शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

अलिबागमध्ये आचारसंहितेच्या धसक्याने विकासकामांच्या कोनशिला झाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:45 IST

मतदारांना तक्रार करण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन

- आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय, घोषणा यावर निर्बंध आले आहेत. याच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश विकासकामांच्या पाट्या, फलक, कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास आता मतदारांनी थेट तक्रार करण्याचे आवाहनही निवडणूक विभागाने केले आहे.देशभरात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे पुढील तब्बल एक महिनाभर प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार असल्याने ऐन उन्हाळ््यात पारा चांगलाच चढलेला असणार आहे.निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष, प्रशासनाने नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे. आचारसंहितेचे कसे पालन करायचे आहे याबाबत स्पष्ट आदेश निवडणूक विभागाने जारी केले आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवणे, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या घटना, घोषणा अथवा निर्णय घेता येणार नाहीत. त्याचप्रमाणे स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे, सरकारी वाहनांचा वापर, अनुदानाचे वाटप, सरकारी जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांचे उद्घाटन यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या सभा, बैठकांवर निवडणूक विभागाचे बारीक लक्ष राहणार आहे. आचारसंहितेचा भंग करण्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. राजकीय पक्षांनी आतापर्यंत विकासकामे केलेली आहेत. विकासकामे, योजना यांची माहिती होण्यासाठी त्या ठिकाणी कोनशिला, फलक लावण्यात आलेले आहेत. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयात अशा विकासकामांच्या पाट्या, कोनशिला फलक मोठ्या संख्येने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो असे गृहीत धरून बहुतांश पाट्या, फलक कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अलिबागमधील विकासकामांच्या पाट्यांचा समावेश आहे.प्रत्येक राजकीय पक्षाने, उमेदवाराने आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा घटना रोखण्यासाठी मतदारांनीही सक्रिय होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदार आपल्या मोबाइल फोनद्वारे ‘सी-व्हीजल अ‍ॅप’च्या साहायाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो. प्रत्येक तक्रारदारास त्याच्या तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती १०० मिनिटात देणे निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. तक्रारदारांच्या इच्छेनुसार तक्रारीची माहिती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९alibaugअलिबाग