शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अलिबागमध्ये आचारसंहितेच्या धसक्याने विकासकामांच्या कोनशिला झाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:45 IST

मतदारांना तक्रार करण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन

- आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय, घोषणा यावर निर्बंध आले आहेत. याच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश विकासकामांच्या पाट्या, फलक, कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास आता मतदारांनी थेट तक्रार करण्याचे आवाहनही निवडणूक विभागाने केले आहे.देशभरात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे पुढील तब्बल एक महिनाभर प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार असल्याने ऐन उन्हाळ््यात पारा चांगलाच चढलेला असणार आहे.निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष, प्रशासनाने नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे. आचारसंहितेचे कसे पालन करायचे आहे याबाबत स्पष्ट आदेश निवडणूक विभागाने जारी केले आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवणे, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या घटना, घोषणा अथवा निर्णय घेता येणार नाहीत. त्याचप्रमाणे स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे, सरकारी वाहनांचा वापर, अनुदानाचे वाटप, सरकारी जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांचे उद्घाटन यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या सभा, बैठकांवर निवडणूक विभागाचे बारीक लक्ष राहणार आहे. आचारसंहितेचा भंग करण्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. राजकीय पक्षांनी आतापर्यंत विकासकामे केलेली आहेत. विकासकामे, योजना यांची माहिती होण्यासाठी त्या ठिकाणी कोनशिला, फलक लावण्यात आलेले आहेत. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयात अशा विकासकामांच्या पाट्या, कोनशिला फलक मोठ्या संख्येने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो असे गृहीत धरून बहुतांश पाट्या, फलक कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अलिबागमधील विकासकामांच्या पाट्यांचा समावेश आहे.प्रत्येक राजकीय पक्षाने, उमेदवाराने आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा घटना रोखण्यासाठी मतदारांनीही सक्रिय होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदार आपल्या मोबाइल फोनद्वारे ‘सी-व्हीजल अ‍ॅप’च्या साहायाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो. प्रत्येक तक्रारदारास त्याच्या तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती १०० मिनिटात देणे निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. तक्रारदारांच्या इच्छेनुसार तक्रारीची माहिती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९alibaugअलिबाग