शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील माती बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 23:08 IST

निकृष्ट दर्जाच्या कामाची ओरड : अभियंता नसल्याने व्यक्त के ली नाराजी

मुरुड : खारभूमी विभागामार्फत मुरुड शहरातील मयेकर यांच्या शेतामधील पुढील भागापासून ते आंबोली येथील स्मशानभूमी परिसरापर्यंत मातीचा मोठा बंधारा बांधण्यात येत आहे. वरची आळी आंबोली गावातील ग्रामस्थांनी हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणल्याने काम बंद पडले आहे. ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अनागोंदी कारभारावरसुद्धा आक्षेप नोंदवला आहे. काम पूर्ण झाले नसताना अ‍ॅडव्हान्स बिल का अदा करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करून कोट्यवधी रुपयांचे काम सुरू असताना खारभूमी विभागाचा कोणताही अधिकारी अथवा अभियंता उपस्थित राहत नाही, याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

लक्ष्मीखार, तेलवडे व आंबोली परिसरातील समुद्राचे पाणी भात शेतीमध्ये शिरू नये, यासाठी कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात येत आहे. तेलवडे, शीघ्रे ते आंबोली परिसरातील असंख्य एकर जमीन गेल्या कित्येक वर्षांपासून समुद्राचे पाणी जाऊन नापीक बनली आहे. यासाठी हा बंधारा बांधण्यात येत आहे. आंबोली स्मशानभूमीपर्यंत हे काम आले असून काम सुरू करताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम पूर्ण करण्यात येत असल्याची ओरड येथील ग्रामस्थांनी केली आहे. सर्व एकत्र जमून त्यांनी सुरू असलेल्या मातीच्या भरावाचे काम बंद पाडले आहे. या बंधाºयाची उंची या अगोदरच १२ फूट आहे. त्यावरच ठेकेदाराने फक्त सहा इंची मातीचा भराव टाकल्याचे ग्रामस्थांची ओरड आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसून, संबंधित ठेकेदाराने या कामाचे विश्लेषण ग्रामस्थांना भेटून करण्यात यावे, अशी मागणी केली. जोपर्यंत ठेकेदार ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा एल्गार ग्रामस्थांनी करून सुरू असलेले काम तातडीने बंद करण्यात आले आहे. बंधाºयाचे काम बंद पाडण्यामध्ये खारआंबोली वरची वाडीमधील अध्यक्ष महादेव कमाने, मंगेश ठाकूर, मनोज दामोदर कमाने, संदीप ठाकूर, वसंत खंडागळे, हरी ठाकूर, महेंद्र बैकर आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.उपस्थित व्यवस्थापकाने ग्रामस्थांना मूळ ठेकेदारांशी संवाद करून दिला, त्या वेळी लवकरच येथील ग्रामस्थांशी भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे अभिवाचन दिले आहे.