शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आंबोलीतील माती बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 23:08 IST

निकृष्ट दर्जाच्या कामाची ओरड : अभियंता नसल्याने व्यक्त के ली नाराजी

मुरुड : खारभूमी विभागामार्फत मुरुड शहरातील मयेकर यांच्या शेतामधील पुढील भागापासून ते आंबोली येथील स्मशानभूमी परिसरापर्यंत मातीचा मोठा बंधारा बांधण्यात येत आहे. वरची आळी आंबोली गावातील ग्रामस्थांनी हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणल्याने काम बंद पडले आहे. ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अनागोंदी कारभारावरसुद्धा आक्षेप नोंदवला आहे. काम पूर्ण झाले नसताना अ‍ॅडव्हान्स बिल का अदा करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करून कोट्यवधी रुपयांचे काम सुरू असताना खारभूमी विभागाचा कोणताही अधिकारी अथवा अभियंता उपस्थित राहत नाही, याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

लक्ष्मीखार, तेलवडे व आंबोली परिसरातील समुद्राचे पाणी भात शेतीमध्ये शिरू नये, यासाठी कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात येत आहे. तेलवडे, शीघ्रे ते आंबोली परिसरातील असंख्य एकर जमीन गेल्या कित्येक वर्षांपासून समुद्राचे पाणी जाऊन नापीक बनली आहे. यासाठी हा बंधारा बांधण्यात येत आहे. आंबोली स्मशानभूमीपर्यंत हे काम आले असून काम सुरू करताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम पूर्ण करण्यात येत असल्याची ओरड येथील ग्रामस्थांनी केली आहे. सर्व एकत्र जमून त्यांनी सुरू असलेल्या मातीच्या भरावाचे काम बंद पाडले आहे. या बंधाºयाची उंची या अगोदरच १२ फूट आहे. त्यावरच ठेकेदाराने फक्त सहा इंची मातीचा भराव टाकल्याचे ग्रामस्थांची ओरड आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसून, संबंधित ठेकेदाराने या कामाचे विश्लेषण ग्रामस्थांना भेटून करण्यात यावे, अशी मागणी केली. जोपर्यंत ठेकेदार ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा एल्गार ग्रामस्थांनी करून सुरू असलेले काम तातडीने बंद करण्यात आले आहे. बंधाºयाचे काम बंद पाडण्यामध्ये खारआंबोली वरची वाडीमधील अध्यक्ष महादेव कमाने, मंगेश ठाकूर, मनोज दामोदर कमाने, संदीप ठाकूर, वसंत खंडागळे, हरी ठाकूर, महेंद्र बैकर आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.उपस्थित व्यवस्थापकाने ग्रामस्थांना मूळ ठेकेदारांशी संवाद करून दिला, त्या वेळी लवकरच येथील ग्रामस्थांशी भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे अभिवाचन दिले आहे.