शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

अलिबागमध्ये आचारसंहितेच्या धसक्याने विकासकामांच्या कोनशिला झाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:45 IST

मतदारांना तक्रार करण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन

- आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय, घोषणा यावर निर्बंध आले आहेत. याच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश विकासकामांच्या पाट्या, फलक, कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास आता मतदारांनी थेट तक्रार करण्याचे आवाहनही निवडणूक विभागाने केले आहे.देशभरात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे पुढील तब्बल एक महिनाभर प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार असल्याने ऐन उन्हाळ््यात पारा चांगलाच चढलेला असणार आहे.निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष, प्रशासनाने नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे. आचारसंहितेचे कसे पालन करायचे आहे याबाबत स्पष्ट आदेश निवडणूक विभागाने जारी केले आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवणे, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या घटना, घोषणा अथवा निर्णय घेता येणार नाहीत. त्याचप्रमाणे स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे, सरकारी वाहनांचा वापर, अनुदानाचे वाटप, सरकारी जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांचे उद्घाटन यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या सभा, बैठकांवर निवडणूक विभागाचे बारीक लक्ष राहणार आहे. आचारसंहितेचा भंग करण्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. राजकीय पक्षांनी आतापर्यंत विकासकामे केलेली आहेत. विकासकामे, योजना यांची माहिती होण्यासाठी त्या ठिकाणी कोनशिला, फलक लावण्यात आलेले आहेत. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयात अशा विकासकामांच्या पाट्या, कोनशिला फलक मोठ्या संख्येने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो असे गृहीत धरून बहुतांश पाट्या, फलक कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अलिबागमधील विकासकामांच्या पाट्यांचा समावेश आहे.प्रत्येक राजकीय पक्षाने, उमेदवाराने आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा घटना रोखण्यासाठी मतदारांनीही सक्रिय होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदार आपल्या मोबाइल फोनद्वारे ‘सी-व्हीजल अ‍ॅप’च्या साहायाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो. प्रत्येक तक्रारदारास त्याच्या तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती १०० मिनिटात देणे निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. तक्रारदारांच्या इच्छेनुसार तक्रारीची माहिती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९alibaugअलिबाग