शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पेठ गावचे ग्रामस्थ विहीर खोदण्यासाठी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:31 IST

पाणीटंचाईची झळ; टेंभरे ग्रामपंचायतीची उदासीनता

कर्जत : तालुक्यात ऐतिहासिक पेठचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ गाव वसलेले असून टेंभरे ग्रामपंचायत हद्दीत येते. अशा या गावात आता पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. याला टेंभरे ग्रामपंचायतीची उदासीनताच कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र, या ग्रामस्थांनी नुसते आरोप करत न बसता एकत्रित येऊन साथी हाथ बढाना... असे म्हणत रणरणत्या उन्हात श्रमदानातून विहीर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या विहिरीला पाणी लागून या गावकऱ्यांची तहान भागेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.आपल्या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. पाणी कुठे मिळते का यासाठी अनेक गावात हंडा कळशी घेऊन भटकावे लागते. यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडे पहिले लक्ष द्यायला पाहिजे. आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते मंडळींनी लक्ष देणे गरजेचे होते. ऐतिहासिक पेठचा किल्ल्याचा विचार करून आतापर्यंत पाण्याची समस्या सोडवायला पाहिजे होती; पण याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत, सरपंच, लोकप्रतिनिधी मग मते मागायला येतात कशाला, असा उपरोधिक सवाल ग्रामस्थ करीत आहेत. टेंभरे ग्रामपंचायत हद्दीतील पेठ गावाची लोकसंख्या सुमारे ३०० च्या आसपास आहे. पाण्याची वाढती समस्या लक्षात घेऊन अखेर नाईलाजाने ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन पाण्याची सोय करण्यासाठी गावात विहीर खोदण्याचे काम हाती घेतले आहे.