थेमार्फत रँकिंग ठरवण्यात येणार आहे.सर्वेक्षणाद्वारे निश्चित होणारे गुणांकन हे एकत्रित मानकांच्या आधारे जिल्ह्यातील काही गावांतील सार्वजनिक ठिकाणी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे आदी ठिकाणची निरीक्षणे तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेची समज आणि मते घेतली जाणार आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार यासाठी घेण्यात येणार आहे. या सर्व्हेचा प्रमुख भाग म्हणजे यातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्यांची आणि राज्याची स्वच्छतेमधील स्थानासह क्रमावारी निश्चित होणार आहे. सर्वाेच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्ये यांना २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत स्तरावरील उपक्रमग्रामपंचायत आणि सर्व सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य ठेवणेवैयक्तिक शौचालयाचा वापर आणि फोटो अपलोडिंग १०० टक्के करणेनादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करून त्याचा वापर करणेशौचालयाच्या स्थितीबाबतचा रेकॉर्ड ठेवणेस्वच्छग्राही यांनी सक्रिय सहभाग घेणेनिगराणी समिती गठीत करून ती सक्रिय करणेसांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन करणेउपक्रमांची विविध मार्गाने जनजागृती करणे‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’प्रत्येक जिल्ह्यातील किमान १० ते १६ ग्रामपंचायतींची निवड सर्वेक्षणासाठी नमुना निवड पद्धतीने सर्वेक्षण संस्थेकडून करण्यात येणार आहे. ५० लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व आॅनलाइन सहभाग घेतला जाणार आहे. हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅगस्ट २०१८ कालावधीत होणार आहे.असे असेल स्वच्छ सर्वेक्षणकेंद्र सरकारने नेमलेल्या संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सर्व प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश राहणार आहे.गावातील विविध लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. एसएसजी १८ या अ‍ॅपवरील मतेही प्रामुख्याने विचारात घेतली जाणार आहेत.एका क्रमांकासाठी एकच मतएसएसजी १८ हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर एका मोबाइल क्रमांकाच्या व्यक्तीला एकदाच मत देता येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपली मते नोंदवून जिल्ह्याला पहिल्यास्थानी आणावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या