शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

उमटे धरणामुळे गावांना धोका; ग्रामस्थांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:22 IST

तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाऱ्या उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढल्यास धरणाच्या भिंतीला भगदाड पडून मोठ्या आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाऱ्या उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढल्यास धरणाच्या भिंतीला भगदाड पडून मोठ्या आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांकडून याबाबत तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याने धरणाची परिस्थिती जैसे थे आहे. हजारो नागरिकांचा जीव धोक्यात घालणाºया प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने उमटे धरणाबाबत उपाययोजना करून हजारो नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरामध्ये १९७८ साली उमटे धरणाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर १९९५ साली हे धरण प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आले होते. धरण हस्तांतरित करण्यात आल्याने धरणाची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची उंची ५६.४० मीटर असल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. धरणाचा निव्वळ पाणीसाठा हा ८१ दशलक्ष घनफूट आहे. याच धरणातून सुमारे ५२ हजार लोकसंख्येला पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणामुळे येथील परिसर चांगलाच सुजलाम सुफलाम झाला आहे. कडक उन्हाळ््यात सुध्दा या धरणातील पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतो.रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गावे पाणीटंचाईच्या गर्तेत असताना, उमटे धरण परिसरातील गावांना नळपाणी योजनांमधून चोवीस तास पाणीपुरवठा सुरू असतो. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत नाही. गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने, तसेच धरणातील गाळ न काढल्यामुळे नागरिकांना याच धरणातील अशुध्द पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे.धरण नागरिकांच्या सुविधेसाठी बांधले असले तरी, आता नागरिकांनाच या धरणाची भीती वाटत आहे.उमटे धरणाला तब्बल ४० वर्षे झाली आहेत. धरणाची योग्य तशी देखभाल दुरुस्ती न केल्याने धरणाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते. धरणाच्या आतील बाजूकडील दगडी भिंतीचे दगड मोठ्या संख्येने निखळले आहेत. त्यामुळे तेथील भिंतीला भगदाड पडल्याचे दिसून येते. अशीच स्थिती धरणाच्या भिंतीच्या ठरावीक अंतरावर दिसून येते. काही ठिकाणी धरणाच्या पायाजवळील दगड मोठ्या प्रमाणात खचलेले दिसून येतात.अतिवृष्टीमुळे धरणाला धोकातालुक्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो. त्यामुळे धरणात पाणी मोठ्या संख्येने साठते, परंतु कित्येक वर्षे धरणातील गाळ काढला नसल्यामुळे पाणीसाठा कमी झाला आहे.धरणाच्या भिंतींना मोठमोठी भगदाडे पडलेली आहेत, तर काही ठिकाणी धरणाच्या पायाखालील दगड खचलेले आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचा जोर त्या भिंतीवर येऊन भिंतीला खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसे झाले तर, धरणाची भिंत फुटून गावात जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला उमटे धरणाची दुरवस्था व लवकरात लवकर डागडुजी करण्याबाबत वेळोवेळी कल्पना दिलेली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. तक्रारीनंतर उपअभियंत्यांसह अन्य अधिकारी येऊन फक्त पाहणी करून जातात. लवकरच सुधारणा करण्यात येईल, असे मोघम उत्तर देतात.- अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर, ग्रामपंचायत सदस्य, बोरघरधरणाची अवस्था अतिशय खराब आहे. यंदाच्या पावसाळ््यात धरणामुळे परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून भविष्यात उद्भवणारी आपत्ती रोखावी.- अजय गायकर, ग्रामस्थ

टॅग्स :Raigadरायगड